सेलू(प्रतिनिधी) ‘वाचन संस्कार रुजविण्यासाठी सामाजिक संस्था, राजकीय मंडळींनी सार्वजनिक वाचनालयात विविध उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच अर्थिक अडचणीचा अडसर दूर करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात यावेत, यासाठी पुढाकार घेण्यात यावा.’ असे प्रतिपादन गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी केले. शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयास दि २६ डिसेंबर शुक्रवार रोनी उदय जाधव यांनी भेट दिली. यावेळी या ग्रंथालयातील धार्मिक …
Read More »Shabdraj
श्री संत जनाबाई महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रात दुहेरी धमाका
गंगाखेड (प्रतिनिधी): श्री संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड येथील कनिष्ठ व वरिष्ठ विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाच्या उज्ज्वल क्रीडा परंपरेला नवा मान मिळवून दिला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन सेंट्रल झोन हॉकी स्पर्धेत महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाच्या मुलांच्या हॉकी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला. संघाचे कर्णधार सुधीर कळसकर, …
Read More »राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सेलूत पत्रक वाटून जनजागृती
सेलू,दि 28 ः राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक दिंडी पंधरवाडा उपक्रमात आज दि २७ डिसेंबर रोजी पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली . शहरतील सातोना रोड वरिल मॉर्निंग वॉक ग्रुप व केशवराज बाबासाहेब विद्यालयात ग्राहक संरक्षण कायदा १९८६ व २०१९ अंतर्गत आपणास मिळालेले अधिकार याबाबत चे पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.यायाप्रसंगी मॉर्निंग वॉक ग्रुपचे सर्व सदस्य व के.बा विद्यालय या शाळेतील विद्यार्थी …
Read More »वाखरीत चार जानेवारीला माजी विद्यार्थी मेळावा
सदाशिव पोरे पंढरपूर.दि 28 जवाहरलाल शिक्षण प्रसारक विश्वस्त मंडळ, पंढरपूर संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा भव्य माजी विद्यार्थी मेळावा दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता शाळेत आयोजित केल्याची माहिती प्राचार्य मोहन क्षीरसागर यांनी दिली.त्याचवेळी संस्थेचे अध्यक्ष स्व. आबासाहेब सोनवणे यांची प्रथम पुण्यतिथी असून त्यांच्या आठवणीला उजाळा दिला जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सांगोला तालुक्याचे मा. आमदार …
Read More »निराधार महिलेस शेळी–करडू देत एचएआरसीची सामाजिक बांधिलकी
जिंतूर, ता. 27 : होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी), परभणी संस्थेच्या वतीने थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील एका निराधार विधवा महिलेस उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेळी व करडू भेट देण्यात आले. यासोबतच संबंधित कुटुंबास संसारोपयोगी भांडे साहित्य, जीवनावश्यक किराणा तसेच तीन अनाथ बालिकांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. पार्श्वभूमी पतीच्या निधनानंतर अत्यंत बिकट …
Read More »भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद
जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह सर्व कामे सुरक्षित, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 9 जानेवारी 2026 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये मात्र आठवडाभर मंदिर भाविकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, …
Read More »8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट..पगार कधी अन् किती
नवी दिल्ली : देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. बराच काळ पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये वाढ होणार का, याबाबत चर्चा सुरू होती. आता आयोगाचे अधिकृत नियुक्ती झाल्याने येत्या काही वर्षांत सरकारी वेतन रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. मात्र नेमकी वाढ किती होणार आणि ती कधी लागू होणार, हे अद्याप ठरलेले नाही. 8व्या केंद्रीय वेतन आयोगाचा थेट फायदा 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 69 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. म्हणजेच देशातील मोठ्या लोकसंख्येच्या उत्पन्नावर याचा थेट परिणाम होईल. सध्या लागू असलेल्या 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अपेक्षा आहे की नवीन वेतनरचना वेळेत लागू केली जाईल. सरकारी संकेतांनुसार, सुधारित वेतन आणि पेन्शन 1 जानेवारी 2026 पासून लागू मानली जाऊ शकते. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत माहिती दिली की 8व्या वेतन आयोगाचे गठन 3 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. या आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजन प्रभा देसाई आहेत. प्रो. पुलक घोष यांची अर्धवेळ सदस्य म्हणून, तर पंकज जैन यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाला आपला अहवाल तयार करण्यासाठी सुमारे 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, त्यामुळे त्याचा अहवाल 2027 च्या आसपास सादर होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये किती वाढ होईल, हे मुख्यतः फिटमेंट फॅक्टरवर ठरणार आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या बेसिक पगार आणि पेन्शनवर लावला जाणारा गुणक. जर फिटमेंट फॅक्टर 2.15 च्या आसपास ठेवण्यात आला, तर अनेक कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार दुप्पट किंवा त्याहून अधिक होऊ शकतो. याचा परिणाम केवळ पगारावरच नाही, तर HRA, पेन्शन आणि इतर भत्त्यांवरही होणार आहे. गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर आणि कर्मचारी संघटनांमध्ये महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) बेसिकमध्ये विलीन केला जाईल, अशी चर्चा जोरात होती. मात्र, वित्त मंत्रालयाने यावर स्पष्ट भूमिका घेतली असून सध्या असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले आहे. DA आणि DR पूर्वीप्रमाणेच दर सहा महिन्यांनी AICPI-IW निर्देशांकाच्या आधारे वाढवले जात राहतील. त्यामुळे या विषयावर पसरलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
Read More »आधार-पॅन लिंक न केल्यास 31 डिसेंबर नंतर पॅन कार्ड निष्क्रिय
मुंबई : जर तुमच्याकडं पॅन कार्ड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्राप्तिकर विभागानं सर्व पॅन कार्डधारकांना त्यांचे पॅन आधार कार्डाशी तात्काळ लिंक करण्याचं आवाहन केलं आहे. आधार-पॅन लिंक न केल्यास 31 डिसेंबर 2025 नंतर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. अनेक करदात्यांना अजूनही ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. लिंकिंग न केल्यास 1000 रुपयांचा दंड भरावा …
Read More »तळीरामांसाठी खुशखबर… नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यविक्रीच्या वेळेत शिथिलता
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरची रात्र नेहमीच खास असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मद्यपींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यामुळे यंदाचं नववर्ष अधिक दणक्यात साजरं करता येणार आहे. राज्याच्या गृह विभागाने ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. तसेच बार आणि क्लबमध्ये पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यसेवन करता येणार आहे. अन्य दिवशी मात्र …
Read More »पालक-चिकन खाण्यामुळे एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू
आवडीचे चमचमीत पदार्थ ताटात दिसले की आपण त्याच्यावर तुटून पडतो. मात्र ते अतिप्रमाणत खाल्लं की वेगवेगळ्या परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागत. अशीच एक घटना ओडिशात घडली आहे. पालक चिकन खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. विषबाधेमुळे हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील इटप गावात एका कुटुंबाने पालक चिकन खाल्लं. त्यानंतर त्यांना त्रास …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com