25/06/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

पाणीपुरवठा योजना आढावा बैठक- गंगाखेडकरांना दिलासा देणारी आशादायी घडामोड

गंगाखेड / प्रतिनिधी शहरातील सततच्या पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक संकेत देणारी बैठक आज पालिकेत पार पडली. नगराध्यक्षा उर्मिला केंद्रे यांच्या दालनात त्यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाची सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण, गळती दुरुस्ती, वितरण व्यवस्थापन आणि पुढील काळातील ठोस नियोजन—या सर्व मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट दिशा देण्यात आली. बैठकीत शहरातील विविध भागांत कमी दाबाने …

Read More »

गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी; विराट राष्ट्रीय लोकमंचचे निवेदन

हिंगोली | प्रतिनिधी गोवंश, गोरक्षण आणि गोहत्या या मुद्द्यांवरून देशात वाढत चाललेले राजकारण, सामाजिक तणाव आणि अप्रिय घटना रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावे, अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच काऊन्सिल (NGO) हिंगोलीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भारत हा कृषिप्रधान आणि संस्कृतीप्रधान देश …

Read More »

“फसवणूक खपवून घेतली जाणार नाही”-आमदार डॉ. रत्नाकर गुट्टेंचा थेट इशारा

गंगाखेड (प्रतिनिधी): शेती हा केवळ व्यवसाय नसून ग्रामीण भारताचा श्वास आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या घामावरच देशाची अर्थव्यवस्था उभी आहे. मात्र बदलते हवामान, वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अस्थिरता आणि बनावट निविष्ठांचा वाढता सुळसुळाट यामुळे शेतकरी आज गंभीर संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागातील अधिकारी व कृषी केंद्र चालकांनी केवळ शासकीय फाइल्सपुरते मर्यादित न राहता, शेतकऱ्यांचा विश्वास जपण्याची …

Read More »

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विरोधीपक्ष कुठे आहे?

रामप्रसाद ओझा | गंगाखेड/प्रतिनिधी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आज एक प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे — इथे खरंच विरोधीपक्ष किंवा प्रभावी विरोधी नेते उरले आहेत का? राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील ज्वलंत प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा, रस्त्यावर उतरून जनतेचा आवाज बनणारा एकही ठोस विरोधी चेहरा दिसत नाही, हीच आजची कटू वास्तवस्थिती आहे. देशभरात आणि राज्यातील अनेक भागांत महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, …

Read More »

मुख्याधिकारी सोनवणेंना कारणे दाखवा नोटीस;भरती  प्रकरणी खुलासा मागविला

दै. शब्दराज / रामप्रसाद ओझा, गंगाखेड, दि. 26– गंगाखेड नगरपरिषदेत कथित बेकायदेशीर कर्मचारी नियुक्ती आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत मुख्याधिकारी सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्षा उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांनी …

Read More »

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी ३१ मेची मुदत

हिंगोली , दि. 25 : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत असून, सन 2019-20 ते 2025-26 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शासनाने सर्व महाविद्यालयांना 31 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. महाविद्यालय स्तरावर सन 2019-20 चे 55, सन 2020-21 चे 192, सन 2021-22 चे 152, सन 2022-23 चे 249, सन 2023-24 चे 76, …

Read More »

हिंगोलीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी 

हिंगोली,दि 25 राज्यस्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा ७ वर्षाखालील मुले व मुली30/ 31मे पुणे येथे ०९ वर्षाखालील मुले व मुली ०२/०२ जुन छत्रपती संभाजीनगर ११ वर्षाखालील मुले व मुली १३ वर्षाखालील मुले व मुली ०५ व ०७ जून सोलापूर येथे विविध गटाच्या स्पर्धा होणार आहे.  दिनांक 24 मे 2026 रविवार रोजी तालुका क्रीडा संकुल हिंगोली येथे निवड चाचणी घेण्यात आली. निवड …

Read More »

रिवा येथे घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाने काढला मोर्चा

हिंगोली,दि 25 (प्रतिनिधी) ः मध्य प्रदेशातील रीवा येथे जैन साध्वींसोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन देण्यात आले. विहाररत जैन साधू-संतांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था लागू करावी तसेच संबंधित घटनेची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनानुसार, २० मे २०२६ रोजी रीवा जिल्हा मुख्यालयाजवळ राष्ट्रीय संत आचार्य …

Read More »

