09/05/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी हे आक्रमक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधन झालं, याबाबत पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपस्थित केला. यावेळी पोलीस ठाण्यामध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून …

Read More »

ज्ञानेश्वरी जीवन उध्दाराची संजीवनी – विजयकुमार फड

सेलू : सुंदर संस्कृती आणि माणूस घडवण्याचे काम आपल्या अध्यात्माने केले आहे . ज्ञानेश्वरीने देह हेच मंदिर याचे भान दिले असल्याने ज्ञानेश्वरी ग्रंथ जिवन उध्दराची संजिवनी असल्याचे प्रतिपादन निवृत्त जिल्हाधिकारी विजयकुमार फड यांनी केले आहे. शहरातील नूतन विद्यालय सभागृहात आयोजित स्व. जनुभाऊ रानडे व्याख्यान मालेचे पहिले पुष्प गुंफताना सोमवार २३ फेब्रुवारी रोजी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आनंद …

Read More »

पाथरी येथे संत गाडगेबाबा यांच्या जयंती साजरी

पाथरी,दि 24 ः पाथरी येथील शासकीय विश्रामगृहात संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली जगाला स्वच्छता चा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांची जयंती शासकीय विश्रामगृहात साजरी करण्यात आली. यावेळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी गणेश टोके यांनी त्यांच्या जिवन कार्यावर माहिती दिली. यावेळी जिल्हा अध्यक्ष नारायण टोके. ता अध्यक्ष भाऊसाहेब टोके रामकिशन टोके.बाबुराव टोके. रामप्रभु टोके.बाबासाहेब टोके. …

Read More »

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार,भाजपाकडून विनोद तावडे ?

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपला ‘पत्ता’ खोलला आहे. सोमवारी रात्री पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पक्षाची सर्व धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची …

Read More »

जिल्हयाचे पालक सचिव म्हणजे काय? पालक सचिवांची भूमिका काय असते?

परभणीचे पालक सचिव म्हणून तुकाराम मुंढे नियुक्त जिल्ह्याचे पालक सचिव म्हणजे राज्य सरकारकडून एखाद्या विशिष्ट जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले वरिष्ठ आयएएस दर्जाचे अधिकारी. हे अधिकारी त्या जिल्ह्यातील प्रशासनावर थेट काम करत नसले तरी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.   पालक सचिवांची भूमिका काय असते? शासन निर्णयांची अंमलबजावणी तपासणे – राज्य सरकारने घेतलेले निर्णय व योजना जिल्ह्यात …

Read More »

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार ?

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर पुढचा २२वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येईल, असं सागितलं होतं. मात्र, अजूनही याबाबत घोषणा झालेली नाही. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. २१वा हप्ता नोव्हेंबर २०२५ रोजी …

Read More »

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान, नूतन विद्यालयाचा उपक्रम

सेलू: नूतन विद्यालयात मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती निमित्त सोमवार ( दि.२३) रोजी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक अशोक लिंबेकर, बाबासाहेब हेलसकर यांच्या संकल्पनेतून आणि मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड यांच्या मार्गदर्शनात सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी ‘ …

Read More »

वीरशैव लिंगायत स्मशानभूमीची दयनीय अवस्था, वीरशैव संघटनेची तक्रार

सेलू ( प्रतिनिधी ) येथील सर्व्हे नंबर ३३ मध्ये सातबारा नोंदीनुसार ८० आर जमिनीवर वीरशैव लिंगायत समाजाची शिवा वीरशैव मोक्षधाम – दफनभूमी आहे .परंतु सध्या या दफनभूमी ची अत्यन्त दुरावस्था झाली असून शहरातून व कट्टलखान्यातून येणाऱ्या नाल्याचे पाणी दफनभूमीत घुसत असल्यामुळे अंत्यसंस्कार करणे जिकरीचे बनत असून प्रेताची विटंबना होत आहे .तरी सदरील दफणभूमीची दुरुस्ती करून द्यावी नसता सुयोग्य अशी दोन …

Read More »

