कळमनुरी आगारातून बाळापूर औरंगाबाद व परभणी बस फेरी सुरु करा- ठाकूर सिंग बावरी
आखाडा बाळापूर (प्रतिनीधी) ः
कळमनुरी तालुक्यातील आ बाळापूर शहर हे व्यापारी दृष्ट्या महत्वाचा केंद्रबिंदू असून जवळपास परिसरातील 30 ते 35 गावांचा थेट संबंद बाळापूर शी निगडित आहे . राज्य रस्त्यावर असल्याने अनेक जणांना औरंगाबाद येथे उच्च न्यायालयात विविध कामानिमत येजा करावी लागत असते तसेच परभणी येथे कृषी विद्यापीठ असल्याने अनेक शेतकऱ्यां ना परभणी येथे जावे लागते . परंतु बाळापूर बसस्थानका तुन एकही बस उपलब्द नाही , तालुक्या च्या ठिकाणा बस धावतात पण त्याचा बाळापूर करांना व परिसरातील नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो , त्या मुळे कळमनुरी आगाराची औरंगाबाद व परभणी बस बाळापूर स्टॅन्ड वरून गेल्यास त्याचा फायदा होईल ,सकाळी ६:३० औरंगाबाद तर परभणी ला सकाळी ८ ,दुपारी १, व संध्याकाळी ५ वाजता ह्या बस फेऱ्या सुरु केल्यास खूप सोईचे होईल तसेंच कळमनुरी तालुक्याच्या आगारा च्या उत्पन्ना मध्ये भरच पडेल सध्या नवरात्र उत्सव चालू आहे , पुढेही दिवाळीचा मोठा सन साजरा होणार या त्या निमित्ताने ही मान्य करून दिवाळी ची भेट द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विमुक्त सेल चे प्रदेश उपाध्यक्ष ठाकूर सिंग बावरी यांनी केली आहे .