04/02/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद

जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा  विकास आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह सर्व कामे सुरक्षित, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 9 जानेवारी 2026 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, महाशिवरात्रीच्या  कालावधीमध्ये मात्र आठवडाभर मंदिर भाविकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, …

Read More »

8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट..पगार कधी अन् किती

नवी दिल्ली : देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. बराच काळ पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये वाढ होणार का, याबाबत चर्चा सुरू होती. आता आयोगाचे अधिकृत नियुक्ती झाल्याने येत्या काही वर्षांत सरकारी वेतन रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. मात्र नेमकी वाढ किती होणार आणि ती कधी लागू होणार, हे अद्याप ठरलेले नाही. 8व्या केंद्रीय वेतन आयोगाचा थेट फायदा 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 69 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. म्हणजेच देशातील मोठ्या लोकसंख्येच्या उत्पन्नावर याचा थेट परिणाम होईल. सध्या लागू असलेल्या 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अपेक्षा आहे की नवीन वेतनरचना वेळेत लागू केली जाईल. सरकारी संकेतांनुसार, सुधारित वेतन आणि पेन्शन 1 जानेवारी 2026 पासून लागू मानली जाऊ शकते. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत माहिती दिली की 8व्या वेतन आयोगाचे गठन 3 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. या आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजन प्रभा देसाई आहेत. प्रो. पुलक घोष यांची अर्धवेळ सदस्य म्हणून, तर पंकज जैन यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाला आपला अहवाल तयार करण्यासाठी सुमारे 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, त्यामुळे त्याचा अहवाल 2027 च्या आसपास सादर होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये किती वाढ होईल, हे मुख्यतः फिटमेंट फॅक्टरवर ठरणार आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या बेसिक पगार आणि पेन्शनवर लावला जाणारा गुणक. जर फिटमेंट फॅक्टर 2.15 च्या आसपास ठेवण्यात आला, तर अनेक कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार दुप्पट किंवा त्याहून अधिक होऊ शकतो. याचा परिणाम केवळ पगारावरच नाही, तर HRA, पेन्शन आणि इतर भत्त्यांवरही होणार आहे. गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर आणि कर्मचारी संघटनांमध्ये महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) बेसिकमध्ये विलीन केला जाईल, अशी चर्चा जोरात होती. मात्र, वित्त मंत्रालयाने यावर स्पष्ट भूमिका घेतली असून सध्या असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले आहे. DA आणि DR पूर्वीप्रमाणेच दर सहा महिन्यांनी AICPI-IW निर्देशांकाच्या आधारे वाढवले जात राहतील. त्यामुळे या विषयावर पसरलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.  

Read More »

आधार-पॅन लिंक न केल्यास 31 डिसेंबर नंतर पॅन कार्ड निष्क्रिय

मुंबई : जर तुमच्याकडं पॅन कार्ड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्राप्तिकर विभागानं सर्व पॅन कार्डधारकांना त्यांचे पॅन आधार कार्डाशी तात्काळ लिंक करण्याचं आवाहन केलं आहे. आधार-पॅन लिंक न केल्यास 31 डिसेंबर 2025 नंतर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. अनेक करदात्यांना अजूनही ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. लिंकिंग न केल्यास 1000 रुपयांचा दंड भरावा …

Read More »

तळीरामांसाठी खुशखबर… नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यविक्रीच्या वेळेत शिथिलता

सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरची रात्र नेहमीच खास असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मद्यपींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यामुळे यंदाचं नववर्ष अधिक दणक्यात साजरं करता येणार आहे. राज्याच्या गृह विभागाने ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. तसेच बार आणि क्लबमध्ये पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यसेवन करता येणार आहे. अन्य दिवशी मात्र …

Read More »

पालक-चिकन खाण्यामुळे एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू

आवडीचे चमचमीत पदार्थ ताटात दिसले की आपण त्याच्यावर तुटून पडतो. मात्र ते अतिप्रमाणत खाल्लं की वेगवेगळ्या परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागत. अशीच एक घटना ओडिशात घडली आहे. पालक चिकन खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. विषबाधेमुळे हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील इटप गावात एका कुटुंबाने पालक चिकन खाल्लं. त्यानंतर त्यांना त्रास …

Read More »

‘बीएसएनएल’ ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी….

