रायगडमधील तळई गावावर डोंगर कोसळून ३६ जणांचा मृत्यू , ४० बेपत्ता
शब्दराज ऑनलाईन,दि 23 ः
रायगड जिल्ह्यातील तळई गावात एक मोठी घटना घडली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे तळई गावातील काही घरांवर डोंगराचा ढिगारा कोसळला आहे. ज्यामध्ये 35 पेक्षा जास्त घरे दबली गेली आहे. या घटनेत आतापर्यंत 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 70 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले घटनास्थळी दाखल झाले आहेत, त्यांनी मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला.
महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.