देशसेवेची मोलाची संधी, जी २० समितीत डॉ.अजित गोपछडेंचा समावेश

2 30

वृत्तसेवा – गजानन जोशी – जी-२० परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमांचे समिती नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठीचे माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडून नुकतीच घोषणा केली आहे…

 

वसुधैव कुटुम्बकम्

‘एक वसुंधरा, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या भारत देशाला मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात जी२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद मिळालं आहे. हा फक्त नेत्यांचा बहुमान नाही तर देशातील प्रत्येक नागरिकासाठी जागतिक पटलावर सुवर्ण संधी निर्माण करून देणारा हा क्षण आहे.

 

 

महाराष्ट्र प्रदेश भाजपतर्फे लोकसहभाग आणि जनजागृतीसाठी जी २० च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश भाजप समिती कार्यरत करण्यात आली आहे आणि या समितीच्या ‘प्रदेश संयोजक’ राजेश पांडे असतील तर समितीत सदस्य म्हणून आमदार राणा जगजीतसिंह पाटील,आमदार अमरीशभाई पटेल,आमदार निरंजन डावखरे,शायना एन सी,खासदार डॉ. अनिल बोंडे,डॉ.अजित गोपछडे,प्रदीप पेशकर,श्वेता शालिनी,दयाशंकर तिवारी या सदस्यांचा समावेश आहे. पक्षाने माझ्या वैद्यकीय प्रकोष्ठच्या कार्याची/सेवेची दखल घेत ही निवड केली असावी,जी २० सारख्या महत्वपूर्ण समितीत माझा सहभाग करून माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी पक्षाचा कायम ऋणी असेल. माझे मार्गदर्शक नेते उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपविली,त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘संघटन आणि संवाद’ या सूत्राभोवती सलग ३५ वर्षे वैद्यकीय क्षेत्र व ३० वर्षे भाजपा कार्यकर्ता म्हणून कार्यरत असल्याने संघटनात्मक कौशल्याचा अनुभव याकामी नक्कीच उपयोगी येईल…

 

राज्यभरात होणारे जी २० परिषदेचे कार्यक्रम करताना रचनात्मक लोकसहभाग,युवा वर्गामध्ये आगामी संधींबद्दल जनजागृती,शिक्षण,आरोग्य,उद्योग,सहकार,आंतराष्ट्रीय व्यापार,आर्थिक सक्षमता,डिजिटल क्षेत्रातील संधी मांडणे यावर आमचा भर असेल.

 

 

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची आर्थिक प्रगती होत असताना त्याचा सुयोग्य संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवणे,हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आद्यकर्तव्य आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची आम्हाला मदत लागणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येक भारतीयाने जी-२० च्या निमित्ताने राजकारण,पक्षभेद बाजूला ठेवून यात सहभागी होवूयात व देशसेवेसाठी पुढे जाऊयात…

error: Content is protected !!