जर तुमच्याकडे बीएसएनएल सिम कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बीएसएनएलने अलीकडेच देशभरात 4G सेवा सुरू केल्या आहेत आणि आता 5G आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान, बीएसएनएलने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीएसएनएल 3G सेवा बंद करत असल्याची माहिती समोर येत आहेत. 5Gवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यासाठी तयारी करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत आहे. असे मानले …

Read More »

नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन

नांदेड : जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील जवळा लखे कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील दोन मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. तर, या घटनेबाबत माहिती मिळताच घरी त्यांचे आई-वडील देखील मृतावस्थेत आढळल्याने गावकरी आणि पोलीस (Police) प्रशासनही चक्रावून गेले आहे. आई-वडिलांचे मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी …

Read More »

मोहंमद रफी यांच्या जयंती निमित्त सेलूत संगीत मैफिल ” शाम ए सरगम” तर्फे संगीतमय मानाचा मुजरा

सेलू ( प्रतिनिधी ) प्रसिद्ध गायक मोहंमद रफी यांच्या १०१ व्या जयंती निमित्त येथील सेवानिवृत्त संघ सेलू यांच्या वतीने संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते . दि २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सेवानिवृत्त संघाच्या पेन्शन भवन मधील विसावा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे माजी अध्यक्ष गोविंदभाऊ जोशी हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून येथील उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक …

Read More »

साने गुरुजींचा जीवन प्रवास म्हणजे “श्यामची आई” – मंजुषा बोराडे

सेलू / प्रतिनिधी – “श्यामची आई ” पुस्तक म्हणजे साने गुरुजींचा जीवन प्रवास असून मराठी साहित्यातील मैलाचा दगड असल्याचे विचार सहशिक्षिका मंजुषा बोराडे यांनी एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले . स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने साने गुरुजी यांच्या जयंती निमिताने आयोजित” एक दिवस एक पुस्तक” या उपक्रमात साने गुरुजी लिखित ” श्यामची आई ” या पुस्तकाच्या चर्चा कार्यक्रमाचे …

Read More »

मोठी बातमी : क्रिकेटच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड तुटले

बिहार संघाने क्रिकेट इतिहासात नवा सुवर्णअध्याय लिहिला आहे. विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात बिहारने 50 षटकांत 6 गडी गमावत तब्बल 574 धावा ठोकल्या. या डावात 3 फलंदाजांनी शतके ठोकली. हा लिस्ट-ए क्रिकेटमधील आजवरचा सर्वोच्च संघ स्कोअर ठरला आहे. रांची येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध बिहारच्या फलंदाजांनी खळबळ उडवून दिली. वैभवची वादळी खेळी, तीन वर्षांनंतर तुटलेला विक्रम सलामीवीर वैभव …

Read More »

सेलूत माधवाश्रम स्वामी महाराजांचा ७६ वा पुण्यतिथी महोत्सव सुरू

सेलू / प्रतिनिधी – शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या मंदिरात दि २४ डिसेंबर पासून परम पूज्य माधवाश्रम स्वामी महाराज यांच्या ७६ व्या पुण्यतिथी सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे . आज सकाळी प पू माधवाश्रम स्वामी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच स्थापीत देवतेचे व कलश पूजन मंदिर चे पुजारी केशवराव मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी बालासाहेब खापरखुंटीकर ,सुधीर मंडलिक यांनी …

Read More »

मोंढा येथे मराठा वधु वर परिचय पत्रिकेचे प्रकाशन

परभणी / प्रतिनिधी मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या वधु वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन नवामोंढा परभणी येथे पंढरीनाथ घुले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या हस्ते १९ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. यावेळी वधु वर परिचय मेळावा ही काळाची गरज असून सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे अहवाल उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सभापती यांनी केले …

Read More »

आदिवासी मंत्र्याच्या निषेधार्थ तहसीलवर महादेव कोळी समाजाचा निषेध मोर्चा

पूर्णा (सुशिल कुमार दळवी) : राज्याच्या अनुसूचित जमातीत समाविष्ट असलेल्या कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी, ढोर कोळी या जमातींच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दुजाभाव केल्याचा आरोप करत आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांच्या वतीने दि.18 डिसेंबर रोजी पूर्णा तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले त्यावेळी तहसील कार्यालया समोर आदिवासी मंत्री डॉ. …

Read More »

फास्ट फिटर लाईनचा वीजपुरवठा खंडित,गंगाखेड शहरातील पाणीपुरवठा ठप्प, टंचाईचे सावट

दै शब्दराज रामप्रसाद ओझा गंगाखेड : गंगाखेड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला आज मोठा धक्का बसला असून फास्ट फिटर लाईनचा विद्युत पुरवठा कट झाल्याने सकाळपासून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या माखणी येथील मासोळी मध्य प्रकल्पातून सुमारे ७० टक्के पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पासाठी गंगाखेड ते माखणी दरम्यान स्वतंत्र फास्ट फिटर वीजवाहिनी कार्यरत आहे. मात्र संबंधित विद्युत बिल …

Read More »

बांधकामावरील मजुराचा लोअर दुधनाच्या डाव्या कालव्यात पडून मृत्यू

सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सोनवटी ( खापरखुंटी ) येथील व्यंकटी धुमाळ यांच्या बांधकामावरील मजूर काम करणारा मुलगा नामे साजिद मजीद शेख (१७)वय रा. राजमोहल्ला, सेलू याचा त्याच शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात वाहून गेल्याने दुर्दवी मृत्यू झाल्याची दुर्घटना दि १७/१२/२५ बुधवार रोजी घडली आहे .सदरील प्रकरणी सेलू पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सेलू पोलीस …

Read More »