शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) शेतकऱ्यांसाठी 35,440 कोटींच्या दोन योजना सुरू केल्या आहेत. ‘डाळ स्वावलंबन अभियान’ आणि ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’ अशी या योजनांची नावे आहेत. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात पंतप्रधानांवी कृषी, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील 5450 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. तसेच 815 कोटी रूपयांच्या इतर प्रकल्पांची पायाभरणी केली.
‘डाळ स्वावलंबन अभियान’ या योजनेवर 11,440 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून 2030-31 सालापर्यंत डाळींचे उत्पादन सध्याच्या 25.238 दशलक्ष टनांवरून 35 दशलक्ष टनांपर्यंत वाढवणे आणि देशाचे आयात अवलंबित्व कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
Shabdraj www.shabdraj.com