04/02/26
Breaking News

मराठवाडा

“मदतीचा हात… आणि माणुसकीचा स्पर्श”  छायाचित्रकार पवन घटकांबळे आणि मित्र परिवार यांचा प्रेरणादायी उपक्रम

“पूराच्या पाण्यात वाहून गेल्या अनेकांच्या आशा… पण माणुसकीचा प्रवाह अजूनही थांबलेला नाही! पुणे – निसर्गाच्या रौद्र रूपासमोर माणूस क्षणभर हतबल होतो, पण माणुसकीचे बळ असेल तर कोणतेही संकट लहान ठरते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुणे येथील छायाचित्रकार पवन घटकांबळे यांनी पूरग्रस्त बांधवांसाठी हाती घेतलेल्या उपक्रमाने हे जिवंत उदाहरण निर्माण केले आहे.   अस्मानी संकटामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील …

Read More »

दिव्यांगाना भेट वस्तू देऊन साजरा होणार अभिष्टचिंतन सोहळा

सेलू / नारायण पाटील – दिव्यांगांचे आधारस्तंभ असलेले माजी जी प सभापती अशोकराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त सेलूत भव्य दिव्यांग मेळावा व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन दि १२ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी१० वाजता करण्यात आले आहे . येथील महेशनगर मधील नगर परिषदेच्या साई नाट्यगृहात संपन्न होणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी उदघाटक म्हणून राज्याच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना.मेघनादीदी साकोरे बोर्डीकर या राहणार …

Read More »

सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात तुफान तेजी पाहायला मिळत आहे. सध्या सणासुदीचा काळ आहे. या दिवसांत सोने आणि चांदीच्या भावाने उच्चांक गाठल्याने सोने खरेदीदारांमध्ये नाराजी आहे. सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात गेल्या दहा दिवसांकडून दररोज वाढ होत आहे. आज चांदीच्या दरात केवळ एक तासात सात हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली. दोन दिवसात चांदीच्या दारामध्ये तब्बल 15000 रुपयांनी वाढ झाल्याचे …

Read More »

आडगाव येथे नवोदय विद्यालय सराव परीक्षेचे आयोजन:विजय चव्हाण यांचा उपक्रम

हिंगोली,दि 09ः आमदार राजू नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त आडगाव रंजेबुवा ता. वसमत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रविवार दिनांक 12 ऑक्टोबरला जवाहर नवोदय विद्यालय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक विजय चव्हाण यांनी दिली. वसमत तालुक्यातील आडगाव येथील स्पर्धा परीक्षेचा नवोदय पॅटर्न चर्चेत आहे.  परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी म्हणून आणि आमदार नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून …

Read More »

सोनपेठ येथे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा एल्गार

सोनपेठ (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हे सध्या पूरपरिस्थिती तसेच अतिवृष्टी मुळे ध्वस्त झालेले असताना विद्यमान निष्क्रिय राज्य सरकार शेतकऱ्यांना केवळ आश्वासन देत आहे. तसेच या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे शिवसेना उभी आहे. त्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज दि. ०८ बुधवार रोजी सोनपेठ तहसील कार्यालय समोर शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार कडे अतिवृष्टी मुळे …

Read More »

परभणी भाजपात इनकमिंग वाढले,तरुण कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश

परभणी : भारतीय जनता पार्टी परभणी महानगर कार्यालय, वसमत रोड येथे आज झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये आदित्य थिटे, वेदांत शिंदे, अमित बायस, स्वयंम पदमगिरवर, समय कदम, अथर्व कदम, प्रथमेश भरोसे, प्रसाद शिंदे, गणेश चिलपीपरे, समर्थ देवडे, सौरभ देवकते, यश घाटोल, रितेश शिंदे, अर्जुन परिहार, जय …

Read More »

शाळांमधून सुरक्षा समिती,तक्रारपेटी अधिक सजग होणे आवश्यक

सेलू(प्रतिनिधी.)दि 08 सेलू मध्ये पोक्सो अंतर्गत दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.यामध्ये पीडित या अल्पवयीन आहेत तर आरोपींमध्ये एका शिक्षकाचा सहभाग असल्याने शिक्षण विभागाने देखील शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या समित्या अधिक सजगपणे कार्यरत करणे आवश्यक असल्याचे मत पालकांमधून व्यक्त होत आहे. शाळा स्तरावर विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी विद्यार्थी सुरक्षा समिती,सखी सावित्री समिती ,तक्रार निवारण समिती अशा समित्या आहेत.त्यातच शाळांमध्ये …

Read More »

पाथरीत वकिल संघाने केला  बाबाजानी दुर्राणी यांचा  सत्कार

रमेश बिजुले पाथरी,दि 08 ःपाथरीत अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेचा प्रस्ताव मंजूर झाल्याने यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा  सत्कार पाथरी येथील वकिल संघाने करुन त्यांचे आभार मानले आहेत. तत्कालीन पालकमंत्री  नवाब मलीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी येथे वरिष्ठ स्तर न्यायालय व अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. …

Read More »

सरकारने तिजोरी उघडली,भरीव मदतीची घोषणा…वाचा कशी असणार मदत

राज्यात आलेल्या महापुराने शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन उद्धवस्त झाले. राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत असताना दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारने आपली तिजोरी उघडली असून भरीव मदतीची घोषणा केली आहे.आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आम्ही पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. सरकारने छोटी मोठी …

Read More »

मुकमोर्चाद्वारे सेलूकरांनी व्यक्त केला संताप ,अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

सेलू,दि 07 (प्रतिनिधी)ः शहरात 3 दिवसांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अटक असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज दि 07 रोजी समस्त सेलूकरांच्या वतीने मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते . मूक मोर्चा असला तरी यामध्ये संतप्त नागरिकांचा आक्रोश दिसून येत होता. सकाळी साडेदहा वाजता येथील लोकमान्य टिळक पुतळ्या पासून निघालेला मुकमोर्चा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला .उपविभागीय अधिकारी …

Read More »