मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने आज २८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण राज्यात ‘शासकीय सुट्टी’ आणि ‘राजकीय दुखवटा’ जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.
शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे:
कार्यालये बंद: राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये आज पूर्णपणे बंद राहतील.
शिक्षण संस्थांना सुट्टी: सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ध्वज अर्ध्यावर: राज्यातील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज आज अर्ध्यावर उतरवलेले राहतील.
कार्यक्रम रद्द: शासनाकडून आयोजित केलेले आजचे सर्व करमणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत.
Shabdraj www.shabdraj.com