अशी करा सोयाबीन पिकाची लागवड
सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये 40 टक्के प्रथिने आणि 19 टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ 58 टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ 60 टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे 5 दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत. कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.
देशात सोयाबीनची उत्पादकता (100 किलो/हेक्टर) निम्मी आहे. जनावरांसाठी आणि कुकुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो . याशिवाय सोयाबीनपासून सोयामिल्क, सोया बिस्कीट, सोयावाडीसारखे 100 च्या वर वेगवेगळे उपपदार्थ तयार करता येतात. सोयाबीन झाडाच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणूच्या गाठीद्वारे हेक्टरी 100 किलोपर्यंत नत्र जमिनीत स्थिर होते. तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्याने सोयाबीनचा बेवड म्हणून चांगला उपयोग होतो. सोयाबीनच्या झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. सोयाबीनला निसर्गाने मानवाला दिलेली देणगी संबोधले जाते . तर पाश्चात्य देशामध्ये या पिकास कामधेनु तर चीनमध्ये मातीतील सोने म्हणून संबोधले जाते.
* सोयाबीनची कमी उत्पाद्कता असण्याची प्रमुख कारणे
आधुनिक लगवड़ तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे
सुधारीत जातींचा वापर न करणे
दर हेक्टरी झाडांचीसंख्या न राखणे
बीजाक्रिया न करण, उगवणशक्तीची तपसणीं न करणे
योग्य खत मात्रांचा शिफारशीनुसार वापर नकरणे
तण तसेच कीड व रोगांचा बंदोबस्त वेळेवर न करणे
आंतरपीक पद्धतींचा वापर नकरणे
सोयाबीनच्या उत्पाद्न वाढीसाठी महत्वाच्या बाबीजमीन
उमध्यम ते भारी , चांगला निचरा होणारी , गालाची जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी उत्तम असते . हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते . ज्या जमिनीत पाणी साठून राहते. त्या जमिनीत सोयाबीनची उगवण चांगली होत नाही. जमिनीचा सामू 6 ते 6.5 च्या आसपास आणि विद्युतवाहकता 4.0 डेसी सायमन / मीटरपेक्षा कमी असल्यास अशा जमिनीत सोयाबीनचे पिक उत्तम येते .
* हवामान
उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. तापमान 18 ते 35 अंश से.ग्रे. मध्ये पिकाची वाढ चांगली होते. मुख्यत्वे सोयाबीन खरीप हंगामात घेतले जाते. या पिकास वार्षिक 600 ते 1000 मी.मी. पर्जन्यमानाची आवश्यकता असते.
* पूर्वमशागत व भरखते
जमीन खोल नांगरुन उभ्या आढ्या कुळवाच्या तूंन पाळ्या र्दछन जर्णीन चांगली भुसभुशीत करावी. त्यानंतर चांगलं कुज़लल शैण्छत किंव कंपक्टि ठत ईक्टरी 25 ते 30गाड्या वापराव्या.
* उगवणशक्ती कमी होण्याची कारणे
सोयाबीनची उगवणशक्ती साठवणुकीमध्ये कमी होत जाते. त्यापुळे एक वर्षाच्यावर साठवणूककेलेले बियाणे उगवणशक्ती तपासल्याशिवायपेरणीस वापरू नये.
कडक उन्हात बियाणे वाळवून साठवल्यास उगवणशक्तीकमी होते.
मळणीयंत्राची गती 400. आर.पी.ए. च्यावर असल्यास बीयातील अंकुरास धक्का लागतो व त्याचा परिणाम उगवणशक्तीवर होतो.
साठवणुकींमध्ये पाोत्यांची एकमेकांवर थप्पी लावल्यास खालच्या पोत्यातील बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते .म्हणून जास्तीत जास्त 5 पोत्यांची थप्पी असावी .
कालावधी – खतांची मात्रा व वेळेवर पूस असल्यास पिक 90 ते 100 दिवसात तयार होते.
