महापालीकेवर काढला कृषि नगर,मुनीम कॉलनीतील नागरीकांनी आक्रोश मोर्चा,माणिक पोंढे यांचे नेतृत्व

0 31

परभणी,दि 28 (प्रतिनिधी)ः
परभणी शहरातील कृषी नगर, मुनीम कॉलनी येथील रस्त्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिकराव पोंंढे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी मंगळवारी  (दि.28)  महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढला.

परभणी शहरातील कृषी नगर,मुनीम कॉलनी येथे पक्का रस्ता नसल्याने तसेच नाली नसल्याने नालीचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्त्यावर पायी देखील कठीण झाले असून घाण पाण्यामुळे साथीचे आजार पसरत आहेत. त्यामुळे या भागांमध्ये तात्काळ रस्ता तयार  करावा अशी मागणी करत माणिक पोंढे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.यावेळी पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी आंदोलकांची भेट घेतली.त्यांचे प्रश्न समजुन घेत रस्ता तयार करण्याबाबत महापालीकेला सुचना केली.यावेळी संजय चोपडे,विकास गव्हाणे, मोहन टाक आदीसंह परिसरातील महिला,नागरीक मोठ्यासंख्येने सहभागी झाल्या  होत्या.

error: Content is protected !!