25/06/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

लग्नाळू तरुणांचा प्रश्न विधानसभेत गाजला

जागतिक महिला दिनानिमित्त विधानसभेत एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत आणि गंभीर सामाजिक समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. “ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या असून, लग्नासाठी मुलांनाच हुंडा द्यावा लागत आहे,” अशा शब्दांत सोळंके यांनी ग्रामीण तरुणांची व्यथा मांडली. या परिस्थितीमुळे फसवणुकीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले असून, …

Read More »

आरटीई प्रवेशाच्या 1 किमी अटीला स्थगिती

आरटीई कायद्याअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. याच कायद्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या आरटीई प्रवेशाच्या एक किमीचा अंतराचा निर्णय न्यायालयाने स्थगित केला आहे. याआधी सरकारच्या नव्या नियमानुसार आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवायचा असेल तर विद्यार्थाच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरात …

Read More »

गंगाखेड शहर घाणीच्या विळख्यात; नगरसेविका कविता राठोड आक्रमक

प्रतिनिधी | गंगाखेड गंगाखेड शहरात सध्या घाणीचं अक्षरशः साम्राज्य माजलं असून, स्वच्छतेची अवस्था पूर्णपणे ढासळली आहे. नगर परिषद प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा थेट आरोप यशवंत सेना गंगाखेड शहर विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका कविता संदीप राठोड यांनी केला आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात त्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सोमवार …

Read More »

 संकल्प संस्थेकडून जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पाथरी (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील समाजहितासाठी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. “शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी पाऊल उचलणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव” या विषयावर आयोजित या कार्यक्रमात ऊसतोड कामगार माता, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच हंगामी वस्तीगृहातील स्वयंपाकी महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला …

Read More »

बाभळगाव येथे लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक आजाराचे लसिकरण शिबीर

पाथरी,दि 09 ः पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे शनिवारी  (दि.सात) पशुसंवर्धन विभागांमार्फत लाळ खुरकूत या प्रतिबंधात्मक आजाराच्या लसीकरणाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य अण्णासाहेब रणेर यांच्या हस्ते झाले यावेळी पाथरी पंचायत समिती सदस्य श्रीधर किसनराव गिराम,सरपंच माणिकराव रणेर, पाथरी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ बागेस बसेट, वाघाळा पशुधन केंद्राचे प्रमुख डॉ के. एन. जाधव, …

Read More »

पूर्णा येथे मंगळवारी महिला बचत गटांचा सन्मान सोहळा

सुशिल दळवी पूर्ण,दि 09 ः पूर्णा नगर परिषद, दीनदयाल उप जीविका अभियान (DJAY) आणि स्वाभिमान शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला मेळावा’ व महिला बचत गटांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आला असून शहरातील महिला बचत गटांनी व्यवसाय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. १० …

Read More »

हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर? तपासणी करून व्यावसायिक सिलेंडर बंधनकारक करा – गॅस एजन्सीची प्रशासनाला मागणी

प्रतिनिधी | गंगाखेड. गंगाखेड शहरातील अनेक हॉटेल, ढाबे व खाद्यव्यवसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त होत असून, यामुळे सामान्य ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत असल्याची बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व हॉटेलांची तपासणी करून त्यांना व्यावसायिक १९ किलोचा गॅस सिलेंडर वापरणे बंधनकारक करावे, अशी मागणी गंगाखेड येथील अक्षय गॅस एजन्सीकडून प्रशासनाकडे करण्यात आली …

Read More »

शुभंकरोती फाउंडेशनला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

सेलू / प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुभंकरोती फाउंडेशनच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याची तसेच महिलावर्गाच्या स्वावलंबितेसाठी घेतलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, आमदार मनीषा कायंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे …

Read More »

पाथरी तालुक्यात ‘संकल्प मानव विकास संस्था’तर्फे १२ गावांत आरोग्य शिबिरे; १,६६८ मुलांची तपासणी

पाथरी / प्रतिनिधी – स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन संकल्प मानव विकास संस्था यांच्या वतीने पाथरी तालुक्यातील १२ गावांमध्ये विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. दिनांक २० फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये एकूण १,६६८ मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मसलातांडा, कानसुर, नाथरा, जवळाझुटा, बाबुलतार, टाकळगव्हाण, गुंज उमरा, पाथरगव्हाण बु., देवनांद्रा, बोरगव्हाण आणि …

Read More »

कुपटा,वालुर येथे समाधान शिबिराचे आयोजन

सेलू दि ०६(प्रतिनिधी.) महसूल विभागाशी संबंधीत सेवा तळागळातील लोकांपर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेले आहेत. सदरील सुधारणाचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विदयार्थ्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी विशेष जनजागृती व प्रसार अभियान तीव्र स्वरुपात राबविण्यात येणार आहे. त्याकरीता छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान टप्पा 1 अंतर्गत दिनांक ०७ मार्च रोजी वालुर महसूल मंडळामध्ये दुर्गादेवी बाजार …

Read More »

काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं…अनेक मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प २०२६-२७ सादर केला. या अर्थसंल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. शेतकरी, विद्यार्थी, महिला, नोकरदारवर्ग, व्यावसायिक या सर्व जण या अर्थसंकल्पाची वाट पाहत होते. काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. अखेर आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काय …

Read More »

डॉ.अमित कुलकर्णी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

सेलू (प्रतिनिधी ) येथील नूतन महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्रज विभागाचे कर्तव्यदक्ष व अभ्यासू सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित दिलीपराव कुलकर्णी यांना प्रतिष्ठेचा “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६” बहाल करण्यात येणार आहे. हा मानाचा पुरस्कारSwiftNLift Media And Tech LLP यांच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. दि. ७ मार्च २०२६ रोजी नागपूर येथे संपन्न झालेल्या या समारंभात महाराष्ट्र राज्याचे शालेय …

Read More »

सेलूत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची जय्यत तयारी

सेलू दि ५ ( नारायण पाटील ) शहरात अलंकापुरी नगरी, मयुरी पार्क परिसर, सातोना रोड येथे ११ मार्च ते १९ मार्च या कालावधीत होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून यशस्वीतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. पारायण सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात रोज २५००० वाचक पारायण करतील. भोजनासाठी वेगळा मंडप केला असून एकावेळी ३००० हजार भाविक प्रसादाचा …

Read More »

सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक,आजचे नवे दर…

नवी दिल्ली : अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळं सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरु होती. आज सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. 5 मार्चला 24 कॅरेट सोन्याचे दर 2698 रुपयांनी कमी होऊन 159850 रुपयांवर आले आहेत. तर, सराफा बाजारात सोने उच्चांकाच्या तुलनेत 16271 रुपये स्वस्त आहे. सोन्याचा दर 176121 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जीएसटीसह …

Read More »

अजितदादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

२८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विमान कंपनी आणि तपास करणाऱ्या संस्थेवर काही प्रश्न उपस्थित केले होते. या पत्रकार परिषदेचा आज तिसरा भाग होता. याआधी रोहित पवार यांनी १० आणि १९ फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. आज मुंबईत तिसरी पत्रकार परिषद झाली. ज्यामध्ये रोहित पवार यांनी …

Read More »