बाबासाहेबांनी मानव मुक्तीसाठी केलेल्या कार्याची जाण प्रत्येकाने ठेवणे गरजेचे-पैगंबर शेख

0 7

परभणी,दि 15 ः
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मानवाच्या मुक्तीसाठी कार्य केले आहे. याची जाण प्रत्येकाने ठेऊन माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे असे प्रतिपादन पुणे येथील सुधारणावादी सामाजिक कार्यकर्ते सर्पमित्र पैगंबर शेख यांनी केले.
शहरातील वसमत रस्त्यावरील आबा ट्रेडर्स येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी ते बोलत होते.
प्रतिमापूजनंतर त्यांचे स्वागत आबा कारेगांवकर यांनी केले. प्रास्ताविक व संचलन रणजित कारेगांवकर यांनी केले तर आभार विष्णू मेहेत्रे यांनी मानले.
याप्रसंगी दुबई येथे कार्यरत प्रसेनजित सातोरे , विष्णू मेहत्रे, राजेश मस्के, अंगद जवंजाळ, विशाल राठोड, रोहित पालोदकर, बाबा सोनवणे, आशिष सोनवणे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!