31/03/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

वृद्धाश्रमातील वृद्धांना फळ वाटप करून दिला गायनाचा आनंद

“शाम ए सरगम” संगीत परिवाराचा अभिनव उपक्रम सेलू / नारायण पाटील – हिंदू नववर्षाच्या आरंभी दि. २९ मार्च २०२६ रविवार सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ‘कामदा एकादशी’ निमित्ताने भगवंताच्या नुसत्या मुर्तीचे पूजन करुन न थांबता,”जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले” या प्रमाणे सजीव मनुष्य रुपी भगवंताच्या सेवेत ईश्वर आहे या संकल्पनेतून पाथरी जवळील ॐकार वृध्दाश्रमातील 35 वृध्द …

Read More »

अबब… ५६ गॅस सिलिंडरची चोरी

५६ सिलिंडरसह पावणे चार लाखांचा मुद्देमाल लंपास; खवणे पिंपरी येथील घटना पाथरी / प्रतिनिधी – तालुक्यातील खवणे पिंपरी येथे चोरट्यांनी गॅस एजन्सीच्या गोदामावर डल्ला मारत तब्बल ५६ भरलेले गॅस सिलिंडर चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुमारे ३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. २८ मार्च) रात्री ते …

Read More »

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून,दोन मे पासून सुट्या

: यंदा राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ हे १५ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. शिक्षण संचालनालयाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी यंदाच्या उन्हाळी सुटी व नवीन शैक्षणिक वर्षाबाबत आदेश जारी केला आहे. शैक्षणिक वर्ष २५-२६ अखेरच्या टप्प्यात आहे. बुधवारपासून एप्रिल सुरू होत आहे. जिल्हा परिषद, सर्व माध्यमांच्या व सर्व …

Read More »

महिला गर्भाशयाची गाठ काढायला गेली; पण भूल देऊन केलं भलतंच कांड

पुणे: डॉक्टरला देवाचा दर्जा दिला जातो, कारण ते अनेकांना अगदी मृत्यूच्या दारातून परत आणतात. मात्र, पुण्यात याच डॉक्टरांच्या हलगर्जीपणाची एक धक्कादायक घटना समोर आली. मांजरी बुद्रुक येथील ‘साई केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये एका ३५ वर्षीय महिलेची साधी गाठ काढायची होती. मात्र, गाठ काढायच्या नावाखाली चक्क तिचे संपूर्ण गर्भाशय काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमित …

Read More »

उदयोगशील विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज-डॉ. अमोल देशपांडे

सुशिल दळवी) पूर्णा ,ता 29 ः वाढत्या बेरोजगारीच्या आव्हानात्मक परिस्थितीचा यशस्वी मुकाबला करण्याकरिता आणि सर्वांनाच नोकऱ्या आजच्या काळात मिळणे अशक्य असल्याकारणाने उद्योग विश्वात विद्यार्थी पाय रोवून उद्योगशील कसा होईल ? याकरिता उद्योगशील संस्कार आणि वयवसाय निवडीचे स्वातंत्र्य याबाबत जाणीव जागृती करून उदयोगशील विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हास्तरीय सुलभक मारोती कदम यांनी केले . ते व्यवसाय शिक्षण व …

Read More »

घरगुती वीज ग्राहकांसाठी मोठी बातमी, वीज दरवाढ नाही

महावितरणच्या 2025-26 ते 2029-30 या पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश आज प्रसिद्ध केला आहे. महावितरणने (MSEB) पाच वर्षात वीजदर (Electricity) कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत. कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नाहीत. महावितरणच्या याचिकेवर आयोगाने गेल्या वर्षी मार्च अखेरीस एक आदेश दिला …

Read More »

देशात लॉकडाउन लागणार नाही:केंद्र सरकारची माहीती,केवळ अफवा असल्याचे स्पष्ट

पश्चिम आशियातील संकटामुळे देशात देशव्यापी लॉकडाऊन लागू केला जाणार नाही, असे केंद्र सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले. सरकारचे तीन वरिष्ठ मंत्री—निर्मला सीतारामन, किरण रिजिजू आणि हरदीप पुरी—यांनी निवेदने जारी करून या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे रिजिजू यांनी नमूद केले आणि खुद्द पंतप्रधान मोदी स्वतः या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग …

