08/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

गंगाखेडात चोरट्यांनी महिलेचे सोन्याचे गंठण पळवले

गंगाखेड प्रतिनिधी | रामप्रसाद ओझा शहरात पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, राजस्थान गल्ली परिसरातील एका महिलेवर सराफा बाजारात दुचाकीस्वारांनी हल्ला करून सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे. राजस्थान गल्ली येथील रेश्मा बालाजी गुंडाळे या नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे चार …

Read More »

व्यापार व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल व्यापारी बांधवांचा गौरव

हिंगोली, दि 08 हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने व्यापार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यापारी बांधवांचा सत्कार व गौरव समारंभ शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी गणेश इन हॉटेल, हिंगोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मा. आ. श्री. गजाननरावजी घुगे यांची मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हिंगोली …

Read More »

चित्रकला भावनिक, सर्जनशील व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम-गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे

-नूतन विद्यालयात शासकीय बालचित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली सेलू / प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित शासकीय बालचित्रकला स्पर्धा नूतन विद्यालय, सेलू येथे उत्साहात पार पडली. यावेळी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी चित्रकला ही विद्यार्थ्यांच्या भावनिक, सर्जनशील व व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, एकाग्रता, सौंदर्यदृष्टी, हस्तकौशल्य तसेच स्वतंत्र अभिव्यक्ती विकसित होते. विद्यार्थ्यांनी चित्रकलेतील विविध संधींचा …

Read More »

गंगाखेडात ‘सेफ फूड’ अभियान कागदावरच; अन्न प्रशासनाचा ‘कानाडोळा’?

रामप्रसाद ओझा | गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड : नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या अन्नसुरक्षेच्या प्रश्नाकडे अन्न व औषध प्रशासनाचे स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. राज्यभर ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती तसेच तपासणी व कारवाई केली जात असताना गंगाखेड शहर व तालुक्यात मात्र या अभियानाचा प्रभाव दिसतोय का? असा सवाल …

Read More »

‘कॉकरोच जनता पार्टीची आता ‘क्या बोलती पब्लिक’ मोहीम

छत्रपती संभाजीनगर: येत्या सप्टेंबर महिन्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या वतीने देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ हे व्यापक आंदोलन आणि मोहीम राबवली जाणार आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात येत असल्याची घोषणा ‘सीजेपी’चे अभिजीत दीपके यांनी केली आहे. या मोहिमेत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती …

Read More »

विधिमंडळात पडलेली फूट ही राजकीय फूट मानायची का? ठाकरेंच्या वकिलांचा मोठा सवाल,

एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटायच्या आधीच शिवसेनेची घटना अमलात होती आणि ती घटना निवडणूक आयोगाने अमान्य केली. पण निवडणूक आयोगाला ती घटना अमान्य करण्याचा अधिकार होता का? असा मोठा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्यासोबत काही आमदार होते, त्या आधारे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला. पण विधिमंडळात पडलेली फूट …

Read More »

कर्जमुक्ती योजनेत अडचण? शासनाची हेल्पलाईन सुरू

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना कर्जमुक्ती योजनेत अडचण असल्यास हेल्पलाईनवर करा संपर्क; शासनाचे आवाहन मुंबई | प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ संदर्भात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण, शंका किंवा तक्रार असल्यास शासनाने हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. कर्जमुक्ती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेबाबत पात्रता, अर्ज, …

Read More »

बहुमताच्या राजकारणात गंगाखेडचा विकास बळी!

१५५ विकासकामांना सभागृहातच ‘ब्रेक’; सर्व २४ ठराव फेटाळले भुयारी गटार, पाणीपुरवठा, गोदावरी स्वच्छता, रस्ते, दलित वस्ती विकास, नगरोत्थानसह कोट्यवधींच्या योजनांवर पाणी; अवघ्या काही मिनिटांत सभा संपुष्टात रामप्रसाद ओझा | गंगाखेड प्रतिनिधी – गंगाखेड नगर परिषद कार्यालयातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात शुक्रवारी (दि. ३१ जुलै) सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा सौ. उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सर्वसाधारण सभा शहराच्या विकासाच्या दृष्टीने …

Read More »

ऑगस्टमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या

जुननंतर आता जुलै महिना संपला. विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन 2 महिने झाले. 1 सेमिस्टरची परीक्षादेखील जवळ आलीय. दरम्यान येऊ घातलेल्या ऑगस्ट महिन्याकडून विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. कारण ऑगस्ट महिना अनेक सण घेऊन येत असून यानिमित्ताने विद्यार्थ्यांची मजा होणार आहे. त्यामुळे ऑगस्ट 2026 हा महिना विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांच्या दृष्टीने दिलासादायक ठरणार आहे. स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, ईद-ए-मिलाद यांसारख्या राष्ट्रीय आणि धार्मिक सणांसह शनिवार-रविवारच्या नियमित सुट्ट्यांमुळे …

Read More »

राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांच्या सिबिलवर कर्जमाफीची टांगती तलवार

हिंगोली | प्रतिनिधी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’ अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत सरकारकडून संपूर्ण कर्जफेड न करता काही रक्कम सरकार भरणार असून उर्वरित रक्कम संबंधित बँकांनी माफ करायची असल्याने ही प्रक्रिया वन टाइम सेटलमेंट (OTS) पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यातील सुमारे …

Read More »

समाजसेवेला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड; धार्मिक व सामाजिक संस्थांसाठी SAMAVET बनत आहे विश्वासार्ह तंत्रज्ञान भागीदार

पुणे  ,दि 30 (प्रतिनिधी)ः भारतात डिजिटल परिवर्तनाचा वेग सातत्याने वाढत असून त्याचा प्रभाव आता धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक संस्थांच्या कामकाजावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या ट्रस्ट, मंदिरे, गणेश मंडळे आणि स्वयंसेवी संस्था आता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अधिक पारदर्शक, प्रभावी आणि सुटसुटीत व्यवस्थापनाकडे वाटचाल करत आहेत. या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेला SAMAVET – India’s Community …

Read More »

पालम येथे 06 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

परभणी, दि. 30 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी व माधवराव पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पालम आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित), नाशिक, शाखा पालम यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 06 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या कालावधीत पालम येथील माधवराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे …

Read More »

बँक खात्यांतील तफावतीबाबत काळजी करू नका, कृषीमंत्र्यांनी दिली माहीती

राज्यातील ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांच्या आत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे काहीही कारण नाही. ती उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडूनच वर्ग केली जाणार आहे. कर्जमाफी प्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज वाटप करणे शक्य होणार …

Read More »

५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांसाठी अल्टिमेटम,निर्णायक आंदोलनाची मोठी घोषणा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटी येथून त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ५८ लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलनाची मोठी घोषणा केली आहे. समाजाला वेड्यात काढले जात असल्याचा आरोप करत जरांगे यांनी आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकले आहे. ५८ लाख प्रमाणपत्रांसाठी अल्टिमेटम मनोज जरांगे म्हणाले, …

Read More »

NCMC स्मार्ट कार्डसाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड  अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बसमधील योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक  यांनी दिली. यापूर्वी 1 ऑगस्टपासून हे कार्ड …

Read More »