25/06/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

संघटनात्मक बांधणी करणाऱ्याला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळणार- जयप्रकाश दांडेगावकर

हिंगोली,दि 23 (प्रतिनिधी)ः हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक बांधणी मजबूतपणे करेल त्यालाच जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाईल.”अशी माहीती माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक मराठवाडा प्रभारी माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.23)  राष्ट्रवादी भवन  येथे पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले “महागाई …

Read More »

यशामागे असलेल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा -नगराध्यक्ष मिलिंद सावंत

सेलू ( प्रतिनिधी ) जीवनात आपण कितीही यश मिळवले तरी त्यामागे आपल्या आई वडिलांचे कष्ट असतात याची जाणीव ठेवा असे आवाहन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात बोलतांना केले . येथील छत्रपती शाहूमहाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित गटकळ करियर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,केंद्र सेलू यांचा महाराष्ट्र पोलीस भरतीत यावर्षी ऐतिहासिक निकाल लागला आहे . नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र …

Read More »

वारकरी संप्रदायाच्या भक्तीपरंपरेचे अयोध्या धामात पावन आगमन

  गंगाखेड -प्रतिनिधी अयोध्या धाम — पंढरीच्या वारकरी संप्रदायाची अखंड नामसाधना, भक्ती, वैराग्य आणि समतेचा संदेश घेऊन संत परंपरेच्या पवित्र पादुकांचे अयोध्या धाम येथे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. श्री ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज इसादकर यांच्या नेतृत्वाखाली ह.भ.प. श्री संत मोतीराम महाराज, संत मारुती महाराज दस्तापूरकर तसेच ह.भ.प. श्री संत सोपान काका महाराज इसादकर यांच्या पादुकांचे श्री महर्षी वाल्मिकी …

Read More »

रावराजूर येथे योगसाधनेच्या साक्षीने गुणवंतांचा गौरव

पालम,दि 23 (प्रतिनिधी)ः पालम तालुक्यातील रावराजूर येथे दिनांक २१ मे बुधवार रोजी गुरुवारच्या पहाटे पतंजली योग समिती व श्री नरेंद्र गिरी माध्यमिक विद्यालय तथा सनफ्लॉवर प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० दिवसीय योग शिबिराच्या २० व्या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आणि योग शिक्षक व्यंकटराव शिंदे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात योगप्रेमींच्या उपस्थितीत योग वर्गाने …

Read More »

आमदार संतोष बांगर यांच्या कामाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक

हिंगोली,दि 23 शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या कार्यशैलीचे राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी जाहीर कार्यक्रमात भरभरून कौतुक केले. “सोशल मीडियाचा पक्षासाठी प्रभावी वापर कसा करायचा आणि पक्ष संघटना कशी मजबूत करायची, हे संतोष बांगर यांच्याकडून शिकण्यासारखे आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमादरम्यान बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, “योगायोगाने आज संतोष बांगर स्टेजवर उपस्थित आहेत. मी फक्त साहेब …

Read More »

मोटेगावकरने मुख्य पॅनलमध्ये माणसे पेरली, घटनाक्रम चक्रावून टाकणारा

देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या गोपनीयतेचे धिंडवडे खुद्द राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) दिल्लीतील मुख्य कार्यालयातच उडाले असण्याची धक्कादायक शक्यता आता समोर आली आहे. एनटीएने अत्यंत विश्वासाने नेमलेल्या काही ‘अनुभवी तज्ज्ञांनीच’ संस्थेच्या आवारातून अत्यंत हुशारीने महत्त्वाचे प्रश्न लहान लहान चिठ्ठ्यांवर लिहून बाहेर काढल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या (NTA) अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या यंत्रणेला ‘सुरुंग’ …

Read More »

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात गंगाखेडमध्ये औषध विक्रेत्यांचा एल्गार

रामप्रसाद ओझा | प्रतिनिधी, गंगाखेड ऑनलाइन औषध विक्रीच्या बेजबाबदार धोरणांविरोधात गंगाखेड शहर व तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी (दि. २० मे) कडकडीत बंद पाळत शासनाला ठाम इशारा दिला. शहरातील सुमारे १५० औषधी दुकाने पूर्णतः बंद ठेवून औषध विक्रेत्यांनी आपला रोष उघडपणे व्यक्त केला. हा बंद अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत पाळण्यात आला. गंगाखेड केमिस्ट अँड …

