07/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

गंगाखेडचा इतिहास ढासळला… आता तरी प्रशासन जागे होणार का?

अतिक्रमण, दुर्लक्ष आणि राजकीय मौनामुळे शतकांचा वारसा संकटात गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा – गंगाखेड शहराचा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा बळी ठरला आहे. मोठ्या मारोती मंदिरासमोरील शतकांपूर्वीचा ऐतिहासिक बुरुज कोसळला आणि त्यासोबतच इतिहास संवर्धनाच्या दाव्यांचाही मुखवटा गळून पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र शतकांचा इतिहास अक्षरशः मातीत मिळाला.     निजामशाही काळातील किल्लेनगरी म्हणून ओळख असलेल्या गंगाखेडमध्ये एकेकाळी …

Read More »

आयुष्मान कार्ड, वय वंदना कार्ड निर्मितीसाठी परभणी जिल्ह्यात तीन महिन्यांची विशेष मोहीम

Ayushman Card campaign in Parbhani! Target to complete eKYC within 3 months. परभणी, दि. १७ : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड (eKYC) तसेच ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वय वंदना कार्ड निर्मिती व वितरणाला गती देण्यासाठी जिल्ह्यात पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.     परभणी …

Read More »

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

जयंत पाटील आणि माझी वर्षा बंगल्यावर भेट झाली नाही. ते त्यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात तिथे गेले होते हे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील जे प्रश्न केंद्र सरकारकडे राखीव आहेत त्यावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, जर भेट राजकीय असती तर आम्ही त्याबद्दल सुनेत्रा पवारांना माहिती दिली असती. जो आदर आम्ही दादांचा करत होतो तोच आदर आम्ही सुनेत्रा पवार यांचा …

Read More »

वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार अनेक महत्त्वाची विधेयके मांडणार असून, त्यामध्ये वंदे मातरम् विधेयकाचाही समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या विधेयकाचा उद्देश ‘वंदे मातरम्’चे गायन किंवा वादन करताना त्याचा अपमान करणे किंवा त्यात अडथळा निर्माण करणे हा दंडनीय गुन्हा ठरवणे हा आहे. …

Read More »

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी (दि. १७) सर्वानुमते करण्यात आली. संघटनेच्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्षपदी सचिन रायपत्रीवार, तर सचिवपदी दिलीप देवकर यांची निवड करण्यात आली. ही बैठक व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण …

Read More »

गुंज संस्थानचे प. पू. कालिदास महाराज बोरीकर यांचे अपघाती निर्वाण

नारायण पाटील सेलु,दि 17 शिवाश्रम, गुंज, ता. पाथरी जि. परभणी येथील प. पू. कालिदास महाराज बोरीकर यांचे आज शुक्रवार, १७ रोजी सकाळी अपघातात दुर्दैवी निधन झाले. गुजरात मधील गरुडेश्वर येथील एक धार्मिक कार्यक्रम आटोपून महाराज छत्रपती संभाजीनगर येथे येत होते. धुळे-सोलापूर महामार्गावर संभाजीनगर शहराच्या जवळच असलेल्या निपाणी फाट्याजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती कळताच महाराजांचा शिष्यपरिवार धावून …

Read More »

सोन्याचे भाव तब्बल ३,००० रुपयांनी तर चांदी ७,००० रुपयांनी घसरले

मुंबई : लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर बाजारातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. या आठवड्यात सोन्याचे भाव तब्बल ३,००० रुपयांनी तर चांदी ७,००० रुपयांनी घसरले आहेत. या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी ‘येत्या आठवड्यात सोने-चांदी आणखी स्वस्त होणार की पुन्हा भाव गगनाला भिडणार?’ हा सर्वात मोठा प्रश्न …

Read More »

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील गोपेगाव येथील शेतकऱ्याने सदोष कापूस बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीबाबत दाखल केलेल्या दिवाणी दाव्यात गंगाखेड येथील दिवाणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने अजीत सीड्स लिमिटेड आणि त्यांच्या अधिकृत विक्रेत्याला शेतकऱ्यास १ लाख ५० हजार रुपये नुकसानभरपाई तसेच दावा दाखल केल्याच्या तारखेपासून निकालापर्यंत ९ टक्के वार्षिक …

