10/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी राज्यात नवा नियम; पहा काय झाले बदल

New Driving Licence Rule मुंबई – पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र शासनाने ड्रायव्हिंग लायसन्स आणि बाईक टॅक्सी सेवेसंदर्भात महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय जाहीर केले आहेत. या नव्या नियमांची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२६ पासून करण्याचा शासनाचा मानस असून, याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.   नवीन धोरणानुसार, १ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्रात वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळवण्यासाठी …

Read More »

कबुतरांमुळे आईचा मृत्यू झाल्याचा आमदाराचा दावा

मुंबईतील दादर येथे असलेल्या कबुतरखान्याचा प्रश्न काही महिन्यांपूर्वी वादात अडकला होता. कबुतरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, असा दावा काहींनी केला होता. त्यातच कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन धर्मियांनी याविरोधात आंदोलन पुकारले होते. कबुतरामुळे खरंच आरोग्याला धोका निर्माण होतो, याची चर्चा असतानाच भाजपाचे आमदार राम कदम यांनी विधानसभेत कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचा दावा केला. कबुतरांमुळे झालेल्या आजारावर उपचार नसल्यामुळे आईचा मृत्यू …

Read More »

ना जेठालाल, ना असित मोदी; शैलेश लोढांच्या लेकीच्या लग्नात घरच्यांसारखा राबत होता बॉलिवूड हिरो!

राजस्थान: सध्या इंडस्ट्रीमधील लग्नसराईला वेग आला आहे. नुकतंच बोनी कपूर यांची लेक अंशुला कपूरचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. अशातच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते आणि प्रख्यात कवी शैलेश लोढा यांच्या घरीही सध्या आनंदाचे वातावरण आहे. शैलेश लोढा यांची लाडकी लेक स्वरा विवाहबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर …

Read More »

कर्जमुक्तीमुळे मराठवाड्यातील शेतीला मिळणार नवी उभारी

  “शेतकरी समृद्ध तर राज्य समृद्ध” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देऊन त्यांना नव्याने शेती करण्यासाठी सक्षम करणे आणि कृषी क्षेत्राला नवी ऊर्जा देणे हा या योजनेमागील मूलभूत उद्देश आहे. मराठवाडा हा दुष्काळ, अवर्षण, अतिवृष्टी आणि हवामान …

Read More »

राजकारणात पुन्हा भूकंप, जयंत पाटील-विनोद तावडे यांच्यात बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार आणि आमदार सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट ‘एनडीए’मध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी …

Read More »

ढगफुटीचा इशारा… पण ढगफुटी म्हणजे काय? नेमका किती पाऊस पडतो?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, काही ठिकाणी आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) नाशिक जिल्ह्यासाठी गंभीर इशारा जारी केला आहे. आज नाशिकमध्ये ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, जिल्ह्यासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने …

Read More »

इंद्रायणीच्या पुरात परभणीतील वारकऱ्यांची वाहने अडकली

आषाढी वारीसाठी आळंदी येथे दाखल झालेल्या परभणी तालुक्यातील वडगाव सुक्रे येथील वारकऱ्यांना इंद्रायणी नदीच्या पुराचा मोठा फटका बसला. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने ठाकूरबुवा मठ परिसरात पुराचे पाणी शिरले. या पुरात वारकऱ्यांसाठी नेण्यात आलेले किराणा साहित्य, अन्नदानासाठी जमा केलेली रोख रक्कम तसेच इतर आवश्यक साहित्य वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेत एमएच-३८ ई-२५९३ क्रमांकाची सोपान अशोकराव …

Read More »

महाराष्ट्रात पावसाचे थैमान:हवामान तीव्रता 3 दिवसांपर्यंत कायम राहण्याचा अंदाज

जोर धरलेल्या पावसाने सोमवारी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अक्षरशः कहर केला. अनेक भागात पूरपरिस्थिती उद्भवली असून, काही ठिकाणी दरडी कोसळल्या. दरम्यान मंगळवारीही मुंबईसह अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः घाटाच्या क्षेत्रात येणाऱ्या भागात पावसाचा जोर जास्त असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पावसाचा कहर मंगळवारी (७ जुलै) कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने नवीन माहिती जाहीर केली असून, मुंबई, पुण्यासह …