येहळेगाव सोळंके येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न

हिंगोली दि. 22 : महसूल विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर (टप्पा-1) अंतर्गत आजजिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली येहळेगाव सोळंके येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाधान शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार हरीश गाडे उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार अनिता कोलगने यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके मंडळातील नागरिकांना महसूल व इतर …

Read More »

हिंगोलीत ‘स्मार्ट मीटर’मुळे ग्राहकांच्या तक्रारींना ब्रेक

हिंगोली,दि 25 ः महावितरण कंपनीच्या वतीने जिल्हाभरात जुने वीज मीटर बदलून त्याठिकाणी अत्याधुनिक ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेनंतर आता वीज ग्राहकांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, महावितरण कार्यालयातील मीटर तपासणीची (मीटर टेस्टिंग) संख्या आता कमालीची कमी झाली असून, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत जुन्या मीटरच्या वेगाबाबत किंवा जादा वीज बिलाबाबत …

Read More »

गंगाखेड तालुका कृषी कार्यालयाला शेतकऱ्यांनी लावले टाळे

गंगाखेड | प्रतिनिधी गंगाखेड येथील तालुका कृषी कार्यालयाच्या बेजबाबदार, कामचुकार व संशयास्पद कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. वारंवार निवेदन देऊनही शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगाचे अहवाल मिळत नसल्याने, तसेच आंदोलनाच्या दिवशीही कार्यालयात ना अधिकारी, ना कर्मचारी उपस्थित असल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला टाळा ठोकून आंदोलन केले. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी कार्यालयातील पंखे, दिवे, संगणक आदींचा विद्युत पुरवठा बंद करून कार्यालय …

Read More »

आमदार संतोष बांगर यांच्या ‘जनता दरबारात जागेवरच सुटतात समस्या!

हिंगोली,ता 25 मतदारसंघातील जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेते म्हणून ख्याती असलेले कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या वंजारवाडा भागातील निवासस्थानासमोर दररोज सकाळी ‘जनता दरबार’ भरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केवळ हिंगोली जिल्हाच नव्हे, तर शेजारील वाशिम, बुलढाणा, परभणी, नांदेड आणि बीड अशा विविध जिल्ह्यांतून रोज १५० ते २०० नागरिक आपल्या न्याय्य हक्काच्या आणि वैयक्तिक समस्या घेऊन आमदार बांगर यांच्या …

Read More »

शंकर नगर येथे एनसीसीच्या वार्षिक शिबिरासाठी १० विद्यार्थिनी रवाना

हिंगोली | प्रतिनिधी हिंगोली येथील सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयाच्या छात्र सेनेतील १० विद्यार्थिनी एनसीसीच्या वार्षिक शिबिरासाठी नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे रवाना झाल्या आहेत. या विद्यार्थिनींना विद्यालय परिसरातून उत्साहात निरोप देण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे २५ मे ते ३ जून दरम्यान एनसीसीचे वार्षिक शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विविध उपक्रम, शिस्त प्रशिक्षण, शारीरिक क्षमता …

Read More »

महावितरणात ‘ऑपरेशन ट्रान्सफर’!

राज्यभरातील १६ अधीक्षक अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासकीय सर्जरीमागे नेमकं काय? पुर्णा / प्रतिनिधी (सुशिल दळवी) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अर्थात महावितरण मध्ये मोठा प्रशासकीय भूकंप झाला असून राज्यभरातील तब्बल १६ अधीक्षक अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश तात्काळ प्रभावाने जारी करण्यात आले आहेत. या अचानक झालेल्या फेरबदलामुळे महावितरणच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महावितरण व्यवस्थापनाने “प्रशासकीय कारणास्तव” या बदल्या करण्यात …

Read More »

पाणी फाउंडेशनच्या वतीने डिग्रस येथे जनजागृती

हिंगोली,दि 23  सिने अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन च्या वतीनेदिनांक 22 मे रोजी डिग्रस कऱ्हाळे येथे पाणी फाउंडेशन च्या वतीने बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी भागवत कोटकर हिंगोली जिल्हा फिल्ड ऑफिसर पाणी फाउंडेशन यांच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बचत गटाच्या वतीने भागवत कोटकर यांचा सत्कार करताना पत्रकार शिवाजी कऱ्हाळे, राजू दांडगे तालुका अभियान व्यवस्थापक, गजानन शिंदे सहाय्यक कृषी अधिकारी अनिल …

Read More »