सेलू शिवारातील शेतकरी पिकविम्या पासून वंचित,शेतकऱ्यांचे कृषि विभागाला निवेदन

सेलू ( प्रतिनिधी )
शहराच्या शिवारातील जमिन नगरपरिषदेच्या हद्दीत येते त्यामुळे पिकविमा मंजुर करता येत नाही असे जुजबी कारण देत पिक विमा कंपनी ने सेलू शहर शिवारातील शेतकऱ्यांना पिकविमा नाकारला असून त्यामुळे शहर शिवारातील शेतकरी पिकविम्या पासून वंचित राहिले आहेत.
२०२४/२५ च्या खरीप हंगामात सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला खरीप पिकाचा हंगाम पाऊसच न पडल्यामुळे बहरात आलेली उभी पिके वाळून गेली अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकविमा केंद्रा वर आपल्या पिकांचा पिकविमा काढला तसेच ई पिकपाहणी , पिकांचा स्पॉट पंचनामा असे सर्व सोपस्कार पूर्ण करूनही विमा कंपनीने न.प.शहर शिवार हद्द व शासनाचे निर्देश कारण देत व पिकविमा नाकारण्यात आल्याची माहिती
पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी श्री झाडे यांनी दिली.
तालुक कृषी अधिकारी श्री काळे यांना विचारणा केली असता पिकविम्या बाबत अशा प्रकारचे शासनाचे कोणतेही निर्देश अथवा परिपत्रक नसल्याच स्पष्ट करून हा विषय पुढील कार्यवाही साठी कृषी आयुक्तांकडे पाठविण्याचे आश्वासन निवेदन कर्त्यांना दिले.
शेतकऱ्यांच्या पिकविम्या बाबत लोम्बार्ड कंपनीचा मनमानी कारभार हा शेतकऱ्याच्या फसवनुकीचा प्रकार असून तात्काळ चौकशी करून सर्व शेतकऱ्यांना पिकविमा मिळवून द्यावा अशी मागणी तालुका कृषी
अधिकारी सेलू यांना करण्यात आली आहे.

निवेदनावर डॉ गणेश थोरे ,कपील फुलारी ,विशाल लोया ,शिवकुमार नावाडे सुरेश खेत्रे , व्यंकटेश काबरा , रामप्रसाद सुरोसे , महेश नावाडे , डॉ अश्वीन भरड,शिवाजी गोरे , जकी पठाण , सुभाष फोपसे ,सतीश भोसले गोपाल लोया, रंगनाथ काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Comments (1)
Add Comment