Read More »

आळंदी देहूतील अनेक पुल पाण्याखाली, वारकऱ्यांसाठी महत्त्वाचं आवाहन

पुणे : आषाढी वारी २०२६ मधील मानाच्या पालख्यांचे प्रस्थान अवघ्या काही तासांवर आले आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी देहू येथून पंढरपूरकडे होईल, तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी आळंदी येथून होईल. तत्पूर्वी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. …

Read More »

एसआयआर मोहिमेत सहकार्य करा – तहसीलदार शृंगारे यांचे नागरिकांना थेट आवाहन*

गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR–2026) मोहिमेला गंगाखेड विधानसभा मतदारसंघात वेग आला असून तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी प्रत्यक्ष प्रभागभेटी देत नागरिकांना सहकार्याचे स्पष्ट आवाहन केले आहे. मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकूण १७८ मतदान केंद्रे असून त्यात ४४ शहरी …

Read More »

अतिरिक्त शिक्षकांच्या न्यायासाठी ‘मुप्टा’शिक्षक संघटना धडकणार; शिक्षणाधिकारी कार्यालयाला जाब विचारणार- महादेव लोखंडे

परभणी | प्रतिनिधी परभणी जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर मुप्टा शिक्षक संघटना आता आक्रमक झाली असून, अतिरिक्त शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी लवकरच जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव लोखंडे यांनी दिली. अतिरिक्त शिक्षकांचे महिनोनमहिने रखडलेले वेतन तातडीने अदा करावे, समायोजनाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, अतिरिक्त शिक्षकांचे आक्षेप अर्ज तातडीने …

Read More »

हिंगोलीत भाजपाची जिल्हा आढावा बैठक संपन्न

हिंगोली (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीची रविवारी हिंगोली शहरातील हॉटेल रामकृष्ण येथे कार्यकर्ता संमेलन आणि जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली बैठकीत सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या बैठकीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रभारी संजयभाऊ कौडगे उपस्थित होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आगामी काळातील राजकीय रणनीती, पक्षाची ध्येयधोरणे आणि संघटनात्मक बळकटीकरणाबाबत अत्यंत मोलाचे …

Read More »

‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली

हिंगोली, दि. ०५ जुलै हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आज जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस (NSUI) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शिक्षण व स्पर्धा परीक्षांशी संबंधित विविध समस्या मांडल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पेपरफुटीच्या वाढत्या घटना, परीक्षा शुल्कामधील भरमसाठ वाढ, एमपीएससी व …

Read More »

अ.भा.ग्राहक पंचायत गंगाखेड शाखेच्या वतीने स्वामी विवेकानंदांना अभिवादन

गंगाखेड प्रतिनिधी युवकांचे प्रेरणास्थान,थोर विचारवंत आणि महान राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत,गंगाखेड शाखेच्या वतीने (दिनांक ४ जुलै शनिवार) रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शहराध्यक्ष मकरंद चिनके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमात सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे स्मरण करत …

Read More »

हिंगोली-मुंबई रेल्वे सेवा अखेर सुरू!  खासदार रामराव वडकुते यांचे हिंगोलीकरांना स्वागताचे आवाहन

हिंगोली,दि 05 ः हिंगोली आणि परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. नांदेडहून हिंगोली मार्गे मुंबईसाठी विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात येत असल्याची माहिती ज्येष्ठ नेते खासदार रामराव वडकुते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. उद्या (सोमवारी) या गाडीची पहिली अधिकृत धाव होणार असून, यामुळे हिंगोलीकरांचा मुंबई प्रवासाचा प्रश्न सुटणार आहे. बऱ्याच दिवसांची मागणी पूर्ण वडकुते यांनी सांगितले …

Read More »