04/02/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

हिंगोलीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने मारले आ. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे

हिंगोली,दि 20  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शनिवारी (ता.20) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या संदर्भात जे अपशब्द वापरले होते त्याचा जाहीर निषेध करत पडळकर यांच्या पोस्टरला जोडे …

Read More »

मोठी बातमी…राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा..एकला चलोरे…

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दोनच दिवसांपूर्वी दिलेले असताना सगळेच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिबिर नागपुरात संपन्न होत असताना पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका निवडणूक वगळता महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा स्वबळावर निवडणूक …

Read More »

निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत शिक्षण परिषद उत्साहात 

सेलू,दि 19 (प्रतिनिधी)ः येथील कन्या सेलू केंद्रातर्गत मासिक शिक्षण परिषद उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली.या वेळी व्यासपीठावर केंद्र प्रमुख एकनाथ जाधव,साधन व्यक्ती योगेश ढवारे,मोजम शेख,दिपक कांडेकर, कालिदास शिनगारे,मीरा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.अगदी खेळीमेळीच्या व आनंददायी वातावरणात संपन्न झाली.या वेळी वेगवेगळ्या विषयावर सखोल चर्चा व माहिती देण्यात आली. निपुण परभणी या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या महत्वाकांक्षी उपक्रमाबात योगेश ढवारे …

Read More »

यंदा नवरात्र, दसरा दिवाळीत मुसळधार…आला इशारा..रेनकोट घालुन फटाके वाजवा

बंगालच्या उपसगरासमवेत अरबी समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा नवरात्र, दसरा दिवाळी पाऊसात जाईल असं वर्तविण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागाने नवरात्रीदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २५ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि गुजरातच्या काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वीजांसह गडगडाटी सरी पडण्याचा अंदाज …

Read More »

लाडक्या बहिणांना ई-केवायसी बंधनकारक..दोन 2 महिन्यात करा अन्यथा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केले. लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी 2 महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे. ज्या महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल असे शासनाने स्पष्ट केले आहे.   राज्याच्या …

Read More »

एकदाच द्या उत्पनाचा दाखला आणि अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मिळवा शिष्यवृत्ती

मुंबई : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने शिष्यवृत्ती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. यानुसार, आता शिष्यवृत्तीसाठी वारंवार उत्पन्न दाखला आणि इतर कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही. महाडीबीटी पोर्टलवर एकदाच अपलोड केलेली माहिती ग्राह्य धरली जाईल आणि ऑटो सिस्टीमद्वारे शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वेळेत जमा होईल.   राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) आणि तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) व्यावसायिक …

Read More »

‘दशावतार’चा बॉक्स ऑफिसवर जलवा, प्रेक्षकांसाठी खास ऑफर – फक्त 99 रुपयांत पाहा चित्रपट

अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिकेतला मराठी चित्रपट दशावतार (Dashavatar Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून महाराष्ट्रभर त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर चित्रपटाच्या टीमने चाहत्यांसाठी खास भेट जाहीर केली आहे. मंगळवारी (16 सप्टेंबर) दशावतारचे तिकीट प्रेक्षकांना केवळ 99 रुपयांत उपलब्ध होणार आहे. मात्र ही ऑफर काही निवडक शहरांपुरतीच मर्यादित असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. …

Read More »

मराठा समाजाला मोठा दिलासा…. हैदराबाद गॅझेटविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

मुंबई,दि 18 ः हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधातील पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात अॅड विनीत धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती. सदर याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.  2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला जनहित याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं असून यासंदर्भातील जनहित याचिका ऐकण्याची गरज …

Read More »

४० वर्षांत जे झाले नाही, ते आमदार अमोल खताळ यांनी करून दाखवले

संगमनेर,दि 18 ः गमनेर शहराच्या लगत अभंगमळा व वकील कॉलनी परिसरातील स.न. ७८, ७९, ८० या जागांवरील नगरपालिकेचे आरक्षण अखेर रद्द करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल ४० वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मदतीचा हातभार लाभला असून अखेर तोडगा निघाला आहे. या आरक्षणामुळे स्थानिक नागरिकांना दीर्घकाळ विकासकामांपासून वंचित …

Read More »

आई होणं ही आयुष्यातील सर्वात कठीण जबाबदारी-कियारा अडवाणी

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने जुलै महिन्यात आपल्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला, जेव्हा ती एका गोंडस मुलीची आई बनली. नुकतेच तिने चाहत्यांना आपल्या मातृत्व प्रवासाची हलकीशी झलक दाखवली आहे. कियाऱ्याने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली असून त्यात सुप्रसिद्ध गायिका रिहाना मातृत्वाबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसते. रिहाना सांगते की, “आई होणे हे आयुष्यातील सर्वात कठीण काम आहे. माझे काम जरी आव्हानात्मक असले …

Read More »

सेलूत सेवा पंधरवडा निमित्त ७५ गोमांतांचे केले पुजन

सेलू,दि 18 (प्रतिनिधी) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस व सेवा पंधरवाडा निमित्य बुधवार ता.१७ सप्टेंबर रोजी श्री संत गोविंद बाबा दादुपंती मठ गोशाळेत ७५ गोमातांचे पूजन करून गोग्रास कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी सेलू भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, नगरसेवक, महिला पदाधिकारी तसेच गोशाळा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार …

Read More »

दिव्यांगा बांधवाच्या मागण्या सोडवा,सेलूत पालीका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सेलू,दि 18 (प्रतिनिधी) ः दिव्यांगा कडून त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन  मुख्याधिकारी तुकाराम कदम यांना सादर करण्यात आले आहे. दिव्यांगांना व्यवसायसाठी नगर परिषद अंतर्गत २०० चो फूट ची जागा उपलब्ध करून देण्यात यावी ५% निधीचे वाटप दिव्यांगाना ३ डिसेंम्बर रोजी करण्यात यावे . बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली दिव्यांग भवन ची मागणी त्वरित पूर्ण करावी व यासाठी नगर परिषदेकडून कायमस्वरूपी जागा उपलब्ध …

Read More »

घरगुती फेसपॅक जे खुलवतील तुमच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य

आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि वातावरणात त्वचेची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. स्किन केअर करताना नैसर्गिक घटकांचा वापर करणे नेहमीच फायदेशीर ठरते, कारण तज्ज्ञांच्या मते अशा गोष्टींना दुष्परिणाम नसतात. कोरफड, हळद, मध, नारळाचे तेल, गुलाबपाणी यांसारखे नैसर्गिक उपाय त्वचेला आतून पोषण देतात. प्रत्येक घटकाचे वेगळे गुणधर्म असतात आणि ते त्वचेवर लावल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या निरोगी आणि तेजस्वी …

Read More »

मराठवाडा मुक्ती संग्राम हा मानवमुक्तीचा लढा – प्रा. हनुमान व्हरगुळे

-सेलूतील एक दिवस,एक पुस्तक अभिनव उपक्रम -अभिनव उपक्रमाचे पुष्प ३२ वे सेलू / प्रतिनिधी – “मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ राजकीय स्वातंत्र्याचा नव्हता,तर तो खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा लढा होता. निजामशाहीच्या अन्यायी सत्तेविरुद्ध मराठवाड्यातील जनतेने प्राणपणाने संघर्ष केला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य सैनिकांनी रझाकारांच्या दहशतीला तोंड दिले आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा लढा यशस्वीरीत्या पूर्ण झाला,” असे प्रतिपादन …

Read More »

आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवडा उपक्रमाचे उद्घाटन

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” राबवले जाणार सोनपेठ / प्रतिनिधी – महसूल प्रशासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सेवा पंधरवडा या उपक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. मराठवाडा मुक्ती संग्रामदिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण करत या उपक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश विटेकर यांनी केले.   यावेळी तहसीलदार सुनील कावरखे, …

Read More »