राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 16 ते 21 जानेवारी दरम्यान असणार आहे. अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार आहे. मतदान 5 फेब्रुवारीला होणार असून मतमोजणी 7 फेब्रुवारीला होणार असून त्यानंतर निकाल जाहीर होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यक्रम
- 16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाईल
- अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होईल.
- उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी, दुपारी 3 वाजेपर्यंत.
- निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी – 27 जानेवारी दुपारी 3.30 वाजेनंतर जाहीर केली जाईल.
- मतदानाचा दिनांक – 5 फेब्रुवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल.
- मत मोजणी आणि निकाल -7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून.
Shabdraj www.shabdraj.com