स्वातंत्र्य सेनानी भागीरथजी गुलाबचंदजी गेना यांच्या सन्मान माजी सैनिकांचा सत्कार सेलू / प्रतिनिधी – डाॅ. अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्ट , कुलस्वामिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून या मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी भागीरथजी गुलाबचंदजी गेना यांच्या शतकोत्तर जन्मोत्सवानिमित्त त्यांचा यथोचित सन्मान तसेच शहरातील माजी सैनिकांचा सत्कार कार्यक्रम साईबाबा मंदिर सभागृहात …
Read More »मराठवाडा
शतकपूर्ती केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाला उजाळा
नारायण पाटील सेलू,दि (16) मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे आजही अंगावर काटा आणणारा हा स्वातंत्र्य संग्राम होता.इंग्रजांपेक्षाही जुलमी राजवट निजामाची या मराठवाड्यात होती.अनेक जणांना या आंदोलनात हौतात्म्य आले.अनेकांनी आपल्या घराची होळी करून जुलमी निजमविरुद्ध सशस्त्र उठाव केला.परंतु या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये आज बहुतेकजण आता हयात नाहीत परंतु सेलू मध्ये या मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतलेले आणि आपल्या वयाची 100 वी गाठलेले बहुतेक परिसरात …
Read More »भाजपा परभणी महानगरतर्फे ‘सेवा पंधरवडा २०२५’ चे आयोजन
परभणी,दि 15 (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरासह परभणी महानगर जिल्ह्यात ‘सेवा पंधरवडा २०२५’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम १७ सप्टेंबर (मोदीजींचा वाढदिवस) पासून सुरू होऊन २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) पर्यंत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पार पडणार आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी मंडळनिहाय कार्यशाळा घेण्यात आल्या असून, कार्यक्रमांचे नियोजन प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी …
Read More »माखणी मंडळात ढगफुटी
गंगाखेड तालुक्यात माखणी महसूल मंडळातील डोंगरगाव, डोंगर जवळा, कोदरी, बडवणी सिरसम व इतर गावांमध्ये आज पहाटे 4 ते 7 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी / ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापूर आला. घराचे व पिकांचे नुकसान झाले आहे. सदर गावांना उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना दिलासा दिला. यावेळी तहसीलदार, गंगाखेड, तालुका कृषी अधिकारी व त्यांचे अधिनिस्त अधिकारी,कर्मचारी व …
Read More »राम भक्त फडणवीसांनी कर्जमाफीचे वचन निभवावे – बच्चु कडु
सोनपेठ दि.१५(प्रतिनिधी) राम भक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी पुर्वी दिलेले कर्ज माफीचे अश्वासन पुर्ण करुन खरे रामभक्त असल्याचे दाखवावे असे आवाहन शेतकरी नेते बच्चु कडु यांनी नरवाडी येथील हक्क सभेत बोलताना केले . शेतकरी नेते बच्चु कडु यांनी परभणी जिल्हात शेतकरी शेतमजूर मेंढपाळ व इतर घटकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी हक्क यात्रेचे आयोजन केले होते.या हक्क यात्रेचा समारोप सोनपेठ …
Read More »कोल्हावाडीचा हिरवाईचा संकल्प : लोकसहभागातून ३ लाखांचा निधी
पाथरी,दि 15 (प्रतिनिधी)ः सरकारचा कार्यक्रम आपला, पण अंमलबजावणी गावकऱ्यांच्या एकजुटीतून कशी साधता येते याचं उत्तम उदाहरण मानवत तालुक्यातील कोल्हावाडी गावाने घालून दिलं आहे. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि गावकऱ्यांच्या सहभागातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाने करण्यात आली. गावकऱ्यांनी जवळपास ३ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करून गावच्या वेशीवर व रस्त्यालगत २५० नारळ व बॉटल पाम झाडांची लागवड केली आहे. झाडांच्या …
Read More »श्री शिवाजी महाविद्यालयात रासायनिक विज्ञान मंचाची स्थापना
परभणी,दि 15 येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने वर्षभर विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने रासायनिक विज्ञान मंच स्थापन केला,या मंचाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भीमराव खाडे, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, विभागप्रमुख डॉ.सुरज आडे यांची उपस्थिती होती. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.भीमराव खाडे म्हणाले, सध्याचा काळ …
Read More »पालम शहरात विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, तिघे जखमी
पालम / प्रतिनिधी – पालम शहरातील बालाजी नगर परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या दुर्दैवी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी नगर येथील शेख शफीक शेख मुसा (31) यांची पान टपरी होती. त्यांनी ती बैलगाडीत ठेवून घरी आणल्यानंतर खाली घेत असताना टपरी घसरून बैलगाडीवरील लोखंडी दांडी विजेच्या तारेला लागली. यात काम करणारे सिद्धार्थ …
Read More »बोरी येथे ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन विस्कळित; संसारोपयोगी साहित्याचे नुकसान
बोरी – जिंतूर तालुक्यातील बोरीसह परिसरात रविवारी सकाळी ६:३० वाजता ढगफुटी सदृश पाऊस झाला. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. बोरी येथील नामदेव नगरच्या बाजूला असलेला पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागला. त्यामुळे कालव्याच्या बाजूने सांडव्यातून पाणी वाहत होते. वाहताना लोकांच्या घरात पाणी शिरलेले घरातील संसार उपयोगी साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. रविवारी सकाळी साडेसहा वाजता …
Read More »शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केले निषेध आंदोलन
सेलू / प्रतिनिधी – भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध म्हणून माझ कुंकू माझा देश या आंदोलन अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शहरात छत्रपती शिवाजी नगर मधील आपला दवाखाना परिसरात येथे रविवार (ति.14) निषेध आंदोलन केले. पहलगाम हल्ल्यामध्ये २६ माता-भगिनींचे कुंकू पुसल्या गेले. त्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. पहलगाम मधील दहशतवाद्यांन वर अद्याप कारवाई झाली नाही. आणि तरीही व्यापाराच्या दृष्टिकोनातून …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com