परभणी,दि 10 ः
कीर्तन सोहळा आटोपून दुचाकीने घरी परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा कार–दुचाकीच्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.१०) पहाटेच्या सुमारास झरी गावाजवळ घडली. या घटनेमुळे जिंतूर तालुक्यातील बोर्डी व मुडा परिसरात शोककळा पसरली आहे.
हभप.माऊली दिगंबरराव कदम (वय ३०), हभप. प्रसादराव कदम (वय ४५, दोघे रा.बोर्डी, ता.जिंतूर) आणि हभप.दत्ता माणिकराव कऱ्हाळे (वय ३०, रा.मुडा, ता.जिंतूर) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. ते तिघेही परभणी तालुक्यातील पिंपळा येथे आयोजित कीर्तन सोहळ्यासाठी गेलेले होते.
Shabdraj www.shabdraj.com