12/06/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

कळगाव येथील विकास कामांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

पूर्णा,ता 04 ः कळगाव येथील विविध कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व  प्रहार जनशक्ती पक्षाने पूर्णा येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. ग्रामपंचायत कळगाव अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून बोगस कामे दाखवून निधीचा गैरवापर केलेला आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात …

Read More »

महापालीकेची  प्रभाग रचना पूर्वीप्रमाणेच,काही भागात  अंशतः बदल.

परभणी ता. 4 महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. जाहीर प्रभाग रचनेत फारसे बदल नाहीत. काही प्रभागाच्या व्याप्ती आणि सीमा रेषेत अंशतः बदल आहेत. उर्वरित बहुतांशी प्रभाग पूर्वीप्रमाणेच आहे. पालिका मुख्यालय, नटराज रंग मंदिर व कल्याण मंडपम येथील समिती कार्यालयात प्रभाग रचना. आज नकाशासह झळकावण्यात आली. ती रचना कार्यालयीन वेळेत पाहण्यास उपलब्ध राहणार आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या वेबसाईट https://pcmcparbhani.org/ …

Read More »

GST ची नवी कररचना, पहा काय स्वस्त काय महाग

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आता देशात केवळ दोनच टॅक्स स्लॅब्स असतील, तसेच अनेक वस्तूंवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. याशिवाय, 33 जीवनावश्यक औषधांवर आता जीएसटी लागणार नाही. याआधी या औषधांवर 12% कर आकारला जात होता. हे नवीन बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.   आजच्या काळात अनेक गंभीर आणि दुर्मिळ आजारांवर उपचार करणे खूप …

Read More »

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ मुंबई – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाते. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्षी बारा हजार अनुदान …

Read More »

ओबीसींसाठीही उपसमिती गठीत

मराठा आरक्षणासाठी मोठा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकार आता ओबीसींसाठीही महत्त्वाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येणार असून चंद्रशेखर बावनकुळे त्याचे अध्यक्ष असतील. या उपसमितीत छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह एकूण आठ मंत्री असणार आहेत. राज्य सरकारने नुकतेच मराठा आरक्षणासंबंधी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात ओबीसी नेत्यांनी आवाज उठवला. राज्याचे मंत्री छगन …

Read More »

एसबीआयची ‘या’ दिवशी मोबाईल बँकिंग सेवा राहणार बंद

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. SBI ने सोशल मीडियावर पोस्ट करत उद्या म्हणजे 4 सप्टेंबर रोजी काही तासांसाठी मोबाईल बँकिंग सेवा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. याचा बँकेच्या 44 कोटी ग्राहकांना फटका बसणार आहे. किती वाजता आणि किती तासांसाठी एसबीआयची ही सेवा बंद राहणार आणि ग्राहकांसाठी या काळात पर्याय काय …

Read More »

एनसीसी कॅडेटनी अनुशासित होऊन देशसेवेसाठी सज्ज राहावे-ग्रुप कमांडर ब्रिग्रेडियर अनुप बरबरे यांचे प्रतिपादन

परभणी,दि 03 ः राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना अनुशासन, शिस्त, देशसेवा आणि देशप्रेम शिकवले जाते. कॅडेटनी याचा फायदा घेत अनुशासित व्हावे आणि देशसेवेसाठी सज्ज राहावे असे आवाहन एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिग्रेडियर अनुप बरबरे यांनी मंगळवारी (दि.०२) रोजी केले. येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे परीक्षण करण्यासाठी आले असता ते बोलत होते. यावेळी कमांडिंग ऑफिसर के दिलीप रेड्डी, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य …

Read More »

४ सप्टेंबरला ओबीसी समाजाचे धरणे आंदोलन

पाथरी प्रतिनिधी – ओबीसी आरक्षणात इतर समाजाचा समावेश करून होत असलेली घुसखोरी रोखावी, या मागणीसाठी पाथरी तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी आज तहसीलदारांना निवेदन दिले. या वेळी हजारोच्या संख्येने मान्यवर ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.   मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले. सरकारने मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश न करण्याची ठाम भूमिका घ्यावी, …

Read More »

ऐतिहासिक विजय… अखेर सरकारकडून ‘या’ मागण्या मान्य

“…तर रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो”-मनोज जरांगे पाटील कोणत्या मागण्या सरकारकडून मान्य? मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळण्याच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहेत. अखेर त्यांचे उपोषण यशस्वी झाले असून सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आता आपण पाहूया की, सरकारने त्यांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत. 1. हैदराबाद संस्थानच्या गॅझेटची अंमलबजावणी केली जाणार, याचं सर्व …

Read More »

विवेकानंद विद्यालयात ‘ऑपरेशन सिंदूर ‘ चा देखावा

सेलू /प्रतिनिधी येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात श्री.गणेशोत्सव निमित्त स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर यांच्या हस्ते श्री.गणेशाची स्थापना करण्यात आली.’ऑपरेशन सिंदूर’ चा देखावा सादर करण्यात आला आहे. पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ७ मे २०२५ (बुधवार )रात्रीच्या सुमारास भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’असे नाव देण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी व …

Read More »

एक मराठा लाख मराठा..रावसाहेब दानवेंना पिटाळून लावलं

जालन्यात भाजप नेते, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी जोरदार गोंधळ घातला. आपले समाज बांधव मुंबईत उपाशी मरत असताना, त्यांना पाणीही मिळत नसताना तुम्ही गावात येऊन कसली उद्घाटने करताय? अशी विचारणा करीत मराठा आंदोलकांनी दानवे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मराठा समाजाचा तीव्र रोष पाहता रावसाहेब दानवे यांना कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. इतर मागास प्रवर्गातून मराठा समाजाला …

Read More »

मराठा हे कुणबीच! – विश्वास पाटील..ब्रिटिशकालीन जनगणना नोंदी..जशीच्या तशी पोस्ट

मराठवाड्याच्या सलग चाळीस वर्षांच्या ब्रिटिशकालीन जनगणना नोंदी कशा नाकारल्या जातील, असा सवाल ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी उपस्थित केला आहे. इंडियन इव्हिडन्स ॲक्टनुसार ‘इम्पेरियल रेकॉर्ड कीपर्स’च्या नोंदींना कायदेशीर दर्जा असून, भारताच्या पहिल्या नियोजन आयोगापासून ते शेड्यूल्ड कास्ट कमिशनपर्यंत या आकडेवारीचा अधिकृत वापर झालेला आहे. अशा वेळी “मराठा कुणबी” समाजाचे स्पष्ट पुरावे समोर असूनही, त्याकडे डोळेझाक का केली जाते, असा थेट …

Read More »

एचएआरसी संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी,निराधार ताईला दिले उदरनिर्वाहाचे साधन

हिंगोली,दि 31 ः होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे गौरी गणपती सणाच्या निमित्ताने औंढा नागनाथ येथील निराधार कांचन दिलीप राऊत यांना उदरनिर्वाहासाठी ऑल इन वन शिलाई मशीन तसेच जीवनावश्यक किराणा साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमावेळी एचएआरसी अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ राजकुमार भारूका, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशटी, समन्वयक प्रकाश डूबे, संजय लाहोटी, नीळकंठ अंभोरे, राजेंद्र खापरे आदी …

Read More »

सुप्रिया सुळेंच्या गाडीवर बाटल्या फेकल्या..प्रचंड घोषणाबाजी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर जात भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खराब झाली असल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे यांनी गेल्या चार दिवसांपासून काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृती खराब झाली असल्याचे सुळे यांनी सांगितले आहे. सुप्रिया सुळेंना अडवलं, पवारांविरोधात घोषणाबाजी सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची …

Read More »

मनोज जरांगे पाटलांचा राज ठाकरे,चंद्रकांत पाटलांवर प्रहार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. या आंदोलनावरुन नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला होता, मग ते परत का आले, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. …

Read More »