रेल्वे प्रवांशासाठी महत्त्वाची बातमी; गाडी लेट झाल्यास मिळणार पूर्ण रिफंड

1 455

प्रवास करत असाल आणि तुमची गाडी लेट असेल तर तुम्हाला मोठा दिलासा रेल्वेने दिला आहे. आता तुम्ही प्रवास करत असणारी एक्स्प्रेस तीन तासांनी लेट (Train Late More than 3 hrs) झाल्यास तिकिटाचे (Train Ticket) सर्व पैसे रिफंड मिळणार आहेत. एवढच नाही तर नाश्ता-जेवणही फ्री मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनीच ही मोठी घोषणा केली आहे. (Indian Railways Marathi News)

 

रेल्वेने सांगितले आहे की, धुक्यामुळे तुमची ट्रेन 3 तास किंवा त्याहून अधिक उशीर झाल्यास प्रवासी तिकीट रद्द करू शकतात आणि पूर्ण परतावा मिळवू शकतात. या स्थितीत, कन्फर्म तिकिटाव्यतिरिक्त, आरएसी तिकिटावर पूर्ण परतावा देखील दिला जाईल.

 

खाणे आणि पेय विनामूल्य उपलब्ध असेल
भारतीय रेल्वेने सांगितले आहे की तुम्ही तिकीट काउंटरवरून बुक केले आहे की ऑनलाइन. दोन्ही प्रकरणांमध्ये, तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतील. यासोबतच जर तुमची ट्रेन लेट झाली तर तुम्हाला मोफत खाण्यापिण्याची सुविधाही मिळते, पण ही सुविधा तुम्हाला काही खास ट्रेनमध्येच मिळेल.

 

तिकीट रद्द केल्यास संपूर्ण भरपाई दिली जाणार
धुक्यामुळे तुमच्या रेल्वेला 3 तास किंवा त्याहून अधिक उशीर झाल्यास प्रवासी तिकीट रद्द करु शकतात आणि संपूर्ण नुकसान भरपाई मिळवू शकतात, असे रेल्वेने म्हटले आहे. तसेच कन्फर्म तिकिटाव्यतिरिक्त, RAC तिकिटावर पूर्ण परतावा देखील दिला जाईल, असे रेल्वेकडून साघण्यात आले आहे.

 

 

मोफत जेवण आणि पाणी उपलब्ध
तुम्ही काउंटरवरून किंवा ऑनलाइन तिकीट बुक केल्याचे भारतीय रेल्वेने म्हटले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये, तुम्हाला संपूर्ण परतावा मिळेल. किंवा तुमची ट्रेन लेट झाली तर तुम्हाला मोफत खाण्यापिण्याची सुविधा मिळेल, पण ही सुविधा तुम्हाला काही ठराविक रेल्वेमध्येच मिळेल.

 

 

तिकिटाचे पैसे परत कसे मिळणार?
जर तुम्ही काउंटरवर रोख रक्कम भरुन तिकीट खरेदी केले असेल, तर तुम्हाला त्वरित रोख रक्कम मिळेल. किंवा, जर तुम्ही काउंटरवर तिकीट बुक केले असेल आणि डिजिटल मोडमध्ये पैसे दिले असतील तर तुम्हाला पैसे ऑनलाइन मिळतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

error: Content is protected !!