11/07/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

स्मार्ट मीटर की दुसरं काही? वीजबिल वाढीचं खरं कारण आलं समोर!

Do smart meters cause bills to increase? मुंबई – राज्यात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात अचानक वाढ झाल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे ही वाढ स्मार्ट मीटरमुळेच होत असल्याचा समज सर्वसामान्यांमध्ये पसरला आहे. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत स्मार्ट मीटर नव्हे, तर वाढलेला वीज वापर आणि राज्यातील ‘टेलिस्कोपिक’ वीजदर रचना यामुळे बिल वाढत असल्याचे स्पष्ट …

Read More »

राज्यासाठी हवामानाचा नवा अंदाज; हवामान खात्याने दिला मोठा इशारा

Maharashtra Weather Update News मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावत मान्सूनने जूनमधील पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून काढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, हा दिलासा फार काळ टिकण्याची शक्यता नसून, राज्यात मान्सूनच्या प्रवासाला पुन्हा एकदा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, १० ते १५ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून …

Read More »

‘कलम १५५’ चा गैरवापर महागात! १५ महसूल अधिकारी निलंबित; काहींवर गुन्हे, तर काहींना सेवेतून बडतर्फीची तयारी

Maharashtra 15 Revenue Officers Suspended पुणे : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर करून जमिनींच्या नोंदींमध्ये बेकायदेशीर फेरफार केल्याप्रकरणी पुणे विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यासह १५ महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गंभीर दोषी आढळणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचीही तयारी सुरू असल्याचे …

Read More »

IIT ते COEP! महाराष्ट्रातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणती?

Best Engineering / BTech Colleges in Maharashtra लेखात आपण महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग शिक्षणासाठी आघाडीची महाविद्यालये जाणून घेऊयात. १. IIT बॉम्बे (Indian Institute of Technology Bombay) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) ही इंजिनिअरिंग शिक्षणासाठी महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकावरील संस्था आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण, अत्याधुनिक संशोधन सुविधा, उत्कृष्ट प्राध्यापक आणि देश-विदेशातील आघाडीच्या कंपन्यांमधील प्लेसमेंटमुळे ही संस्था विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरते. संस्थेने ‘एनआयआरएफ …

Read More »

पहिली कर्जमाफी कोणी केली? कसा होता निर्णय….

Who implemented the first loan waiver? शेती आणि नैसर्गिक संकटे यांचे नाते फार जुने आहे. अगदी राजे-महाराजांच्या काळातही तीन वर्षांतून एकदा तरी पीक हातचे जायचे, अशी नोंद इतिहासात आढळते. त्यावेळी संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असल्याने राजे संकटाच्या काळात शेतसारा (कर) माफ करायचे. काही राजांनी तर शेतीचा विकास व्हावा म्हणून कर्ज पुरवल्याचेही दाखले आहेत. परंतु, ते तात्पुरते निर्णय होते. सध्याही हवामान …

Read More »

विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफी जाहीर

मुंबई  – राज्यातील बळीराजासाठी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी ५० हजार रुपये भरण्याची जाचक अट सरकारने पूर्णपणे काढून टाकली आहे. यामुळे राज्यातील तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील …

Read More »

BLO ड्युटीचा ताण जीवावर? शिक्षक रवि स्वामी यांचे हृदयविकाराने निधन; व्यवस्थेवर गंभीर आरोप

कामाच्या ताणामुळे शिक्षकाचा मृत्यू? शांतीनिकेतन विद्यालयाचे सहशिक्षक रवि स्वामी यांचे निधन; शिक्षक परिषदेची शासनाकडे १ कोटींच्या मदतीची मागणी परभणी / प्रतिनिधी – परभणी शहरातील गंगाखेड रोडवरील शांतीनिकेतन विद्यालयात कार्यरत असलेले सहशिक्षक रवि शिवलिंग स्वामी (वय ५४) यांचे गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, सततच्या प्रशासकीय कामांच्या ताणामुळे …

Read More »

नुकसानग्रस्तांना मदत, भूकंपरोधक घरकुलांना प्राधान्य

हिंगोली , दि. 9 : वसमत तालुक्यातील शिरली-पांगरा शिंदे, काकडदाभा येथे गुरुवारी मध्यरात्री चार सौम्य भूकंपाचे धक्के बसले. त्या धक्क्याची तीग्रता 4.6 रिश्टर स्केल अशी नोंदवली गेली. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सकाळी तातडीने पांगरा शिंदे व खापरखेडा या गावांना भेट देऊन भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण, संबंधित विभागाचे …

Read More »

नांदेडमध्ये पत्त्यासारखा कोसळला उड्डाणपुलाचा भाग

शहराजवळील अत्यंत वर्दळीच्या नांदेड-लातूर महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली. विष्णुपूरी येथे उड्डाणपुलाचा बाजूचा खालचा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. या दुर्दैवी घटनेत दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. या रस्त्याचे काम अद्याप प्रगतीपथावर असतानाच पूल …

Read More »

दूध तापवताच तयार झाला रबरसदृश पदार्थ; पूर्णेत खळबळ, अन्न भेसळीच्या संशयाने चौकशी सुरू

पूर्णा | प्रतिनिधी पूर्णा शहरात दूध भेसळीचा संशय निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली असून, घरात तापवण्यासाठी ठेवलेल्या दुधाचे रबरसदृश घट्ट पदार्थात रूपांतर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित दूध विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. माहितीनुसार, शहरातील कोळीवाडा परिसरातील धारेश्वर संतोष भंगे यांनी सराफा बाजार परिसरात दूध विक्री करणाऱ्या …

Read More »

नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये हनिमूनसाठी सजवला First AC कोच; व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वेची मोठी कारवाई

First AC coach of Nandigram Express decorated for a honeymoon First AC coach of Nandigram Express decorated for a honeymoon परभणी – नंदीग्राम एक्स्प्रेसमधील हनिमून सजावट प्रकरणामुळे रेल्वे प्रशासनाला मोठी कारवाई करावी लागली आहे. मुंबई–बल्लारशाह दरम्यान धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसच्या First AC कोचमध्ये नवविवाहित जोडप्यासाठी फुले, फुगे आणि सजावटीच्या साहित्याने केबिन सजवण्यात आली होती. या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात …

Read More »

BREAKING: मराठवाडा पुन्हा हादरला! सलग 4 भूकंपाचे धक्के

परभणी, दि. ९ : परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत आज (९ जुलै) पहाटे एका पाठोपाठ एक असे भूकंपाचे चार सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या भूकंपांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.   पहाटे १:३७ वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्याची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. त्यानंतर २:१५ वाजता …

Read More »

महाराष्ट्रात ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य:प्रवासी सुरक्षेसह भाषिक स्वाभिमानाचा नवा अध्याय

“मराठी ही कोणाला दूर करणारी भाषा नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे.” या भावनेतून महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून, 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात …

Read More »

महिलांच्या सक्षमीकरणांसाठी काम करणाऱ्या महिलांनी राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

परभणी, दि. ८  : महिलांच्या सक्षमीकरणासाठी कामकाज करणाऱ्या महिलांची दखल घेण्याकरीता केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी (पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण व इतर) नामांकन सादर करण्यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल व संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे.   नामांकन दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत सादर करता येणार असून, पुरस्कारांची घोषणा दि. २६ जानेवारी २०२७ रोजी करण्यात येणार आहे.   पुरस्कारासाठी पात्र …

Read More »

एका दिवसासाठी CM झालात तर?:तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर; म्हणाले..

who is Tukaram Mundhe ? राज्यातील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर सुरू असलेल्या कठोर मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असतानाच, एका मुलाखतीत त्यांनी ‘एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर काय कराल?’ या प्रश्नावर दिलेल्या उत्तराचीही मोठी चर्चा होत आहे.   एफडीएचा पदभार …

Read More »