उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

0 76

पाथरी, प्रतिनिधी – उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात अराजकता पसरली असून खरेखुरे जंगलराज सुरू झाले आहे. कोणताही वर्ग सुरक्षित नाही. मागासवर्गीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे. त्या मुलीच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात गेले असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. राहुल गांधी शर्ट धरून फरफटत नेले. अशा प्रकारे अराजकता झालेले उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करून तेथील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी पाथरी तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर पाथरी तालुकाध्यक्ष विश्‍वनाथ थोरे, विजयकुमार घुंबरे, मिर्झा रशीद बेग, अलि अफसर अन्सारी, प्रल्हादराव चिंचाणे, प्रभाकर शिंदे, रईस अन्सारी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

error: Content is protected !!