22/03/26
Breaking News

महाराष्ट्र

शिवजयंतीनिमित्त गुगळी धामणगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

सेलू ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बळीराजा मित्र मंडळाच्या वतीने तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबिर गुगळेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात पार पडणार आहे. बळीराजा मित्र मंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून विविध समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. स्वच्छता मोहीम, …

Read More »

पतंजलीच्या मधाची  झाली साखर; ग्राहक पंचायतची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

नारायण पाटील सेलू :- सेलू येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी पतंजली कंपनीच्या मधाबाबत गंभीर तक्रार दाखल केली आहे. डॉ. मोरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी सेलू येथील पतंजली स्टोअरमधून एक किलो पॅकबंद मध खरेदी केला होता. त्यातील सुमारे अर्धा किलो मध वापरल्यानंतर उर्वरित अर्धा किलो मध पूर्णपणे गोठून साखरेसारखा …

Read More »

विमान कंपनी मालकाच्या मुलाचं केंद्रीय मंत्र्याशी कनेक्शन-रोहित पवार

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही खळबळजनक आरोप केले. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे  कशाप्रकारे घातपात असू शकतो, अशी थिअरी मांडण्याचा प्रयत्न रोहित पवार  यांनी केला. यावेळी रोहित पवार यांनी भाजपच्या ट्रोलर्सचाही समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात की, मी भावनेच्या भरात बोलतोय. पण मी भावनेच्या भरात बोलत असेन तर भाजप …

Read More »

पायलटच्या मदतीनेच अजित पवारांचा घातपात:रोहित पवारांचा हादरवणारा आरोप

  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असतानाही वैमानिक कॅप्टन सुमित कपूर  याने विमान माघारी न फिरवता खाली उतरवले. त्याने विमानाचा स्फोट (Plane Blast) करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळले, असा खळबळजनक आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी अजित …

Read More »

अजित पवारांच्या दुर्घटनेबाबत सर्वात मोठी अपडेट

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. विमान अपघात तपास यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दुर्घटनेनंतर विमानातील दोन्ही नोंदणी साधनांवर तीव्र आगीचा परिणाम झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही साधने बराच काळ ज्वाळांमध्ये राहिल्याने त्यांना मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेला काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे यंत्रणेने …

Read More »

581 विद्यार्थ्यांची उत्तरे शब्दशः एकसारखीच,26 शिक्षक निलंबित

वाशिम,दि 17 ः शिक्षकांनीच १२वीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिममधील एका महाविद्यालयात हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २६ शिक्षकांना निलंबित करण्यात आलं असून विध्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव अमरावती बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकारानंतर शैक्षणिक वर्तुळात विविध चर्चाही रंगू लागल्या आहेत.   राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. सोमवारी फिजिक्सचा पेपर होता. त्यात भरारी पथकाने …

Read More »

विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश! विज्ञान वारी जिल्हास्तरीय साठी निवड

सेलू (प्रतिनिधी): परभणी येथील परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञानवारी पात्रता पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय परीक्षेत सेलू येथील विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची तृतीय फेरी (लेव्हल–III) जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे. गौरांग निलेश पाटील व प्रणव विठ्ठल सुरवसे यांची या विज्ञानवारी …

Read More »

आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपल्या शाळेला विसरू नका-उल्हास पांडे

सेलू दि १७(प्रतिनिधी) विद्यार्थी अवस्था ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय अनमोल क्षण असतात.विद्यार्थ्यांनी आयुष्यात यश मिळवताना शाळेने केलेले संस्कार आयुष्यभर शिदोरी म्हणून सोबत ठेवावे आणि आपल्या जीवनात कितीही मोठे झालात तरी शाळेला विसरू नका असा मोलाचा सल्ला नूतन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उल्हास पांडे यांनी केले. येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख …

Read More »

सरकारने थकीत शेतकरी कर्जदारांची माहीती मागवली…लवकरच…

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून राज्यातील सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाच्या शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काही सकारात्मक घोषणा होऊ शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या हालचालींमुळे आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. जून 2025 पर्यंत …

Read More »

विमानाचा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याची शक्यता

पुणे,दि 16 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार मुंबईवरून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळावर उतरताना विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान जमिनीवर जोरात आदळले. त्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. या अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला. मात्र तो जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर …

Read More »