* सुधारित वाण
एम.ए.सी.एस.13, एम.ए.सी.एस.58, एम.ए.सी.एस.124 ,एम.ए.सी.एस.450, एम.ए.सी.एस.1188, फुले कल्याणी (डी.एस.228),फुले अग्रणी ,जे.एस.93-05, जे.एस 97-52 , जे.एस 95-60, एन.सी.आर 37 एम.ए.यु.एस.-47, एम.ए.यु.एस.-61,एम.ए.यु.एस.61-2, एम.ए.यु.एस.-71,एम.ए.यु.एस.-81, एम.ए.यु.एस.-158, जे.एस.335, टीए.एम.एस.98-21
* बियाणे प्रमाणे – सोयाबीनची उगवणशक्ती 70 टक्केच्यावर असल्यास हेक्टरी 75 किलो बियाणे वापरावे.
* बीजप्रक्रिया
उग्वणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाश्कांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्व प्रती किलो बियाण्यास 3 ग्रम थायरम किंवा 2 ग्रॅम थायरम 2.5 ग्रॅम बाविस्टीन व 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम जॅपोनिकम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी 250 ग्रॅम/10 किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविकखताची बीजप्रक्रिया करावी.
* पेरणी
सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे त्यासाठी वाफशावर पेरणी करावी तसेच पूर्ण उगवण झाल्यावर गरजेनुसार शक्य असल्यास पाणी द्यावे. पेरणी 15 जून ते 15 जुले दरम्यान करावी. पेरणी 45 ु 5 सें.मी. अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे 3-5 सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
* खत व्यवस्थापन
सोयाबीन पिकास हेक्टरी 50 किलो नत्र + 75 कि. स्फुरद + 30 किलो गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी द्यावे. जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास 25 किलो झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे. तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने 10 किलो बोरॅक्स प्रति हे. पेरणीच्यावेळी द्यावे.
* आंतरमशागत
सोयाबीन पिकास सुरवातीचे 6-7 आठवडे हे तण वाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरवातीला पीक तणविरहीत ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यासाठी 20-30 दिवसांनी एक कोळपणी तर 45 दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी. त्याचबरोबर गरजेनुसार 1-2 खुरपण्या देऊन पीक तणविरहीत ठेवावे. तण नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकामुळे चांगल्याप्रकारे सोयाबीनमधील तणांचा बंदोबस्त झाल्याचे दिसून येते.
* पेरणीपूर्व
फ्लुक्लोरॅलीन 1 कि./हे. किंवा ट्रायफ्लुरॅलीन 1 कि./हे. यापैकी कोणतेही एक तणनाशक 600 ते 700 लीटर पाण्यातून मिसळून जमिनीवर सारखी फवारणी करावी व वखराची पाळी देऊन जमिनीवर मिसळून द्यावे.
* उगवणपुर्व
(पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकुर जमिनीवर येण्याआधी) अलॅक्लोर 2 किलो क्रियाशील घटक /हेक्टर किंवा मेटॅलॅक्लोर 2 किलो क्रियाशील घटक /हेक्टर किंवा पेंडीमिथेंलीन 1 किलो क्रियाशील घटक /हेक्टर प्रमाणे फवारणी करावी.
पेरणीनंतर तण उगवल्यानंतर क्रिझॅलोफॉल इथाईल 50 ग्रॅम किलो क्रियाशील घटक /हेक्टरद पेरणीनंतर 20-25 दिवसांनी हेक्टरी 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
इमॅझीथायपर 1े टक्के एस.एल. 100 ग्रॅम केलिी क्रियाशील घटक /हेक्टर पेरणीनंतर 15-20 दिवसांनी हेक्टरी 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
* आंतरपीक पद्धतीचा वापर करणे
कोरडवाहू शेती पद्धतीत सोयाबीन पुष्कळदा सलग पीक म्हणून घेतात, परंतु आपण सलग पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे, याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
बेभरवशाचे तसेच कमी पर्जन्यमान व ज्या ठिकाणी दुबार पीक घेऊ शकत नाही अशा ठिकाणी आंतरपीक पद्धतीपासून शाश्वत व स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता अधिक असते.
प्रतिकूल परिस्थितीतही कोणत्याही एका पिकाचे उत्पन्न हमखास मिळते.
आंतरपिकात सोयाबीनसारख्या द्विदलवर्गीय पिकाचा समावेश असल्यास हवेतील नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.
आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास तणांच्या वाढीस आळा बसतो. तसेच रोग व किडींचे प्रमाण कमी आढळून येते.
जनावरांकरिता सकस चारा उपलब्ध होतो.
आंतरपिकातील सोयाबीन सारखे नगदी पीक शेतक-यांच्या आर्थिक अडचणी दूर करु शकते.
