25/06/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

पान टपरी चालकांमध्ये प्रचंड घबराट,पान टपऱ्या पटापट बंद

 प्रशासकीय वर्तुळात आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कारभारासाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासन (आयुक्त तुकाराम मुंढे आज नांदेड दौऱ्यावर आल्याची एकच अफवा शहरात पसरली. या एकाच अफवेने शहरातील पान टपरी चालकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आणि कारवाईच्या भीतीपोटी दुपारनंतर शहरातील मुख्य भागातील पान टपऱ्या पटापट बंद झाल्या. अनेक टपरी चालक तर टपऱ्या कुलूपबंद करून थेट पसार झाले. तुकाराम मुंढे यांनी …

Read More »

समन्वय समितीच्या बैठकीत सिईओंकडून सर्व विभागाचा आढावा

हिंगोली, (दि. 16 ) जिल्हा परिषद हिंगोली येथील सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज समन्वय समितीची बैठक पार पडली यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सा. प्र.) समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

भारतीय संस्कृती सर्वांचा सन्मान करायला शिकविते – पद्मनाभ महाराज व्यास

सेलू( प्रतिनिधी ) सृष्टीतील सर्व जिवात्मे समान आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येकात भगवंताचे अस्तित्व आहे, त्यामुळे कुणाचाच द्वेष करू नये. भारतीय संस्कृती जिवमात्रासह वृक्षवल्ली, पशूपक्षी, पर्यावरण, सर्वांचा सन्मान करायला शिकविते, असे प्रतिपादन वे.शा.सं.ह.भ.प. पद्मनाभ व्यास महाराज यांनी केले आहे.ते शहरातील साई मंदिर, ‘भक्तितीर्थ’ परीसरात, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भागवत कथेत भाविकांना आशीर्वचनपर सोमवार (दि.१५) रोजी तीसरे पुष्प गुंफताना बोलत होते. …

Read More »

 ‘वनामकृवि’ व ‘मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र’ यांच्यात सामंजस्य करार!

हिंगोली: मराठवाडा व राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि हळद प्रक्रियेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (VNMKV) आणि मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत (जि. हिंगोली) यांच्यात आज एका महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आली. हरिद्रा संशोधन केंद्राचे सन्माननीय अध्यक्ष मा. ना. श्री हेमंत पाटील …

Read More »

अवैध रेती वाहतूकीचे टिप्पर जप्त, चालकासह मालकावर गुन्हा

पुर्णा, ता. १५ (प्रतिनिधी) पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधात परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने रविवारी धडक कारवाई करत रेतीने भरलेला टिप्पर जप्त केला. या कारवाईत चालकाला रंगेहाथ पकडण्यात आले असून चालकासह टिप्पर मालकाविरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक रविवारी अवैध धंद्यांविरोधात गस्त …

Read More »

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध,मोर्चातून निषेध नोंदवत मूख्यमंत्र्यांना निवेदन.

सेलू( प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली सुरू असून त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘अनंत बदर समिती’च्या कार्यपद्धतीबाबत जनतेमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे.या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी तालुक्यातील समस्त आंबेडकरी, संविधानप्रेमी नागरिक,सामाजिक संघटना आणि अनुसूचित जातीतील बांधवांच्या वतीने मोर्च्याच्यामाध्यमातून निषेध नोंदवत उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मूख्यमंत्री देवेंद्र फडणविस …

Read More »

आजच्या युगात भक्तिसारखा दुसरा योग्य मार्ग नाही – पद्मनाभ महाराज व्यास

सेलू( प्रतिनिधी ) माणसाला दैनंदिन जीवनात पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीमद् भागवतात आहेत. भागवत हे सर्व सांसारिक लोकांकरिता आहे. भक्ती ही मोह,शोक मुक्तीच माध्यम आहे. आजच्या युगात भक्तिसारखा दुसरा योग्य मार्ग नाही. भक्तिमार्गानेच माणसाचे परमकल्याण होते. सर्व प्रकारचे आचार,कर्म भगवंताला अर्पण करणे म्हणजे भक्ती. भक्तीने मन स्वच्छ, प्रसन्न होते.असे प्रतिपादन वे.शा.सं.ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास ( धाराशिव) यांनी केले. कुलकर्णी परिवाराच्या वतीने …

Read More »

गुणापेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्यावे- महेश पाटील

गंगाखेड (प्रतिनिधी) — आपल्या पाल्याचे करिअर घडवताना केवळ मार्कशीटकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. गुणवत्तेवर भर दिल्यास यशाचा मार्ग अधिक सुलभ होतो, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ  महेश पाटील यांनी केले. परशुराम सेवा समिती व सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने गंगाखेड येथील भगवान परशुराम चौकातील गीता मंडळ सभागृहात तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थी व …

Read More »

आडगाव जिल्हा परिषद शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव

हिंगोली(प्रतिनिधी) स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. याप्रसंगी शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नव्याने प्रवेश घेणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थ्यांना हार आणि पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत …

Read More »

क्रीडा संस्कृती म्हणजे आरोग्य आणि एकीचा पाया – आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

गंगाखेड (प्रतिनिधी) : शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी क्रीडा संस्कृती ही तणावमुक्ती, आरोग्य आणि सामाजिक एकीचा मजबूत पाया आहे, असे प्रतिपादन डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले. शहरातील क्रीडा संकुलाच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते. दररोज किमान ३० मिनिटे खेळ केल्यास लठ्ठपणा, मधुमेह व रक्तदाबासारखे आजार दूर राहतात. कबड्डी, खो-खो, कुस्ती यांसारखे पारंपरिक खेळ तरुणांना नशा व मोबाईलच्या आहारी जाण्यापासून दूर ठेवून …

Read More »

महायुतीचा विजय होणार,आ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला विश्वास

परभणी,दि 15 परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  गंगाखेड येथे महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी सोमवारी दि.15 रोजी  आमदार रत्नाकर गुट्टे  यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.आमदार रत्नाकर गुट्टे  यांनी महायुतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त करत भरघोस पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सईद खान व आमदार गुट्टे यांच्यात आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. आमदार रत्नाकर गुट्टे  यांनी महायुतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त करत …

Read More »

कानडखेड शिवारातील विहिरीत ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

पुर्णा, ता. १४ (प्रतिनिधी): तालुक्यातील कानडखेड शिवारातील एका विहिरीत अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी (ता. १३) सकाळी ही घटना उघडकीस आली असून, पुर्णा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा शहरातील महात्मा गांधी रोड येथील व्यापारी प्रेमचंद नेमीचंद खिंवसरा हे शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कानडखेड शिवारातील …

Read More »

श्रीमद् भागवत जीवन समृद्ध करणारा ग्रंथ – पद्मनाभ महाराज व्यास

सेलू,ता 14 माणसे ज्याचे ध्यान करतात त्याचे गुण माणसात येतात. त्यामुळे जीवन उद्धारक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करावे. शुद्ध क्रीया, कृती, शब्द, विचार, ध्वनीने मंगलाचरण घडते. संकल्प शक्तीशाली असेल तरच तो सिध्दीस जातो. आपल्या ह्रदयातील ईश्वराचा साक्षात्कार करून देणे हे भागवताचे प्रयोजन आहे. श्रीमद् भागवत जीवन समृद्ध करणारा ग्रंथ आहे. असे प्रतिपादन वे.शा.सं.ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास ( धाराशिव) यांनी केले. कुलकर्णी …

Read More »

सईद खान यांच्या विजयासाठी  महायुती एकवटली,आजी- माजी लोकप्रतिनिधींचा भक्कम पाठींबा

परभणी,ता 14 परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक रंगतदार असून तिरंगी लढतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयासाठी संपूर्ण महायुती एकवटली असल्याचे चित्र सध्यातरी निर्माण झाली आहे. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना अल्पसंख्या विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना उमेदवारी देण्यात आली.महायुतीचे पारडे भक्कम झाल्याचे चित्र आहे. महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयासाठी पालकमंत्री …

Read More »

श्रावंती चव्हाण यांना पीएच.डी.पदवी प्रदान

गंगाखेड /प्रतिनिधी येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कला शाखेतील गुणवंत विद्यार्थिनी कु.श्रावंती श्रीराम चव्हाण यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांनी नुकतीच पीएच.डी.पदवी प्रदान केली आहे.श्रावंती चव्हाण यांनी तत्त्वज्ञान विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मानवतावादी तत्त्वज्ञान एक चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन करून विद्यापीठाकडे शोधप्रबंध सादर केला होता.विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा प्लेग्रिझम अहवाल …

Read More »