अंबरनाथ पूर्वेकडील वॉर्ड क्र.५६ मधील नवीन विकसित होत असलेल्या परिसराची बिकट अवस्था

0 215

अंबरनाथ,प्रतिनिधी – अंबरनाथ शहर पूर्वेकड़ील वॉर्ड क्र.56 मधील पालेगांव या परिसरात बिल्डरांकडून नवीन मोठ मोठ्या इमारती उभारण्यात आले आहेत. पण गेल्या दोन वर्षापासून सतत तेथील रस्त्यावर पावसाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर पालेगाव, पटेल मार्ट, विश्वनाथ चौक या ठिकाणी अजूनही व्यवस्थित रस्ते पण तयार झालेले नाहीत. परंतु रस्त्याचे काम पूर्ण झाले नाहीतर गटारे कुठून होतील. तसेच गटारे तयार झाले नाहितर पावसाचे पाणी जाणार कुठून हे समजेना झाले आहे.

तसेच पालेगाव ह्या भागात विकासक (बिल्डर) फक्त इमारती, घरे बांधून मोठं मोठी अमिश दाखवून आपली घरे विकत आहे पण मूलभूत एकही सोय सुविधा अद्याप उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यात यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने संपूर्ण रस्तावर पाणी जमा होऊन ते पाणी इमारतीच्या आत घुसत आहे. त्यामुळे इमारती मधील लिफ्ट, विद्युत मीटर व महत्वाची उपकरणे बंद पडली आहेत.

तसेच चार चाकी वाहनांचा पण मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचा ना हक्क खर्च लोकांच्या वार्षिक देखभाल खर्च (मेंटेनेन्स) मधून करावा लागतो. जेव्हा ह्यामध्ये विकासक (बिल्डर) इमारत उभी करत होते. त्याच्या आधी त्यांना माहीत होतं की ह्या ठिकाणी एक मोठी नदी आहे. ती नदी रुंद करून घेतली असती तर भविष्यात मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला असता तर पाणी निघून गेले असते. अशी व्यवस्था करायला पाहिजे होती. परंतु विकासक (बिल्डर) ह्यांना तर पैसे कमावण्याची घाई आणि नगरपालिकेचे अधिकारी ह्यांना पण पैसे घेऊन परवाने देण्याची घाई होती.

तसेच परिसर आहे कि नदी..? पालेगावच्या या परिस्थितीला नुकसानीस जबाबदार कोण ? नगरपालिका कि बिल्डर ? अशा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. तसेच मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटिल ह्यांनी पण याबद्दल जाहिर निषेध केला आहे.

न्यायालयात वाढदिवस साजरा, ११ वकीलांवर गुन्हा दाखल

स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?

 

error: Content is protected !!