ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकारांची निवड करावी,महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनाची मागणी

0 138

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाच्या ठरावानुसार मा.राज्यपाल यांनी २०२० च्या महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० नुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये अधिकारी प्रशासक न ठेवता गावातील नागरीक प्रशासक नियुक्त करावा हे नमुद केले आहे. तेंव्हा गावातील नागरिक प्रशासक नियुक्त करताना स्थानिक पत्रकारांना संधी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनाने केली आहे. कारण पत्रकार हा समाजमनाचा आरसा आहे. तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.

सर्व घडामोडींचा परामर्श घेणारा समाजातील अत्यंत जागरूक घटक आहे. तेंव्हा त्याच गावातील पत्रकारावर ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली तर तो अत्यंत जबाबदारीने आपले काम पुर्ण करु शकतो. व गावच्या विकासासाठी आपले योगदान देवू शकतो. कोरोणासारख्या महामारीच्या कालावधीत जर पत्रकार न डगमगता, जिवावर उदार होवून काम करु शकतो, तर ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम करू शकतो.

तेंव्हा पत्रकारांचा अनोखा सन्मान करण्याची शासनाला संधी आलेली असुन, शासनाने या मागणीचा संवेदनशील मनाने विचार करावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनाचे प्रदेश अध्यक्ष लुकमान शाह यांनी. यासंदर्भात मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, यांना ईमेलद्वारे मांगणी करण्यात आली आहेत. राज्यभरात अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे. पत्रकार सुद्धा गावातील अभ्यासू आणि या पदास पात्र व्यक्ती आहे.

पत्रकाराला गावातील सर्व प्रश्नांची चांगली जाणीव असते, त्याचा जनसंपर्क ही दांडगा असतो. त्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकार उत्तम कामगिरी करू शकतो. म्हणून पत्रकाराला प्रशासक म्हणून काम करण्याची संधी द्यावी. पत्रकार हाच प्रशासक पदाचा प्रमुख दावेदार आहे तसेच ज्या गावात पत्रकार नसेल त्या ठिकाणी सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला संधी द्यावी.

लियाकत शाह एम.ए बी.एड
महाराष्ट्र राज्य प्रसिद्धि प्रमुख,
महाराष्ट्र लढा पत्रकार संघटना

आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!