20/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

शिंदे गटाची धाकधूक वाढली? सुप्रीम कोर्टाचा सवाल; एकनाथ शिंदेंसह आमदारांना अपात्र ठरवता येईल का?

नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे पुन्हा निर्णायक वळण मिळाले आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर बुधवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या एका महत्त्वपूर्ण प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विधानसभा अध्यक्षांनी अपात्रता नाकारण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला, तर एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांना न्यायालय स्वतः …

Read More »

परभणीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी २ हजारांची लाच; बीएलओला एसीबीने रंगेहात पकडले

परभणी | प्रतिनिधी – मतदार यादीत कुटुंबातील सदस्यांची नावे समाविष्ट करण्याच्या कामासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास (बीएलओ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी, १९ ऑगस्ट रोजी परभणी शहरातील बालाजी भोजनालय, स्टेशन रोड परिसरात करण्यात आली.     लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रेस नोटनुसार, रामेश्वर विलास काळे (वय ३७) हे सहायक शिक्षक असून प्रेरणा विद्यानिकेतन, वैभव …

Read More »

मराठा महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवले:नवनाथ वाघमारेंवर अखेर गुन्हा दाखल

‘ओबीसी नेत्यांची गोंडस मुले आणि पैसा पाहून मराठा समाजाच्या मुली त्यांच्या घरात घुसतात,’ असे अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह विधान करणारे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावर अखेर जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विधानावरून राज्यभरात मराठा समाजातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या होत्या. वाढता दबाव आणि ठिकठिकाणी होणाऱ्या निदर्शनांनंतर वाघमारे यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करत माफी मागितली आहे. नेमके …

Read More »

भाजपच्या केंद्रीय संघटनेत महाराष्ट्रातून तीन नेत्यांना मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नव्या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय संघटनेत महाराष्ट्राला यावेळी महत्त्वाचे स्थान मिळाले असून, अनेक नेत्यांवर राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. नव्या नियुक्त्यांमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत …

Read More »

ई बस मध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत सवलतीचा लाभ द्या,व्हाईस ऑफ मीडियाची मागणी,

परभणी, दि१७ अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस मध्ये मोफत सवलत देण्याची मागणी व्हॉइस ऑफ मीडिया परभणी यांच्या वतीने विभाग नियंत्रक कार्यालय यांच्यामार्फत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या एसटी बस मध्ये आधीस्वीकृती धारक पत्रकारांना मोफत प्रवासाची सवलत दिली जाते, परंतु अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या …

Read More »

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि टोलेजंग इमारत अखेर पूर्णपणे तयार झाली आहे. आकर्षक बांधकाम आणि अद्ययावत सुविधांनी युक्त असलेली ही इमारत सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, काम पूर्ण होऊनही ही वास्तू केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कुलूपबंद असल्याने शहरातील वाचक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र निराशा पसरली आहे. ​स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून …

Read More »

तुम्ही आमच्या पिढ्या उध्वस्त करायच्या आणि त्याला आम्ही विकास म्हणायचं का? राजू शेट्टी यांचा घणाघाती हल्ला

  वसमत,दि 17 मूठभर भांडवलदारांना खुष करण्यासाठी प्रास्तावित असलेला शक्तीपीठ हा फक्त महामार्ग नाही, तर हा आमच्या शेतकऱ्यांच्या मरणाचा हायवे आहे. तुम्हाला जायचं असेल, तर हवेतून जा. समुद्रावरून पूल बांधा. पण आमच्या शेतातून, आमच्या घरातून जाणार असाल, तर आधी आमच्या छातीवरून जावं लागेल. कारण आम्हाला तुमचे आठ पदरी रस्ते नकोत, तर आम्हाला आमच्या दोन वेळेच्या भाकरीसाठी आमची हक्काची दोन एकर …

Read More »

Ayushman Card Online: WhatsApp वरून आयुष्मान कार्ड काढणे झाले सोपे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता आयुष्मान कार्ड मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. ‘आयुष्मान सारथी’ WhatsApp Chatbotच्या माध्यमातून घरबसल्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आयुष्मान कार्ड थेट WhatsApp वर डाउनलोड करता येणार आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांना कार्ड काढण्यासाठी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार असून, मोबाईलवरूनच प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. अशी करा प्रक्रिया १. WhatsApp …

Read More »

गंगाखेडात चोरट्यांनी महिलेचे सोन्याचे गंठण पळवले

गंगाखेड प्रतिनिधी | रामप्रसाद ओझा शहरात पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, राजस्थान गल्ली परिसरातील एका महिलेवर सराफा बाजारात दुचाकीस्वारांनी हल्ला करून सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे. राजस्थान गल्ली येथील रेश्मा बालाजी गुंडाळे या नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे चार …

Read More »

व्यापार व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल व्यापारी बांधवांचा गौरव

हिंगोली, दि 08 हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने व्यापार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यापारी बांधवांचा सत्कार व गौरव समारंभ शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी गणेश इन हॉटेल, हिंगोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मा. आ. श्री. गजाननरावजी घुगे यांची मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हिंगोली …

Read More »

चित्रकला भावनिक, सर्जनशील व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम-गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे

-नूतन विद्यालयात शासकीय बालचित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली सेलू / प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित शासकीय बालचित्रकला स्पर्धा नूतन विद्यालय, सेलू येथे उत्साहात पार पडली. यावेळी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी चित्रकला ही विद्यार्थ्यांच्या भावनिक, सर्जनशील व व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, एकाग्रता, सौंदर्यदृष्टी, हस्तकौशल्य तसेच स्वतंत्र अभिव्यक्ती विकसित होते. विद्यार्थ्यांनी चित्रकलेतील विविध संधींचा …

Read More »

गंगाखेडात ‘सेफ फूड’ अभियान कागदावरच; अन्न प्रशासनाचा ‘कानाडोळा’?

रामप्रसाद ओझा | गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड : नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या अन्नसुरक्षेच्या प्रश्नाकडे अन्न व औषध प्रशासनाचे स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. राज्यभर ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती तसेच तपासणी व कारवाई केली जात असताना गंगाखेड शहर व तालुक्यात मात्र या अभियानाचा प्रभाव दिसतोय का? असा सवाल …

Read More »

‘कॉकरोच जनता पार्टीची आता ‘क्या बोलती पब्लिक’ मोहीम

छत्रपती संभाजीनगर: येत्या सप्टेंबर महिन्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या वतीने देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ हे व्यापक आंदोलन आणि मोहीम राबवली जाणार आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात येत असल्याची घोषणा ‘सीजेपी’चे अभिजीत दीपके यांनी केली आहे. या मोहिमेत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती …

Read More »

विधिमंडळात पडलेली फूट ही राजकीय फूट मानायची का? ठाकरेंच्या वकिलांचा मोठा सवाल,

एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटायच्या आधीच शिवसेनेची घटना अमलात होती आणि ती घटना निवडणूक आयोगाने अमान्य केली. पण निवडणूक आयोगाला ती घटना अमान्य करण्याचा अधिकार होता का? असा मोठा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्यासोबत काही आमदार होते, त्या आधारे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला. पण विधिमंडळात पडलेली फूट …

Read More »

कर्जमुक्ती योजनेत अडचण? शासनाची हेल्पलाईन सुरू

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना कर्जमुक्ती योजनेत अडचण असल्यास हेल्पलाईनवर करा संपर्क; शासनाचे आवाहन मुंबई | प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ संदर्भात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण, शंका किंवा तक्रार असल्यास शासनाने हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. कर्जमुक्ती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेबाबत पात्रता, अर्ज, …

Read More »