04/02/26
Breaking News

मुंबई / कोकण

शेतकऱ्यांसाठी 35,440 कोटींच्या दोन योजना,दिवाळीचं गिफ्ट

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) शेतकऱ्यांसाठी 35,440 कोटींच्या दोन योजना सुरू केल्या आहेत. ‘डाळ स्वावलंबन अभियान’ आणि ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’ अशी या योजनांची नावे आहेत. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात पंतप्रधानांवी कृषी, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील 5450 …

Read More »

अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसात होणार जमिनीची मोजणी

 : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्य सरकारनं मोजणीबाबत घेतलेल्या निर्णयासंदर्भात माहिती दिली. बावनकुळे म्हणाले, राज्यात खासगी भूमापक येणार आहेत. खासगी भूमापक आणल्यानं मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसात मोजणीचं प्रमाणपत्र मिळेल, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं. खासगी भूमापक यांना शासनाच्या रोवर दिला जाईल. त्यानंतर सिटी सर्वेयर रोवर मॅच करुन प्रमाणपत्र देईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? खासगी भूमापकांच्या निर्णयाबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की राज्यातील आमच्या जमाबंदी आयुक्तांची मोठी मागणी होती. राज्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी खत होतात. पोट हिस्से होतात. गुंठेवारी कायद्यानं घरं …

Read More »

हैदराबाद गॅझेटियर अध्यादेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई,दि 07 ः राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला होता. या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका दाखल केल्या होत्या. याचिकांकर्त्यांनी अध्यादेशावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे …

Read More »

वाचा… 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणासाठी सोडत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणासाठी सोडत जाहीर झाली आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत निघाली आहे. यातील 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच 67 नगरपरिषदांचे अध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. कोणत्या नगरपरिषदांचे अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे ते जाणून घेऊयात अनुसूचित जाती महिलांसाठी …

Read More »

चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये एक मोठा बदल..काही तासांत होणार रक्कम जमा

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) उद्यापासून (४ ऑक्टोबर) त्यांच्या चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये एक मोठा बदल राबवत आहे. या योजनेअंतर्गत, चेक जमा केल्यानंतर काही तासांत प्रक्रिया केली जाईल आणि तुमच्या खात्यात जमा केले जातील. सध्या, चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवस लागतात. या नवीन प्रणालीला “सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंट” असे म्हणतात. एकदा अंमलात आणल्यानंतर, बँका काही तासांत चेक स्कॅन करतील, सादर करतील आणि …

Read More »

लाखो बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण,15 कोटी रुपयांची वसुली केली जाणार

मुंबई,दि 02 ः राज्यातील महिलांसाठी मोठ्या धडाक्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सुरुवातीला सरसकटपणे लागू झालेली ही योजना आता कठोर निकषांमुळे अनेक महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषत: या योजनेचा अनुचित फायदा घेतलेल्या 8 हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असून, त्यांच्या खात्यात जमा झालेले सर्व हप्ते सरकार परत घेणार आहे. या निर्णयामुळे …

Read More »

घ्या आता… एसटीची भाडेवाढ.. लालपरीचा प्रवास महागला

एसटी महामंडळाने दिवाळी सणाच्या तोंडावर १० टक्के भाडे वाढीचा निर्णय घेतला आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडे वाढ लागू असणार आहे. वातानुकूलित आणि शिवाई बस सेवा वगळता सर्व बस सेवांसाठी हा निर्णय लागू असेल, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. कुणाकडून अधिकचे भाडे घेतले जाणार? १४ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून वा तदनंतर प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत …

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा….20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने त्याला 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते. राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज भरण्याची 30 सप्टेंबर 2025 रोजी शेवटची मुदत आहे. मात्र …

Read More »

आभाळ फाटणार……पुन्हा आठवडाभर ढगफुटी…

मुंबई, दि 22: 24 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे, आणि 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात अली आहे. या आठवड्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान 30 सप्टेंबर पर्यंत तरी राज्यातून मान्सून …

Read More »

लाडक्या बहिणांना ई-केवायसी बंधनकारक..दोन 2 महिन्यात करा अन्यथा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केले. लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी 2 महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे. ज्या महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल असे शासनाने स्पष्ट केले आहे.   राज्याच्या …

Read More »