24/03/26
Breaking News

मराठवाडा

संत जनाबाई व संत मोतिराम महाराज समाधीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी

गंगाखेड / प्रतिनिधी :- आज आषाढी एकादशी निमित्ताने संत भक्तांमध्ये विशेष उत्साह पहावयास मिळाला. श्री संत जनाबाई यांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली. पहाटेपासूनच भक्तजन अभिषेक, पूजा व हरिपाठ करत दर्शनासाठी रांगेत उभे राहिले होते. पहाटे रेखा गुट्टे यांनी विठ्ठल रखुमाई व संत जनाबाई समाधी चे अभिषेक केला ह्या वेळी डॉ दीनकर मुंडे यांच्या सह संस्था चालक उपस्थित होते. …

Read More »

प्रत्येकाने वृक्ष दत्तक घेऊन त्याचे संवर्धन करावे – ओमप्रकाश यादव

परभणी – बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्ष दत्तक घेऊन त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी केले. शुक्रवार दि. 04 जुलै 2025 रोजी पाथरी तालुक्यातील वडी या ग्रामपंचायती मध्ये माझं गाव माझं योगदान उपक्रमांतर्गत गावकऱ्यांच्या लोकसहभागातून वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावच्या सरपंच सौ सुशीलाताई खंडागळे, …

Read More »

अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश

परभणी,दि 05 ः राजस्थान येथील चुडेला येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय अंतरविद्यापीठीय बेसबॉल स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाने यश मिळवत कांस्य पदक मिळवले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बेसबॉल संघात महाविद्यालयाच्या पल्लवी पितळे व गायत्री वाघ या खेळाडूंनी सहभाग घेत अखिल भारतीय स्तरावर तृतीय बक्षीस मिळवले आहे. सदरील स्पर्धा राजस्थानमधील झुंनझुनवाला विद्यापीठात संपन्न झाली. या स्पर्धेत भारतातील सर्व विद्यापीठे …

Read More »

गुणपत्रिकेतील गुणासोबतच विद्यार्थी संस्कारक्षम झाला पाहिजे – टि. के. कुलकर्णी

सेलू ( प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांनी एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्नशील राहावे व सर्वांशी माणूसकीने वागावे. प्रगतीपुस्तकावरील गुणासोबतच अंगातील सदगुण देखील तेवढेच महत्वाचे आहेत .त्यासाठी गुणवत्तेसोबच विद्यार्थी संस्कारक्षम कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत .असे विचार निवृत्त वनाधिकारी टी के कुलकर्णी यांनी नूतन संस्थेच्या वर्धापन दिन प्रसंगी व्यक्त केले येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ८६ वा वर्धापनदिन व श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिनानिमित्त …

Read More »

साधकाच्या अंतःकरणातील ग्रंथीचे समूळ उच्चाटन करून छेदन करणारा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ- नंदकुमार महाराज गोंदीकर

सेलू / प्रतिनिधी – साधकांच्या अंतकरणातील ग्रंथीचे समूळ उच्चाटन करून छेदन करणारा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ असून भगवंताच्या मुखातून जागृत अवस्थेत प्राप्त झालेले ज्ञान म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे . व जीवनातील व्यथा निवारण करणारी कथा म्हणजे भागवत कथा आहे .असे प्रतिपादन भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांनी गुरुपौर्णिमेनिमित येथील शिष्य परिवाराच्या वतीने दत्त मंदिर मध्ये आयोजित भागवत ज्ञान यज्ञ सोहळ्यात …

Read More »

पाथरी येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

पाथरी,दि 03 (प्रतिनिधी)ः शहरातील शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता.पाथरी जि. परभणी येथे बुधवार दिनांक 2 जुलै  रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष  सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अजिंक्य नखाते हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते, सोशल मीडियाचा वापर हा अत्यंत जपून केला पाहिजे असे आवाहन …

Read More »

‘शब्दांचं धन’ हे पुस्तक शब्दांचे आकाश मोकळे करणारे – डॉ. अशोक खेत्री

सेलू ( प्रतिनिधी ) अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांचे ‘ शब्दांचं धन ‘ हे पुस्तक शब्दांचे आकाश मोकळे करणारे आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेख पिंपळपानाच्या साथीने उमलतो. मारूती चितमपल्ली यांना उमेदीच्या काळात सावलीसारख्या अनेक थोर व्यक्ती भेटल्या. त्यांच्या सोबतच्या आठवणींना या पुस्तकातून मारूती चितमपल्ली यांनी उजाळा दिला आहे. असे प्रतिपादन लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक खेत्री ( वडवणी …

Read More »

नगर परिषदेच्या प्रवेशदारावर बेशरमाची झाडे लावून निषेध

सेलू ( प्रतिनिधी ) येथील उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट झाली असुन सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरत चालले आहे .येथे दररोज असंख्य पेशंट व सोबत त्यांचे नातेवाईक येतात. त्यांची या घाणेरड्या शौचालयामुळे गैरसोय मोठी गैरसोय होत आहे. व परिसरात दुर्गंधी देखील पसरत आहे . आपली तब्येत ठीक करण्यासाठी आलेल्या रुग्णांवर यामुळे आरोग्य खराब करण्याची वेळ आली आहे .तसेच त्यांना उघड्यावर …

Read More »

विद्यार्थ्यांनी चारित्र्यसंपन्न बनले पाहिजे : डॉ. मलिकार्जुन करजगी

पाथरी / प्रतिनिधि –  पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी जिमेदारीचे भान ठेउन समाजात वागले पाहिजे .आपण मोठे झाल्यानंतर ज्यांच्या सहकार्याने आपण ईथपर्यंत आलो त्यांना कधी विसरू नका तसेच विद्यार्थ्यानी चारीत्रसंपन्न बनले पाहिजे असे आवाहन पाथरी येथील स्व.नितीन महाविद्यालयात दि. 30 जुन रोजी 27वा दिक्षांत समारंभात डाॅ .मल्लिकार्जुन करजगी बोलत होते . पाथरी येथील स्व. नितीन महाविद्यालयातील या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राम फुन्ने …

Read More »

गंगाखेडमध्ये डेंग्यूचा वाढता प्रकोप – आरोग्य विभाग व पालिकेची निष्क्रियता

गंगाखेड – शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून, अनेक भागांत नागरिक डेंग्यूने बाधित होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे वाढली असताना देखील, गंगाखेड नगरपालिकेकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. शहरातील विविध वसाहतींमध्ये आणि मुख्य भागात अजूनही फवारणी झालेली नाही. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभाग व पालिकेच्या निष्क्रियतेमुळे संसर्ग …

Read More »