खाजगी ट्रॅव्हल व कंटेनरच्या धडकेत चार जण ठार

0 307

 

आ. बाळापूर, आनंद बलखंडे – खासगी बस आणि कंटेनरचा आज दुपारी दोन वाजता भीषण अपघात होऊन चार जण ठार झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यात घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, नांदेड कडून हिंगोलीकडे ट्रॅव्हल्स बस क्रमांक (एम एच 38 एफ 8485 ) ही येत असताना कळमनुरी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या पारडी मोड शिवार जवळ हिंगोली कडून बाळापूर कडे येणारे एक मालवाहू कंटेनर येत असतानाच समोरासमोर दोनी वाहनाची भीषण धडक झाली. ही धडक एवढी जोराची होती की ट्रॅव्हल्स मधील केबिनमध्ये बसलेले प्रवासी समोरील काच फुटुन बाहेर फेकले गेले व जागीच ठार झाले. काही प्रवासी हे कंटेनर खाली दबून मृत्यूशी झुंज देत होते.

मृतांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील अजरसोंडा येथील त्रिवेणीबाई अजरसोंडकर आणि राजप्पा दगडू अजरसोंडकर यांचा समावेश आहे.तर उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील विठ्ठल कणकापुरे यांचा तर कळमनुरी तालुक्यातील बाभळी येथील पंचफुलाबाई गजभार यांचा समावेश आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच आ. बाळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उप निरीक्षक बालाजी पुंड, जमादार मधुकर नागरे, नागोराव बाभळे हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच काही वेळातच कळमनुरी पोलिसांचे पथक दाखल झाले, तत्पूर्वी गावकऱ्यांनी मदत सुरू करून जखमींना बाळापूर रुग्णालयात व नांदेड येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी पाठवले. या अपघातात आत्ता पर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली  आहे. याशिवाय अपघातात २४ जणं जखमी झाले आहेत. या जखमींपैकी सहा जण गंभीर झाले असून त्यांना तात्काळ नांदेड येथील रुग्णालयात उचराकरता हलवण्यात आलं आहे. इतर जखमींवर कळमनुरी येथील उप-जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

error: Content is protected !!