Read More »

एन.टी.सी भागातील भगवान महावीर गार्डन येथील डीपीला मध्यरात्री आग

हिंगोली,दि 20 (प्रतिनिधी) हिंगोली शहररतील एन.टी.सी भागातील भगवान महावीर गार्डन येथे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. दिवस असो वा रात्र, तासनतास वीज गुल होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या गंभीर समस्येकडे महावितरण कंपनीचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांमधून केला जात आहे. दिनांक 19 मे च्या मध्यरात्री महावीर गार्डन येथील …

Read More »

हिंगोलीत औषध विक्रेत्यांचा बंद; १२६० औषधी दुकाने बंद

हिंगोली | प्रतिनिधी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत हिंगोली जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी मंगळवारी एकदिवसीय बंद पाळला. जिल्ह्यातील तब्बल १२६० मेडिकल व औषध विक्रेत्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. हिंगोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ऑनलाईन औषध विक्री, ई-फार्मसी तसेच औषध …

Read More »

पूर्णेत श्रीगुरु बुद्धिस्वामी मठ येथील सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

पुर्णा.. प्रतिनिधी(सुशिल दळवी) आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या निधीतून सुमारे 50लक्ष रुपयांच्या सभागृहाचे भूमिपूजन रेखा ताई गुट्टे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये नगराध्यक्ष विमलबाई कदम, आ. गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुका प्रभारी बंटी कदम, राजू अण्णा एकलारे उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे सर्व नगरसेवक , किशोर सूर्यवंशी, मिलिंद कांबळे, विश्वनाथ होळकर,,नागेश एगडे, ऍड.राज भालेराव, राहुल बरदाले, गंगाधर महाजन, यांच्यासह समाजबांधव …

Read More »

परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार- आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार

सोनपेठ, दि 17 देशात वाढती महागाईने कहर केला असून शेती मालाला भाव नाहीत, शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक हे विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या जुलमी राजवटीला कंटाळलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा मानस परभणीचे निष्ठावंत आमदार डॉ राहुल पाटील यांनी व्यक्त केला. तसेच परभणी जिल्हा भगवामय करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. परभणी जिल्ह्यातील …

Read More »

अंत्योदय आणि एकात्म मानववादाचा विचार घराघरात पोहोचवा-माजी मंत्री डॉ.भागवत कराड

बाळु जाधव हिंगोली,दि 17 ः भारतीय जनता पक्ष हा केवळ सत्तेसाठी चालणारा पक्ष नसून तो एका विशिष्ट विचारधारेवर आधारलेला पक्ष आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदय आणि एकात्म मानववाद हाच आमच्या कार्याचा मुख्य गाभा आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांने ही विचारधारा आणि केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना घराघरात पोहोचवाव्यात असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. हिंगोली येथे आयोजित …

Read More »

हिंगोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार; आमदार राजू नवघरे यांचा निर्धार

हिंगोली,दि 17 ः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हिंगोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आणायचीच, असा ठाम निर्धार आमदार राजू नवघरे यांनी व्यक्त केला आहे. हिंगोली येथील हॉटेल शिवलीला पॅलेसच्या सभागृहात रविवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कारानिमित्त या भव्य मेळाव्याचे …

Read More »

हिंगोलीत भाजपच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन

हिंगोली (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६’ अंतर्गत हिंगोली जिल्हास्तरीय दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी शहरातील हॉटेल शांती येथे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. ‘समर्थ कार्यकर्ता, सशक्त संघटना’ ही संकल्पना घेऊन आयोजित या कार्यशाळेचा मुख्य उद्देश पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बांधणी आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावी प्रसार करणे या दोन दिवसांत …

Read More »

चिराग शहा तलावामुळे हिंगोलीचा पाणीप्रश्न सुटणार : युवा नेते शिवाजीराव मुटकुळे

हिंगोली,दि 16 ः हिंगोली शहरातील महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या चिराग शहा तलावाच्या सुशोभीकरण व विकासकामांची युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हिंगोली जिल्हा वार्षिक निधीतून सुमारे 14 कोटी रुपयांच्या खर्चातून सुरू असलेल्या या कामांचा आढावा घेत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना शिवाजीराव मुटकुळे म्हणाले की, “चिराग शहा तलाव हा हिंगोली शहराचा आत्मा आहे. आमच्या पिढीने दुष्काळ पाहिला, मात्र …

Read More »