ओंकार वृद्धाश्रम पाथरी येथील फळ वाटप

पाथरी प्रतिनिधी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ओंकार वृद्धाश्रम पाथरी येथील उपविभागा तर्फे फळ वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी पाथरी उपविभागाचे कार्यकारी अभियंताचे दिग्रसकर,महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र प्राप्त वीज कर्मचारी पतसंस्था उपाध्यक्ष सुनील वानखेडे व इतर कर्मचारी बजरंग कांबळे, श्रीपती एडके, विनय शहाणे, रामेश्वर सोनवणे, अनिरुद्ध शिकारे, राहुल धोत्रे शंकर कांबळे, मारुती मल्हारी, नागेश देवगावकर उपस्थित होते

Read More »

हायवा ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर एक जखमी

सेलू दि २१ सेलू परभणी रोडवर जलशुद्धीकरण केंद्राजवळ आज दि २१ रोजी सकाळी सुमारे ११ ते ११.३० दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी ११ ते ११.३० दरम्यान दुचाकी (MH ०९ BN ८४३३) आणि हायवा ट्रक (MH २२ AN ९७५५) यांच्यात वालूर जोड रस्त्यावर अपघात झाला. हायवा ट्रकने …

Read More »

जोपर्यंत इंद्रिय सबळ आहेत तोपर्यंतच खरा परमार्थ होतो-नंदकुमार महाराज गोंदीकर

सेलू ( प्रतिनिधी ) उद्याचा दिवस उजाडेल हे सांगता येत नाही व उद्या आपला श्वास राहील याची देखील खात्री नाही .त्यासाठी मिळालेल्या देहाची इतिकर्तव्यता परमार्थ आहे .त्यासाठी इंद्रिय सबळ आहेत तोपर्यंतच केलेला खरा परमार्थ असतो .असे प्रतिपादन भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांनी श्रीमद भागवत कथेच्या निरुपणात केले . येथील शाहू नगर मधील निलकंठेश्वर मंदिर मध्ये शाहू नगर मित्रमंडळाच्या वतीने या …

Read More »

जयसिंग शेळके तिरुपती बालाजी ची १०८ वेळा वारी करणारा बालाजी भक्त

सेलू ( नारायण पाटील ) तिरुपती बालाजीच्या दर्शनाने मनाला शांतता ,सकारात्मक ऊर्जा व भक्तीचा अनोखा अनुभव मिळत असल्यामुळे अनेक भाविक बालाजीच्या दर्शनासाठी जातात .परंतु सेलूच्या जयसिंग शेळके या बालाजी भक्ताने गेल्या २५ वर्षा पासून अखंडपणे तिरुपतीची १०८ वारी करून बालाजीचे दर्शन घेतले आहे . बालाजीच्या १०८ मंत्राचे महत्व सर्वश्रुत आहे परंतु शेळके यांनी १०८ वेळा बालाजीचे दर्शन घेऊन एक विक्रमच …

Read More »

‘दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात?रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे?

 VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान  असू शकते आणि डीजीसीएचे (DGCA) मोठे अधिकारीही यामागे आहेत, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केला. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि …

Read More »

आमचा जिव घेतला तरी जमिनी देणार नाही…सहजपुरमध्ये नेमंक काय घडलयं….

परभणी,दि 20 सरकारच्या दडपशाहीने कहर केला असुन त्याचा प्रत्यय सहजपुर जवळा येथे आला आहे. आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला!” अशा संतप्त घोषणा देत परभणीतील सहजपूर जवळा येथील शेतकरी शुक्रवारी रस्त्यावर उतरले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे, गावाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा पोलिसांची संख्या जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, मध्यरात्रीपासूनच शेतकऱ्यांची धरपकड …

Read More »

लग्ण सोहळ्यात वाद,तीन जणांचा मृत्यू

पिंपळनेर, ता. साक्री: येथे एका लग्नसमारंभाच्या आनंदावर विरजण पडले असून,साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरदेवाच्या बाजूकडील लोकांनी केलेल्या मारहाणीत नवरीकडील तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. पिंपळनेर येथे आज ( दि. १९) दुपारी पिंपळनेर शिवारात असलेल्या घोड्यामाळ (ता. साक्री) येथे विजू गोसावी यांच्या मुलीचा …

Read More »