04/02/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

परभणी भाजपात इनकमिंग वाढले,तरुण कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश

परभणी : भारतीय जनता पार्टी परभणी महानगर कार्यालय, वसमत रोड येथे आज झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये आदित्य थिटे, वेदांत शिंदे, अमित बायस, स्वयंम पदमगिरवर, समय कदम, अथर्व कदम, प्रथमेश भरोसे, प्रसाद शिंदे, गणेश चिलपीपरे, समर्थ देवडे, सौरभ देवकते, यश घाटोल, रितेश शिंदे, अर्जुन परिहार, जय …

Read More »

शाळांमधून सुरक्षा समिती,तक्रारपेटी अधिक सजग होणे आवश्यक

सेलू(प्रतिनिधी.)दि 08 सेलू मध्ये पोक्सो अंतर्गत दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.यामध्ये पीडित या अल्पवयीन आहेत तर आरोपींमध्ये एका शिक्षकाचा सहभाग असल्याने शिक्षण विभागाने देखील शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या समित्या अधिक सजगपणे कार्यरत करणे आवश्यक असल्याचे मत पालकांमधून व्यक्त होत आहे. शाळा स्तरावर विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी विद्यार्थी सुरक्षा समिती,सखी सावित्री समिती ,तक्रार निवारण समिती अशा समित्या आहेत.त्यातच शाळांमध्ये …

Read More »

पाथरीत वकिल संघाने केला  बाबाजानी दुर्राणी यांचा  सत्कार

रमेश बिजुले पाथरी,दि 08 ःपाथरीत अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेचा प्रस्ताव मंजूर झाल्याने यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा  सत्कार पाथरी येथील वकिल संघाने करुन त्यांचे आभार मानले आहेत. तत्कालीन पालकमंत्री  नवाब मलीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी येथे वरिष्ठ स्तर न्यायालय व अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. …

Read More »

धनुष्यबाण कोणाकडे…निर्णय पुन्हा

जवळपास गेल्या अडीच-तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालय बुधवारी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल देईल, अशी चर्चा कालपासून रंगली होती. मात्र, ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भात एक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीला आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या  खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली. त्यामुळे आजही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि …

Read More »

हैदराबाद गॅझेटियर अध्यादेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई,दि 07 ः राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला होता. या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका दाखल केल्या होत्या. याचिकांकर्त्यांनी अध्यादेशावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे …

Read More »

सरकारने तिजोरी उघडली,भरीव मदतीची घोषणा…वाचा कशी असणार मदत

राज्यात आलेल्या महापुराने शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन उद्धवस्त झाले. राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत असताना दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारने आपली तिजोरी उघडली असून भरीव मदतीची घोषणा केली आहे.आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आम्ही पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. सरकारने छोटी मोठी …

Read More »

मुकमोर्चाद्वारे सेलूकरांनी व्यक्त केला संताप ,अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

सेलू,दि 07 (प्रतिनिधी)ः शहरात 3 दिवसांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अटक असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज दि 07 रोजी समस्त सेलूकरांच्या वतीने मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते . मूक मोर्चा असला तरी यामध्ये संतप्त नागरिकांचा आक्रोश दिसून येत होता. सकाळी साडेदहा वाजता येथील लोकमान्य टिळक पुतळ्या पासून निघालेला मुकमोर्चा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला .उपविभागीय अधिकारी …

Read More »

वाचा… 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणासाठी सोडत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणासाठी सोडत जाहीर झाली आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत निघाली आहे. यातील 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच 67 नगरपरिषदांचे अध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. कोणत्या नगरपरिषदांचे अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे ते जाणून घेऊयात अनुसूचित जाती महिलांसाठी …

Read More »

सध्याच्या युगात डिजिटल साक्षरता अत्यंत महत्वाची : पोलीस उपनिरीक्षक आदित्य लाकुळे

परभणी – येथील शारदा महाविद्यालयात सायबर सेल परभणी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने सायबर कायद्याविषयीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून परभणी येथील नानल पेठचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारोती कारवर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गोपिका सोनेत, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक आदित्य लाकुळे, नानल पेठ पोलीस स्टेशनच्या …

Read More »

अल्पवयीन विद्यार्थीनी वरील लैंगिक अत्याचाराच्या विरोधात उद्या सेलूत मूक मोर्चा

आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची एक मुखी मागणी सेलू / नारायण पाटील – मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळख असलेल्या सेलू शहरात ए आय प्रणालीद्वारे काढलेल्या फोटो व व्हिडीओ चा वापर करीत बदनामी करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली .या प्रकरणी पंडित मुलीच्या फिर्यादीवरून सेलू पोलिसात एका नामांकित संस्थेतील शिक्षकासह दोन आरोपीच्या विरोधात पोक्सो कायद्यानुसार …

Read More »

पं.पलुस्करांचे सगीत क्षेत्रात मोठे योगदान- गोविंदभाऊ जोशी

नादब्रंह्म संगीत विद्यालयाच्या संगीत समारोहाला चांगला प्रतिसाद सेलू – भारतीय शास्त्रीय संगीत जनसामांन्या पर्यंत पोहचवण्याठी तसेच संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी स्वातंत्र्य पूर्व काळात इ.स.1901 गांधर्व महाविद्यालय , नासीक येथे रामनाथ आश्रमाची स्थापना,संगीत शिक्षणाची व्यवस्था,असे पंडीत विष्णू दिगंबर पलुस्करांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जेष्ठ संगिततज्ञ गोविंदभाऊ जोशी यांनी केले. येथील नादब्रंह्म संगीत विद्यालयाच्या वतीने पंडीत पलुस्कर पुण्यतिथी निमित्त शनिवार दिनांक …

Read More »

स्वाभीमानी शेतकरी संघटनेने काढला रुमणं मोर्चा

परभणी/प्रतिनिधी जिल्हयात मागील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेकवेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीपातील पिकांसहीत फळबागा आणि भाजीपाला पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र याबाबत राज्यसरकार कुठलेही ठोस पाऊल उचलतांना दिसत नसल्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. दरम्यान प्रशासनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी कुणीही न आल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राष्ट्रीय महामार्ग आडविला. यावेळी दिलेल्या निवेदनात …

Read More »

शारदा महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

परभणी : येथील शारदा महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती प्राणीशास्त्र विभागाकडून उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे, डॉ. भगवान पाटील व सुरेश जयपूरकर यांची विचार मंचावर उपस्थिती होती. प्रथमत: महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे …

Read More »

चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये एक मोठा बदल..काही तासांत होणार रक्कम जमा

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) उद्यापासून (४ ऑक्टोबर) त्यांच्या चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये एक मोठा बदल राबवत आहे. या योजनेअंतर्गत, चेक जमा केल्यानंतर काही तासांत प्रक्रिया केली जाईल आणि तुमच्या खात्यात जमा केले जातील. सध्या, चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवस लागतात. या नवीन प्रणालीला “सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंट” असे म्हणतात. एकदा अंमलात आणल्यानंतर, बँका काही तासांत चेक स्कॅन करतील, सादर करतील आणि …

Read More »

श्री शिवाजी विधी महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

परभणी,दि 02 (प्रतिनिधी)ः श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी,राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे प्राचार्य डॉ. एम. एल. धर्मापुरीकर यांच्या उपस्थितीत महाविद्यालत दोन महापुरुष ज्यांनी देशाला घडविण्यात मोलाचे योगदान दिले एक म्हणजे ज्यांना “राष्ट्रपिता” म्हणून ओळखले जाते. त्यांनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारलेले स्वातंत्र्य …

Read More »