31/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

समृद्धी महामार्गावरील दरोड्याचा मुख्य सूत्रधार जाळ्यात

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर २६ ऑगस्ट रोजी झालेल्या रोड रॉबरी प्रकरणात बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील किरण अजिनाथ गायकवाड याचा सहभाग समोर आला आहे. पोलिसांनी काल रात्री त्याला त्याच्या घरातून अटक केल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्ग पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. यात किरण गायकवाडचा किती गुन्हा मध्ये सहभाग आहे त्याच्यासोबत कोण कोण साथीदार आहेत याचा तपास …

Read More »

1 सप्टेंबरपासून LPG सिलिंडरच्या नियमात मोठे बदल

१ सप्टेंबरपासून एलपीजीचे अनेक नियम बदलणार आहेत. सरकारने लागू केलेल्या नियमांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होईल. जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतींसह अनेक घटकांचा एलपीजीच्या किमतींवर प्रभाव पडेल. याव्यतिरिक्त, गॅसवरील जीएसटी आणि इतर खर्चांचाही परिणाम होऊ शकतो. एलपीजी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत मूळतः २३ ऑगस्ट होती, परंतु ती ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक अहवालानुसार, लाखो ग्राहकांनी अद्याप …

Read More »

12 तारखेपर्यंत मुंबईत जा,पण…..मनोज जरांगे यांनी सांगीतली आंदोलनाची दिशा

मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांनी समर्थकांना मुंबईत जाण्याचं आवाहन केलं आहे. “आजपासून 12 तारखेपर्यंत मुंबईत जा, पोलिसांनी नेलं तरी चालेल” असं मनोज जरांगे पाटील बोलले. मुंबईत कसं जायचं, कुठे रहायचं त्याचा प्लानही त्यांनी सांगितला. “मुंबईत विदर्भ, मराठवाडा, कोकणातले लाखो लोक राहतात. एकेका घरात चार-चार, पाच-पाच लोकं राहिले तर 20-25 लाख …

Read More »

अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार

मराठा आरक्षण  आणि कुणबी प्रमाणपत्र, जात पडताळणी समिती या मुद्द्यांवरुन राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठीच्या वंशावळ जुळवणी समितीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, जरांगे पाटलांनी  उपोषणाला सुरुवात केली असून आज …

Read More »

पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

हिंगोली शहरात एका पोलिस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (ता. २९ ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाखाली ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, आत्महत्या करताना संबंधित अधिकारी पोलिस गणवेशातच होते. या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. अमोल गंगलवाड (वय ५०) असे या मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव …

Read More »