04/02/26
Breaking News

संत जीवनात आल्याशिवाय परमार्थाचा वसंत फुलत नाही-ह भ प लक्ष्मीप्रसाद पटवारी

सेलू ( नारायण पाटील )
मानवाच्या जीवनात संसाररूपी सूर्याचे किरण सदैव ताप देत असतात परंतु संत सहवास झाला तर संत चंद्राचे शीतल किरण बनून आपल्याला शांत करीत असतात .कारण संत जीवनात आल्याशिवाय परमार्थाचा वसंत फुलत नाही .असे विचार ह भ प लक्ष्मीप्रसाद पटवारी यांनी सेलू येथील ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेत दि २९ रोजी पाचवे पुष्प गुंफताना व्यक्त केले .
शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब संस्थान व ज्ञानेश्वरी आराधना मंडळ ,सेलू यांच्या वतीने पुण्य पावन श्रावण महिन्यानिमित ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे .दि २५ जुलै ते २३ औगस्ट या काळात दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत ही प्रवचन सेवा सुरू असून दररोज ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक यामध्ये विनामूल्य आपली सेवा देत आहेत .

आज दि २९ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज व केशवराज बाबासाहेब महाराज्यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रवचन सेवेला प्रारंभ झाला .यावेळी प्रवचन सेवेत संत सहवासाचे महत्व सांगताना ह भ प लक्ष्मीप्रसाद पटवारी यांनी सांगितले की , संतांच्या सहवासात व शरणागतीतच जीवनाची इतिकर्त्यवता आहे . आहे .माणसाने संसाराच्या गाड्यात न गुरफटता संतांच्या चरणावरती लिन होऊन अध्यात्म व परमार्थ साधला पाहिजे .तरच जीवनाची सार्थकता आहे . कारण संतप्राप्ती हाच मोक्षाचा एकमेव मार्ग आहे .संतांचा सहवास मिळाला तर त्याचे जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे . भगवंत जेव्हा संतांचा अवतार घेतात त्यावेळी ते कितीतरी पटीने कृपाळू व दयाळू होतात .म्हणूनच संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणून म्हणले जाते .
ज्ञानेश्वरी चा उद्देश उदात्त असाच आहे .परंतु साधकाला अंतःकरणात ज्ञानेश्वरी बद्दल भभुक्षिता निर्माण होणे गरजेचे आहे .व सेलूकरांना या ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा कार्यक्रमाच्या माध्यमातून पावन पवित्र अशा श्रावण महिन्यात मिळत आहे .त्यामुळे ते खरंच खूप भाग्यवान आहेत .
सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …