पंचनामे करून हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई द्या,माकपची मागणी

0 14

नारायण पाटील
सेलू,दि 03 ः

तालुक्यात 1व 2 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व गावातील शेती पिकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50000 रुपये नुकसान भरपाई द्या .तसेच घरात पाणी शिरुन आर्थिक नुकसान व पडझड झालेल्या सर्वांना देखील शासनाने भरघोस मदत द्यावी अशी मागणी माकप च्या वतीने सेलूचे उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
या वेळी माकपचे कॉम्रेड रामेश्वर पौळ ,दत्तुसिंग ठाकूर ,रामकृष्ण शेरे पाटील, विष्णू चव्हाण, राहुल डंबाळे, श्रीकृष्ण पौळ, बळीराम पौळ, संजु पौळ ,शांतीराम पौळ यांच्या सह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते

error: Content is protected !!