25/06/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना जाहीर; पहा पात्र व अपात्र कोण?

मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ राबविण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.   या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ५५.७२ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यासाठी राज्य सरकारवर ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. विशेष म्हणजे, या …

Read More »

पूर्णेतील प्रभाग ७ मधील आरसीसी नाला बांधकामाची चौकशी करण्याची मागणी

पूर्णा | प्रतिनिधी पूर्णा शहरातील डीपीडीसी योजनेंतर्गत प्रभाग क्रमांक ७ मधील आवेस कॉलनी येथील गंगाधर अहिरे यांच्या घरापासून ते कावशी नाल्यापर्यंत सुरू असलेल्या आरसीसी नाला बांधकामामध्ये कथित अनियमितता, निकृष्ट दर्जाचे काम आणि शासन निधीच्या संभाव्य गैरवापराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या वतीने १ जून रोजी जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे तालुका …

Read More »

वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सोलार यंत्रणेचे मोठे नुकसान

पुर्णा,दि 02 ः रविवारी सायंकाळी आहेरवाडी गावात पांढरी शिवारात काही ठिकाणी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी सोलार पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार प्लेट उडून गेल्या तर काही ठिकाणी लोखंडी संरचना कोसळल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः शेतीपंपासाठी बसविण्यात आलेल्या सोलार यंत्रणांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पॅनल तुटल्यामुळे …

Read More »

शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

मुंबई,दि 02 ः शेतकरी कर्जमाफीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे थकित कर्ज आता माफ होणार आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्जमाफीची घोषणा सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीपू्र्वीच जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

1962 हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे पशुवैद्यकीय सेवा अधिक सुलभ

हिंगोली (प्रतिनिधी), दि. 02 : पशुपालकांना तात्काळ, सुलभ व तंत्रज्ञानाधारित पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन तसेच भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड (बीएफआयएल) आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी 1962 टोल-फ्री हेल्पलाइन सेवा राज्यात प्रभावीपणे कार्यरत आहे. या सेवेमुळे गेल्या पाच वर्षांत राज्यातील 8 लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून ग्रामीण व दुर्गम भागातील पशुपालकांना …

Read More »

युवा शिवसेना जिल्हा प्रमुख राम कदम यांच्या हस्ते PSI अजय सूर्यवंशी पाटील यांचा सत्कार

हिंगोली,दि 02 ःढ येथे अजय उत्तमराव सूर्यवंशी पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाल्याबद्दल युवा शिवसेना जिल्हा प्रमुख राम कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कुटुंबातील अजय सूर्यवंशी यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षक परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार …

Read More »

आधीकमास पोर्णीमे निमित्त गोदावरी महाआरती थाटामाटात संपन्न

गंगाखेड | प्रतिनिधी रामप्रसाद ओझा आधीकमास (पुरुषोत्तम मास) पोर्णीमेच्या पावन पर्वावर गंगाखेड शहरातील दक्षिण वाहिनी नाभी क्षेत्र असलेल्या गोदावरी घाटावर गोदावरी नदी आरती उत्सव समितीच्या वतीने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यंदा पुरुषोत्तम मासाचे विशेष महत्त्व असल्याने या महाआरतीसाठी शहर व परिसरातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. आयोजकांनी सुरुवातीला १११ महिलांची नोंदणी उद्दिष्ट ठेवली होती. मात्र भक्तिभावाने ओतप्रोत प्रतिसाद मिळत तब्बल …

Read More »

सेलूत सात जूनला कविता मिरगाच्या काव्य मैफल, शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने रविवार ( दि. ०७ ) जून रोजी नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्रातील नामवंत कवींची बहारदार काव्य मैफल ‘ कविता मिरगाच्या’ कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या ‘कविता मिरगाच्या’ उपक्रमाचे हे १३ वे वर्षे असून या वर्षी युवा साहित्य …

Read More »

प्रवाशांना पेढे व पुष्प देत पाथरी बसस्थानकात एसटीचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पाथरी | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या जनतेची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पाथरी आगारात विविध उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांचे पेढे वाटप करून तसेच पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. एसटी महामंडळाच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देत प्रवाशांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला प्रवाशांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. …

Read More »

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्यासंख्येने शिवभक्त किल्ले रायगडावर जाणार

सेलू (प्रतिनिधी ) अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडच्या वतीने युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक ५ व ६ जून २०२६ रोजी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य छगन शेरे यांनी दिली. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास आणि दुर्गराज …

Read More »

हत्ता पाटी येथील जुगार अड्ड्यावर धाड

हिंगोली,ता 01 (प्रतिनिधी)ः पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांवर वेळोवेळी कठोर कार्यवाही करून सळो की पळो करून सोडले आहे. दिनांक 01 जून 2026 रोजी डॉ. नीलाभ रोहन पोलीस अधीक्षक हिंगोली यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार परीविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्री मयूर रसाळ यांच्या पथकाला पोलीस स्टेशन सेनगाव हद्दीत युवर अड्ड्यावर छापा टाकून कार्यवाही करण्यासाठी पाठवण्यात आले. सदरचा …

Read More »

हिंगोलीकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त!’ई-शिवाई’ बसचे उद्घाटन

हिंगोली,दि 01 ः हिंगोलीकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आधुनिक आणि पर्यावरणपूरक अशा ‘ई-शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, आज १ जून २०२६ रोजी हिंगोली आगारात या बसेसचे भव्य उद्घाटन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यासाठी एकूण २१ ई-बसेस मंजूर झाल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४ बसेस आगारात सुखरूप दाखल झाल्या आहेत. या आधुनिक ई-शिवाई बसचे लोकार्पण जिल्हाधिकारी राहुल …

Read More »

मान्सून आगमनाची आता नवीन तारीख…कधी येणार ?..

आज येईल उद्या येईल म्हणून ज्याची वाट पाहिली जात आहे, तो मान्सून अजून काही येण्याची चिन्हे दिसत नाही. आधी मान्सून 1 जून रोजीच केरळमध्ये दाखल होणार असल्याची बातमी आली. त्यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हात थंड वाऱ्याची झुळूक यावी तसा भास नागरिकांना झाला. पण अचानक उन्हाचा जोरात फटका बसावा, अशीच एक बातमी येऊन धडकली आहे. मान्सून लांबल्याचं सांगण्यात आलं आहे. आता मान्सूनच्या …

Read More »

प्रशासकीय काळातील कारभारास बगल, यशवंत सेनेच्या पत्रकार परिषदेत आरोप–प्रत्यारोपांचा पाढा

गंगाखेड / प्रतिनिधी शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका अपेक्षित असताना, यशवंत सेनेच्या पत्रकार परिषदेत मात्र आरोप–प्रत्यारोप आणि तक्रारींचाच सूर अधिक ठळक राहिला. आज आमदार डॉ. रत्नाकर शेट्टी यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गटनेते ॲड. सय्यद अकबर, उपाध्यक्ष सत्यपाल साळवे यांच्यासह नगरसेवक व सभापती उपस्थित होते. १४ मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील मंजूर–नामंजूर ठरावांचे वाचन करताना कारभारात पारदर्शकता नसल्याचे, नगरसेवकांना …

Read More »

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित,परभणीची जागा….

राज्यात आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या जागावाटपा संदर्भात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जवळपास निश्चित झाला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. विधानपरिषदेच्या एकूण 17 जागांवर महाविकास आघाडीत पूर्ण एकमत झाले आहे. 1 जून 2026 हा उमेदवारी अर्ज …

Read More »