Read More »

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी,फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या फेब्रुवारी महिन्यातील निधी वितरणाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून अधिकृतपणे सुरू केली आहे. याबाबतची माहिती मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे. पुढील ४८ ते ७२ तासांत रक्कम जमा होणार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती …

Read More »

‘जेवलीस का’, मेसेज करणंही महागात पडणार? महाराष्ट्रात नवा कायदा

मुंबई: सोशल मीडियाच्या वापर मागील काही वर्षात चांगलाच वाढला आहे. मात्र, त्याचवेळी महिला युजर्सना डिजीटल छळालाही सामोरे जावे लागत आहे. मेसेज इनबॉक्स, पोस्टवर आक्षेपार्ह शेरेबाजी, कमेंट्स केल्या जातात. आता, महिलांच्या होणाऱ्या डिजीटला छळाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेने बुधवारी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ‘भारतीय न्याय संहिता विधेयक २०२६’ …

Read More »

शेतरस्ता अडवला तर आधार कार्ड ब्लॉक, सरकारी योजनाही बंद

राज्यातील शेतकरी आणि त्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी बारमाही रस्ते असावेच लागतात, ती काळाची गरज आहे. पण ग्रामीण भागात शेतीच्या वादातून रस्ता अडवल्याचे प्रकार समोर आला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्या सरकारकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे. आता जर कुणी शेतरस्ता अडवला तर सरकारी योजनेचा लाभ बंद होणार आहे. त्याशिवाय फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक केले जाणार आहे. राज्य सरकारकडून यासाठी …

Read More »

स्टोव्ह काढा बाहेर…… शिधापत्रिका धारकांना मिळणार 3 लिटर केरोसीन

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा सामना देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून गॅसटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे गॅस एजन्सीमध्ये गॅस पुरवठ्याबाबत काही नियमावली तयार करण्यात आली असून व्यावसायिक गॅस पुरवठाही (Gas) बंद करण्यात आला आहे. त्यातच, आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं असून केंद्र सरकारकडून 37 लाख 44 हजार लिटर केरोसीनच्या वाटपास राज्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे, गॅस आल्यानंत कुठेतरी …

Read More »

संघर्षातूनच खरे जीवन फुलते-डॉ. स्मिता देऊळगावकर

सेलू( प्रतिनिधी ) आशा आपराद लिखित ‘ भोगिले जे दुःख त्याला ‘ या आत्मचरित्रात लेखिकेने सहन केलेले दुःख, अन्याय, अत्याचार यांचे वास्तववादी चित्रण केले आहे. संघर्ष हेच जीवन आहे. पण, संघर्षातून मृत्यू येत नाही तर जीवन फुलते. आपले जीवन बदलायचे असेल तर शिक्षण हिच उज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. हेच ‘ भोगिले जे दुःख त्याला’ या आत्मचरित्रातून शिकायला भेटते. असे प्रतिपादन …

Read More »

नमो शेतकरी महासन्मान निधी आला..थेट खात्यावर जमा

मुंबई, दि. २५ : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण द्वारे वितरित करण्यात आले. विधान भवन, मुंबई येथे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता वितरण समारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग व …

Read More »

लाडक्या बहिणींना दिलासा, फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात

राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले होते. अखेर या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सामाजिक न्याय विभागाने यासाठी 277 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. महिला व बालविकास …

Read More »

सेलूत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

सेलू ( प्रतिनिधी ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार ( दि. २३ ) रोजी शहरातील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या नियोजन बैठकीस परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी भेट देऊन सुसंवाद साधला. या प्रसंगी सेलूचे पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांची उपस्थिती होती. बैठकीत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि …

Read More »