बच्चू कडू आपला ‘प्रहार’ राजकीय पक्ष आता अधिकृतपणे शिवसेनेत विलीन करणार आहेत. मात्र, त्यांची ‘प्रहार’ सामाजिक संघटना पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे कार्यरत राहील आणि जनहिताची कामे करत राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बच्चू कडू यांना प्रहार या सामाजिक संघटनेचा राजकीय वाटचालीत फायदा झाला होता. त्यानंतर त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. आता शिवसेना शिंदे गटात विलीन होत असताना दुसरीकडे प्रहार सामाजिक संघटनेचं अस्तित्व मात्र राहणार आहे.या मोठ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर, काल रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विलीनीकरणाच्या अटी आणि भविष्यातील राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे, बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती. त्यामुळे अनेक वर्षांनंतर ते पुन्हा एकदा आपल्या मूळ पक्षात परतत असल्याचे चित्र दिसत आहे.
Shabdraj www.shabdraj.com