30/07/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

ऑगस्टमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या

जुननंतर आता जुलै महिना संपला. विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन 2 महिने झाले. 1 सेमिस्टरची परीक्षादेखील जवळ आलीय. दरम्यान येऊ घातलेल्या ऑगस्ट महिन्याकडून विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. कारण ऑगस्ट महिना अनेक सण घेऊन येत असून यानिमित्ताने विद्यार्थ्यांची मजा होणार आहे. त्यामुळे ऑगस्ट 2026 हा महिना विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांच्या दृष्टीने दिलासादायक ठरणार आहे. स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, ईद-ए-मिलाद यांसारख्या राष्ट्रीय आणि धार्मिक सणांसह शनिवार-रविवारच्या नियमित सुट्ट्यांमुळे …

Read More »

राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांच्या सिबिलवर कर्जमाफीची टांगती तलवार

हिंगोली | प्रतिनिधी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’ अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत सरकारकडून संपूर्ण कर्जफेड न करता काही रक्कम सरकार भरणार असून उर्वरित रक्कम संबंधित बँकांनी माफ करायची असल्याने ही प्रक्रिया वन टाइम सेटलमेंट (OTS) पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यातील सुमारे …

Read More »

समाजसेवेला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड; धार्मिक व सामाजिक संस्थांसाठी SAMAVET बनत आहे विश्वासार्ह तंत्रज्ञान भागीदार

पुणे  ,दि 30 (प्रतिनिधी)ः भारतात डिजिटल परिवर्तनाचा वेग सातत्याने वाढत असून त्याचा प्रभाव आता धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक संस्थांच्या कामकाजावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या ट्रस्ट, मंदिरे, गणेश मंडळे आणि स्वयंसेवी संस्था आता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अधिक पारदर्शक, प्रभावी आणि सुटसुटीत व्यवस्थापनाकडे वाटचाल करत आहेत. या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेला SAMAVET – India’s Community …

Read More »

पालम येथे 06 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

परभणी, दि. 30 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी व माधवराव पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पालम आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित), नाशिक, शाखा पालम यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 06 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या कालावधीत पालम येथील माधवराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे …

Read More »

बँक खात्यांतील तफावतीबाबत काळजी करू नका, कृषीमंत्र्यांनी दिली माहीती

राज्यातील ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांच्या आत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे काहीही कारण नाही. ती उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडूनच वर्ग केली जाणार आहे. कर्जमाफी प्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज वाटप करणे शक्य होणार …

Read More »

५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांसाठी अल्टिमेटम,निर्णायक आंदोलनाची मोठी घोषणा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटी येथून त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ५८ लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलनाची मोठी घोषणा केली आहे. समाजाला वेड्यात काढले जात असल्याचा आरोप करत जरांगे यांनी आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकले आहे. ५८ लाख प्रमाणपत्रांसाठी अल्टिमेटम मनोज जरांगे म्हणाले, …

Read More »

NCMC स्मार्ट कार्डसाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड  अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बसमधील योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक  यांनी दिली. यापूर्वी 1 ऑगस्टपासून हे कार्ड …

Read More »

पेपरफुटी प्रकरणी तक्रारदार तरुण अखेर आला समोर, सगळं सांगितलं

नीट पेपर लिक प्रकरणी देशभरात जन आंदोलनाचा भडका उडाला आणि अखेरीस केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. ही घटना ताजी असताना महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपर लिक झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यानंतर आता तक्रारदार सुद्धा समोर आला आहे.  तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे याने संशयितांच्या मोबाईल फॉरेन्सिक आणि CBI …

Read More »

श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कारासाठी डॉ. पवन चांडक यांची निवड

परभणी,दि 27  प्रतिनिधी सन २०२६ चा ‘श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार’ परभणी येथील डॉ. पवन चांडक यांना जाहीर झाला आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, मोबाईल व्यसनमुक्तीचा संदेश देणे आणि पुस्तकांशी विद्यार्थ्यांची मैत्री घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या दिवंगत श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ येथील ‘संडे क्लब’ आणि …

Read More »

आता जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन, सीजेपीची तडकाफडकी मोठी घोषणा

: कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचे दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन संपलेले आहे. हे आंदोलन संपलेले असले तरीही सीजेपीची चर्चा मात्र अजूनही सुरूच आहे. आंदोलन मागे घेताना सरकार कोणत्याही आंदोलकाविरोधात गुन्हा दाखल करणार नाही, कोणावरही पोलीस कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आश्वासन मिळालेले असले तरीही देशभरात अनेक ठिकाणी सीजेपीच्या आंदोलकांवर कारवाई केली जात आहे, असा आरोप सीजेपीने केला आहे. …

Read More »

परभणी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची माहिती…

परभणी / प्रतिनिधी – परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य रायझिंग मेन पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले असून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे जल अभियंता तन्वीर बेग यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, गौतमनगर परिसरात मुख्य रायझिंग मेन पाइपलाइन फुटल्याने गेल्या आठवड्यापासून परभणी शहराचा पाणीपुरवठा बंद होता. या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे …

Read More »

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

सेलू न्यायालयाचा धनादेशाच्या दुप्पट रकमेची नुकसान भरपाई देण्याचा आदेश सेलू / प्रतिनिधी : धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणातील दोन स्वतंत्र खटल्यांमध्ये न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सेलू येथील मा. न्यायाधीश गौरव अ. तराळ यांनी आरोपीस दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, संबंधित धनादेशांच्या दुप्पट रकमेची नुकसानभरपाई फिर्यादीस एका महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश दिले आहेत. हा निकाल दि. २२ जुलै २०२६ …

Read More »

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची मोठी घोषणा; उद्याचा मोर्चा होणार की नाही?

मुंबई – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, या आंदोलनात सहभागी झालेल्या अभिजीत दिपके आणि देशभरातील सर्व तरुणांचे मनापासून अभिनंदन. आंदोलनाला निर्भयपणे पाठिंबा देणाऱ्या पालकांचेही …

Read More »

धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा; महिनाभराच्या आंदोलनानंतर मोठा निर्णय, जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचा जल्लोष

Dharmendra Pradhan Latest News नवी दिल्ली | २५ जुलै : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (२५ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. NEET पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने देशभर आंदोलन छेडले होते. शिक्षणमंत्री …

Read More »

प्रवासात पब्लिक जागांवर मोबाईल चार्जिंग करता ? सावधान हे वाचा

Public Charging Station Scam मोबाईल चार्जिंगची समस्या प्रवासात सर्वाधिक भेडसावत असते. त्यामुळे अनेकदा रेल्वे प्रवासी प्रवासात पर्सनल चार्जर, केबल वा पॉवर बँक सोबत बाळगत नाहीत. त्यामुळे प्रवासात मोबाईल चार्जिंग एक मोठी समस्या ठरत असते. यामुळे एअरपोर्ट, रेल्वे स्थानक वा अन्य पब्लिक जागांवर उपस्थित असलेल्या चार्जिंग स्टेशनचा वापर नाईलाजाने प्रवाशांना करावा लागतो. मात्र, असे केल्याने तुमच्या मोबाईलचा डाटा आणि तसेच बँक …

Read More »