कृषि संजीवनी सप्ताहात गुणवत्ता, शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ यावर होणार जागर

0 151

1 जुलै रोजी कृषी दिनानिमित्त विशेष उपक्रम

नांदेड ,प्रतिनिधी:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 1 जुलै हा दिवस ‘कृषि दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा करण्यायत येतो. यानिमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृद्ध व्हावा यासाठी दिनांक 1 ते 7 जुलै या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी शासनाच्या मार्गदर्शनाखाली कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी यावर्षी “पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ” या त्रिसुत्रीचा कृषि विभागामार्फत जागर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

 

या जागरात खरीप हंगाम यशस्वीज करण्याषसाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यत पोहचविण्याणसाठी राज्याीतील कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी, जिल्हाज परीषद, कृषि विद्यापीठे / कृषि विज्ञान केंद्रे, आत्माा, पोक्रा, मधील कार्य करणारे कृषितज्ज्ञ, कृषिमित्र हे शेतक-यांच्याह बांधावर जाऊन मार्गदर्शन करतील.

 

या सप्ताहात गावांमध्ये सुक्ष्मत नियोजन, गाव बैठका, शिवार भेटींचे व शेतीशाळांचे आयोजन करण्यातत येणार आहे. विविध गावात कृषि विषयक राबविलेल्याठ नाविन्यवपुर्ण उपक्रमांना कृषितज्ज्ञांच्या निवडक शेतकऱ्यांसह भेटी दिल्या जाणार आहेत. तालुक्यालतील कृषि पुरस्काभर प्राप्तन शेतकरी तसेच नाविन्येपुर्ण, प्रयोगशील व उल्लेाखनीय काम करणा-या शेतक-यांच्यान सत्कातराचे व त्यांंच्याब मार्गदर्शनपर व्यिख्यापनाचे आयोजन, कृषिविषयक मोफत सल्ला, एम किसान पोर्टलवर शेतकरी नोंदणी, शेतकरी मासिकाचे वर्गणीदार वाढविण्याोची मोहिम, विविध पीक स्पर्धा आणि पुरस्काकरांबाबत प्रचार- प्रसिध्दीव, जलयुक्तय शिवार अभियान, एकात्मीकक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, मागेल त्याुला शेततळे याबाबतच्या यशोगाथा आदिंबाबत या सप्ताहात भर राहिल, असे कृषि विभागाने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

 

याचबरोबर पीक उत्पाकदन खर्च कमी करण्याहबाबत, प्रधानमंत्री पीक विमा योजना, हवामान आधारीत फळ पीक विमा योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत जनजागृती, प्रसिध्दीग व मार्गदर्शन केले जाईल. जमीन आरोग्यी पत्रिका वितरण, परंपररागत कृषि विकास योजना, केंद्र व राज्यो शासनाच्यार कृषि व कृषि संलग्नम विभागांच्या शेतक-यांसाठी असलेल्या योजना, कापसावरील शेंदरी बोंड आळी, मकावरील लष्कषरी अळी, ऊसामधील हुमणी आणि सोयाबीनवरील मोझॉक व पिवळा मोझॅक व्यंवस्थानपनाबाबत कृषितज्ज्ञ बांधावर जाऊन मार्गदर्शन करतील. रुंद सरी वरंबा यंत्र वापराची व पेरणीची प्रात्या्क्षिके, बिजप्रक्रिया, कडधान्यण आंतरपिकाबाबत मार्गदर्शन, बहुपीक पध्दीतीचा प्रसार, एकात्मीपक शेती पध्द्ती संकल्पीनेबाबत, हायड्रोफोनिक्सु, हिरावा चारा निर्मिती, श्री/चारसुत्री, बी- बियाणे, खते, औषधे खरेदी व वापर करताना घ्याावयाची काळजी, फळबाग लागवड कार्यक्रम, मुलस्थासनी जलसंधारणाबाबत जनजागृती व मार्गदर्शन व आत्पीकालीन पीक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यातत येणार आहे.

प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?

 

error: Content is protected !!