मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यानी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात धनु्ष्य बाण हाती घेतला आहे. विशेष म्हणजे बच्चू कडू हे एकेकाळी शिवसेनेत होते. मात्र, त्यांनी वेगळी वाट निवडत प्रहार सामाजिक संघटनेतून राजकीय-सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत …
Read More »राजकारण
लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी घोषणा
राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने आता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ई-केवायसीची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून, सुरुवातीला नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 31 डिसेंबर, 31 मार्च आणि आता पुन्हा एकदा 30 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, केवायसी पोर्टल वारंवार बंद राहणे, तांत्रिक अडचणी …
Read More »युध्दाचा परिणाम….शाम्पू, तेल, बिस्कीट महाग होणार ?…
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण देशाला वेगवेगळ्या पातळीवर फटका बसत आहे. भारतासह अनेक देशांत उर्जासंकट निर्माण झाले आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायूच्या कमतरतेमुळे इंधनाचा भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जलवाहतूक ठप्प पडली असून भारतात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी कच्चा माल कमी पडत आहे. याच सर्व गोष्टींचा फटका बसायला आता सुरुवात झाली आहे. …
Read More »देशभर चर्चा, पण तरीही आपची राघव चड्डांवर कारवाई;
आम आदमी पार्टीने राज्यसभेत मोठा संघटनात्मक बदल करत सर्वांनाच धक्का दिला आहे. पक्षाचे तरुण आणि आक्रमक चेहरा मानले जाणारे राघव चड्डा यांना राज्यसभेतील ‘उपनेते’ पदावरून तडकाफडकी हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी अशोककुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, राघव चड्डा यांची हकालपट्टी का झाली? याबाबत आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राघव चड्ढा यांची गच्छंती होण्यामागे केवळ …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईतल्या वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली. गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी मुंबईतल्या वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. …
Read More »15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश
राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जिल्हा परिषदा निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून आचारसंहिता लागू होऊ शकते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात दाखल जालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. निवडणुकांचे निकाल जाहीर …
Read More »‘अंडरवेअर’ने घोळ केला, सत्ताधारी आमदार तुरूंगात गेला; खुर्चीही गमावली
केरळचे माजी मंत्री आणि सत्ताधारी डावी आघाडी एलडीएफचे आमदार एंटनी राजू यांना २५ वर्ष जुन्या प्रकरणात कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. केरळच्या नेडुमंगाजडच्या दंडधिकारी कोर्टाने ‘अंडरवेअर ड्रग्स’ प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राजू यांनी १९९० साली ज्युनिअर वकील म्हणून केस लढवली होती. केस लढताना त्यांनी पुराव्यांशी छेडछाड केली होती. ‘अंडरवेअर ड्रग्स’ प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा मिळाल्याने एंटनी राजू यांची आमदारकी जाणार …
Read More »बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे झाले पानिपत
राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी प्रभाव टाकू शकणाऱ्या आणि देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्याच्यादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आज सकाळी आठ वाजता आधी पोस्टल आणि नंतर ईव्हीएम यंत्रातील मतांच्या मोजणीला सुरुवात झाली. यामध्ये सुरुवातीचा एक तास वगळता राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. सध्याच्या कलांनुसार, बिहारमध्ये भाजप 84, जदयू 78 जागांवर आघाडीवर …
Read More »मुख्यमंत्री सोडुन संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा..
ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्राशेजारील गुजरातमध्ये राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत. नवीन मंत्रिमंडळ स्थापनेची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पटेल गुरुवारी रात्री राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतील आणि नवीन सरकार स्थापनेचा दावा करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन मंत्र्यांचा …
Read More »धनुष्यबाण कोणाकडे…निर्णय पुन्हा
जवळपास गेल्या अडीच-तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालय बुधवारी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल देईल, अशी चर्चा कालपासून रंगली होती. मात्र, ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भात एक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीला आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली. त्यामुळे आजही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com