तूर + सोयाबीन सारख्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास देशातील डाळ व तेलवर्गीय पिकांचे उत्पादन वाढून तेल व डाळीची कमतरता भरून निघेल.
आंतरपीक पद्धती
तूर + सोयाबीन (1:2)
कपाशी + सोयाबीन (1:1) .
सोयाबीन + भुईमूग (14, 1:6) .
सोयाबीन + ज्वारी (1:2, 2:2) .
सोयाबीन + बाजरी (2:4, 2:6)
कीड व रोग व्यवस्थापन
सोयाबीनवर महाराष्ट्रात आढळणा-या किडीच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करावी
अ) कोड नियंत्रण
खोड माशी
क्लोरोपायरीफॉस 20 टक्के इसी 1.5 लि. प्रति है. किंवा ट्रायझेफॉस 40 टक्के इसी 8ेे मि.ली. पेरणीनंतर 8 ते 10 दिवसांनी आणि पीक फुलो-यात असताना 5ेे-7े0 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
पाने पोखरणारी अळी
पाण्यात मिसळणारी 50 टक्के कार्बारील भुकटी प्रती हेक्टरी 2 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावी.
पाने खाणा-या आणि पाने गुंडाळणा-या अळ्या
क्रिनॉलफॉस 25 इसी 1.5 ली.
ट्रायझोफॉस 4े इसी 8ेे मि.ली.
मेथोमिल 40 टक्के एसपी 1 कि. ग्रैं.
क्लोरोपायरीफॉस 2े इसी 1.5 ली.
इथोफेनप्रॉक्स 1े इसी 1 ली.
इंडोक्झाकार्ब 300 मि.ली.
लम्बडा सायद्देलोश्चिन 5 टक्के सीएस 3ेे मि.ली.
स्पिनोसॅड 45 एसी 125 मि.ली.
इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के डब्लुजी 150 ग्रॅम यापैकी एका किटकनाशकाचा प्रती हेक्टरी 500-700 लीटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी आलटून पालटून वापर करावा.
रस शोषणा-या किडी (मावा, तुडतुडे, हिरवा ढेकूण इ.)
मेथिल डिमेटॉन 25 इसी 6ेे मि.ली. किंवा फॉसफॉमिडॉन 85 इसी 2ेे मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस 36 एस सी 8ेे मि.ली. यापैकी एका कीटकनाशकांचा प्रती हेक्टरी 500 लीटर पाण्यात मिसळून फवारा द्यावा.
हुमणी
पावसाळ्याच्या सुरुवातीस कडुनिंब व बाभळीच्या झाडावर किटकनाशकांचा फवारा देऊन मुंगेच्यांचा नाश करावा. शेतात शेणखत पसरण्यापूर्वी त्यात असलेल्या हुमणीच्या अंडी व अळ्यांचा नाश करण्यासाठी 10 टक्के फॉलिडॉल भुकटी मिसळावी. शेतात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळल्यास 5 टक्के क्लोरेडेन किंवा 5 टक्के हेप्टाक्लोर भुकटी प्रती हेक्टरी 65 केलिी जमिनीत मिसळावी.
ब) रोग नियंत्रण
या पिकावर केवडा, तांबेरा, देवी, मूळकुजव्या इ. रोग येतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हेक्झाकोनेझोल 5 इसी 1 लिटर (प्रतिबंधात्मक) आणि रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास दुसरी फवारणी प्रॉपिकोनेझोल 25 इसी 1 लिटर या बुरशीनाशकांची प्रती हेक्टरी 1ेेे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिकाची काढणी, मळणी व उत्पादन : जेव्हा झाडावरील पाने पिवळी पडून गळल्यानंतर आणि 95 टक्के शेंगा तपकिरी रंगाच्या झाल्यावर काढणी करावी. काढणीस उशीर झाल्यास शेंगा झाडावरच तडकून बी बाहेर पडते व उत्पादनाचे नुकसान होते. काढणी केल्यानंतर मळणीयंत्राच्या सहाय्याने मळणी करून घ्यावी.
उत्पादन : सोयाबीनपासून हेक्टरी 25 ते 30 किंटल उत्पादन मिळते.
1. मुंडे सचिन संभाजी
Ph.D 3rd year
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी)
2. पांचाळ वसंता मधुकरराव
कनिष्ठ संशोधक सहाय्यक
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी)