राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यांनी तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा केली असून, यामुळे सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेले जमिनीचे तुकडे, आता कायदेशीर व्यवहारात आणता येणार आहेत. निर्णयासाठी महसूल, नगरविकास आणि जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित केली जाणार आहे. ही समिती पुढील …
Read More »मुंबई / कोकण
आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला-उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव …
Read More »भाजपा मिळणार नवे प्रदेशाध्यक्ष..एकच आला अर्ज
भारतीय जनता पक्षाला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. यासाठी रविंद्र चव्हाण यांनी आपला अर्ज केंद्रीय निरीक्षक किरेन रिजुजी यांच्याकडे दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. 1 जुलै रोजी संध्याकाळी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा …
Read More »जमिनीचे हे कागदपत्रे असणे बंधनकारक, अन्यथा शासन घेणार…..
मुंबई : शेतकऱ्यांकडे त्यांच्या शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रांचा अभाव असल्यास, कायद्यानुसार अशा जमिनीवर सरकार ताबा घेऊ शकते. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये महसूल विभागाकडून वेळोवेळी भूमापन आणि सर्वेक्षण केले जाते. त्यावेळी मालकीचे दस्तऐवज न सादर झाल्यास शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवरील हक्क सिद्ध करण्यात अडचणी येऊ शकतात. कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? राज्य महसूल नियमावलीनुसार कोणतीही जमीन ‘रिक्त’ किंवा ‘अनधिकृत’ असल्याचे सिद्ध झाल्यास ती शासनाच्या मालकीची समजली …
Read More »शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनाला मान्यता
लोकसभा निवडणुकीत सांगली कोल्हापूर पट्ट्यात फटका बसल्यानंतर स्थगिती दिलेल्या ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या भूसंपादनाचे काम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सांगली कोल्हापूरमधील शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता सरकारने भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक संपन्न झाली. या बैठकीत ८ मोठे निर्णय घेण्यात आले …
Read More »1500 रुपये कधी मिळणार….लाडक्या बहिणींचं लक्ष
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. योजना सुरु केल्यानंतर साधारणपणे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग केले जायचे. या योजनेद्वारे आतापर्यंत लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांची रक्कम देण्यात आलेली आहे. आता जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये …
Read More »लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.. शून्य टक्के व्याजदराने मिळणार कर्ज
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या अटी आणि शर्तींच्या कचाट्यात अडकली आहे. निवडणूक काळात पडताळणी न करता सरसकट लाभ दिल्यानंतर आणि त्याचा अमाप बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडल्यानंतर सरकारने हळूहळू पडताळणी सुरू करून त्या माध्यमातून आधी पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना नंतर अपात्र ठरवले. यामुळे लाडक्या बहिणींसह विरोधकांच्या मोठ्या टीकेला राज्य सरकारला सामोरे जावे लागले. मात्र यावर …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com