सातबारा उताऱ्यावरील नावात दुरुस्त करण्याची मागणी

0 55

 

सेलू / नारायण पाटील – आज तहसील कार्यालय सेलू येथे मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांच्या हस्ते सेलू तालुक्यातील पीक विमा संदर्भात सर्व सातबारा नावात दुरुस्ती करण्यासाठी सर्व तलाठी यांना आदेशित करावे या प्रकारचे निवेदन देण्यात आले.

 

 

सध्या प्रधानमंत्री पिक विमा भरण्यासाठी विमा कंपनीने नावात फरक असल्यास विमा भरता येत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना विमा भरण्यास अडचण निर्माण होत आहे. असंख्य शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहत आहेत. तरी तहसीलदार साहेबांनी आपल्या स्तरावरून सेलू तालुकातील सर्व तलाठी यांना कलम 155 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा सातबारा व आधार कार्डवर नावात तफावत असेल तर ती तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आदेशित करावे या प्रकारचे तहसील कार्यालय सेलू येथे देण्यात आले.

 

 

यावेळी समवेत अशोक नाना काकडे, प्रकाशराव मुळे, अप्पासाहेब डख, माऊली राऊत, सुधाकर रोकडे, आनंद डोईफोडे, शिवराम कदम, रघुनाथ नाना बागल, विशाल देशमुख, दिलीप आकात, कल्याण जोगदंड, रमेश माने, परवेज सौदागर, सचिन शिंदे, रामेश्वर गाडेकर, इरफान लाला, नबाजीराव खेडेकर, अप्पासाहेब रोडगे, पवन कटारे, बालाप्रसाद राठोड, सुभाषराव चव्हाण, तुकाराम रोडगे, कुलदीप ताठे, माणिक काजळे, अक्षय कदम, अशोक खरात, बाळू गाडेकर, पांडुरंग धर्मे तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!