04/02/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

पाथरीत निवडणूक नियुक्त कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

पाथरी प्रतिनिधी परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकी साठी नियुक्त केलेल्या केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी यांचे द्वितीय प्रशिक्षण आय टी आय कॉलेज विटा रोड पाथरी येथे शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 26 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी  श्रीमती संगीता चव्हाण व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार  शंकर एन हांदेशवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. निवडणूक निर्णय अधिकारी …

Read More »

विवेकानंद विद्यालय केवळ शिक्षणाचे केंद्र नसून शिस्त, गुणवत्ता आणि संस्काराचा त्रिवेणी संगम!

सेलू (प्रतिनिधी): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून ती शिस्त, गुणवत्ता ,संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी मातृसंस्था आहे. भारतीय संस्कृतीचे जतन करणारे आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे सुजाण नागरिक या विद्यालयात घडवले जातात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. ज्योती दीपकसिंह ठाकूर यांनी केले. विवेकानंद विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी …

Read More »

सेलूत शिष्यवृत्ती परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद- 555 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

सेलू दि ०२(प्रतिनिधी.)येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात आज दि ०२ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय शिष्यवृती परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये तब्बल 555 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. शिक्षण विभाग पंचायत समिती सेलू व श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने व कल्याणम एज्युकेशन सोसायटी व श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय माजी विद्यार्थी संघ आयोजित इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी …

Read More »

वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार ,मराठवाडयात वातावरणात मोठे बदल

महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीला वातावरणात मोठे बदल दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावासाने हजेरी लावली असून मुंबई, ठाणे, पुणे शहरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. या आठवड्यासाठी हवामान विभागाने काय संकेत दिले आहेत ते जाणून घेऊया. राज्यात पुढील काही दिवसांत वातावरण झपाट्यानं बदलणार असून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना IMD कडून यलो अलर्ट …

Read More »

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या महत्त्वाच्या बस स्थानकावर लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढले आहे. अनेक जणांनी आपले दागिने व रोख रक्कम यामध्ये गमावले आहे. तसेच या बस स्थानकावरून हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी देखील दररोज मोठ्या संख्येने ये-जा करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न …

Read More »

सुनेत्रा पवार नव्या उपमुख्यमंत्री,राजभवनात घेतली शपथ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक …

Read More »

योद्धा is Back,शरद पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये

पुणे,दि 30 ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती व येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची भावना ही पोरकेपणाची झाली होती. परंतु, आज अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे स्वतः बारामतीमध्ये सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज बारामती येथे शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी करण्यात आली. अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. …

Read More »

जिल्हा परिषदेची निवडणुक पुढे ढकलली….

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी …

Read More »

महाराष्ट्राचे लाडके अजित दादा पवार पंचत्वात विलीन,लाखोंच्या जनसागराचा भावूक निरोप

महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला. तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीच्या पार्थिवावर गंगाजल अर्पण करून अंतिम निरोप दिला. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित …

Read More »

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कथाकथन, स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाचा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मंगळवार ( दि. २७ ) कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कथाकार डॉ. राजाराम झोडगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रमेश बोराडे, ज्येष्ठ कवी धोंडोपंत मानवतकर यांची उपस्थिती होती. डॉ. रमेश बोराडे यांनी ‘ माझ्या मेव्हूण्याचं लगीन ‘ ही विनोदी …

Read More »

विवेकानंद विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे बक्षीस वितरण

सेलू (प्रतिनिधी): येथील विवेकानंद प्राथमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या वतीने वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरवलेल्या आकर्षक चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या विविध चित्रांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष साइराज बोराडे हे …

Read More »

‘शासकीय दुखवटा’ जाहीर, या काळात काय असतात नियम?

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने आज २८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण राज्यात ‘शासकीय सुट्टी’ आणि ‘राजकीय दुखवटा’ जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला …

Read More »

बारामती रन वेवर जाऊन शरद पवारांनी घेतली माहिती, मन हेलावणारे दृश्य

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात (Ajit Pawar Baramati Plane Crash) झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झाला. यावेळी  शरद पवारांनी थेट बारामती गाठली आणि हेलिकॉप्टरमधून उतरताच हा अपघात कसा झाला याची माहिती घेतली.   शरद पवार हे मुंबईत सिल्वर ओक या निवासस्थानी होते. अजित पवार …

Read More »

घड्याळावरुन ओळख पटली, ‘दादांच्या एक्झिट’ची थरारक कहाणी

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. बुधवारी सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजितदादा आपली सर्व कामे उरकून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतून निघाले. बारामतीत लँडिंगवेळी, 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र सुन्न झाल्याचं दिसून येतंय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

विमान क्रॅश होण्यामागे काय कारणे असू शकतात?सुमारे 35 मिनिटे हवेत फिरत राहिले

जेव्हा विमान खाली येत होते, तेव्हा 100 फूट वरूनच वाटू लागले की ते क्रॅश होईल.’ ‘अजित पवारांचे विमान लँडिंग करण्यापूर्वी सुमारे 35 मिनिटे हवेत फिरत राहिले होते.’ ‘अजित पवारांचे विमान धावपट्टीजवळ येऊन परत हवेत गेले आणि गिरकी घेऊन परत खाली पडले’ महाराष्ट्रातील बारामती विमानतळाजवळ उपस्थित प्रत्यक्षदर्शी या गोष्टी सांगत आहेत. याच अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 5 जणांसह मृत्यू …

Read More »