Read More »

लाडक्या बहि‍णींना दणका; १०० कोटींची योजना बंद

मुंबई – राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने आर्थिक भाराचे कारण देत वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविण्यात येणारी **’मोफत साडी (कॅप्टिव्ह मार्केट) योजना’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यातील सुमारे २५ लाख अंत्योदय कुटुंबांतील महिलांना मोफत साडी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत …

Read More »

सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडायला हवं?

सध्याचं जग गाढवासमोर वाचली गीता यासारखं आहे. कोणी कोणाचं ऐकतच नाही व कोणाला कोणाचं ऐकून घ्यायलाही अजिबात वेळ नाही. सध्या होत असलेलं सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण. ज्या उपोषणाचा मुख्य मुद्दाच धर्मेश प्रधानचा राजीनामा आहे. नीट पेपर फुटतांना भ्रष्टाचार झाला. हे कॉक्रोज जनता पार्टीचं म्हणणं. ज्याला उपोषणानं सोनम वांगचूक यांनी समर्थन दिलं. ज्यात धर्मेश प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा. असं …

Read More »

प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती चितांची राख उडणार?

विवेक मुंदडा / शब्दराज मीडिया परभणी शहरात अपघात आता अपवाद राहिलेले नाहीत; ते जणू नित्याचे वास्तव बनले आहेत. प्रत्येक अपघातानंतर काही तास संताप व्यक्त होतो, शोकसभा होतात, चौकशीचे आदेश दिले जातात आणि काही दिवसांत सर्व काही विस्मरणात जाते. मात्र, ज्यांच्या घरातील कर्ता व्यक्ती कायमची निघून जाते, त्यांच्यासाठी हा अपघात आयुष्यभर न भरून येणारी जखम ठरतो.     हिंगोली वनविभागात वनरक्षक …

Read More »

भ्रष्टाचाराविरोधातील लढा कोणत्याही दबावाला न जुमानता सुरूच ठेवणार; मारहाण प्रकरणी महेश बिडकर आक्रमक

“प्रश्न विचारले म्हणून मारहाण? बिडकरांचा थेट सवाल; भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार!” दै. शब्दराज / रामप्रसाद ओझा, गंगाखेड – लोकशाहीमध्ये जनतेने आणि माध्यमांनी लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारू नयेत का? प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे परखड मत धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते महेश बिडकर यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचाराविरोधातील आपला …

Read More »

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाड्या; नांदेड, परभणीसह मराठवाड्यातील भाविकांना मोठा दिलासा

Special Trains for Pandharpur Yatra नांदेड – पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे नांदेड विभागासह मराठवाड्यातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे.   विशेष रेल्वेगाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : गाडी क्रमांक 07631 नगरसुल–पंढरपूर विशेष ही गाडी शुक्रवार, २४ जुलै २०२६ …

Read More »

कचरा व्यवस्थापन क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा? ‘अमृत-सक्षम’ उपक्रमात करा नोंदणी

Waste Management Business Maharashtra परभणी – महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता, वेगाने विकसित होत असलेले हरित उद्योग क्षेत्र बनत आहे. वाढते शहरीकरण, पर्यावरणीय नियम आणि पुनर्वापर याविषयी वाढलेली जागरूकता यामुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘अमृत’ आणि ‘कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत-सक्षम’ हा उद्योजकता विकास उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात …

Read More »

राज्यात पावसाची पुन्हा ओढ; तापमानात वाढ, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Todays Maharashtra Weather Update 14 july 2026 मुंबई – राज्यात यंदा हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्रपणे जाणवत असून, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीचा यंदाच्या मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा चढ-उतारांचा राहण्याचा अंदाज आहे.   यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना दीर्घकाळ तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. अनेक भागांत उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जूनमध्ये …

Read More »