04/02/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश निघाला,एक जिल्हा वगळला

सांगली, कोल्हापूरच्या काही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा विरोध डावलून सरकारचे शक्तिपीठ महामार्गाच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश राज्य शासनाने पारित केला आहे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच महापालिका निवडणुकांच्या आधी फटका बसू नये याकरिता कोल्हापूरला वगळण्याची सावधगिरी शासनाने बाळगली आहे. कोल्हापूरकरांचा विरोध पाहता केवळ वर्धा ते सांगली …

Read More »

पुन्हा पाऊस..अलर्ट रहा..किती पडेल हे सांगता येणार नाही

गणेशोत्सवादरम्यान काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळणार आहे. तर बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याकडून हा अलर्ट जारी करताना राज्यातील काही जिल्ह्यात पावसाच्या सरींसह वारे प्रतितास ४० ते ६० किमी …

Read More »

इतिहासातील सर्वात मोठ भगवं वादळ….अनेक किलोमीटरपर्यंत रांगा

परभणी,दि 27 ः मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्यासाठी आंतरवाली सराटीतून सकाळी १० वाजता निघाले आहेत. त्यांच्यामागे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांचा ताफा आहे. तसेच कार्यकर्त्यांकडून चौका-चौकात त्यांच्यावर फुलांची वृष्टी होत आहे. मनोज जरांगे यांचा ताफा आता पैठणमधून बाहेर पडला आहे. मनोज जरांगे पाटील पुण्यात आल्यानंतर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करणार आहेत. पुणे येथील वाहतूक व्यवस्था या मोर्चाच्या दृष्टीने चोख ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन …

Read More »

आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी,वाचा अटी

परभणी,दि 27 मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना काल दिनांक 26 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती. परंतु, तरीदेखील मनोज जरांगे यांनी आज सकाळपासूनच मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी एका दिवसासाठी देण्यात …

Read More »

युनियन बँकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

परभणी,दि 26 ः परभणी शहरातील युनियन बँक शाखेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवार (दि.26) आंदोलन केल्याने कर्जप्रकरणे मंजुर झाली आहेत. या बँकेला अनेक गाव दत्तक आहे. त्यातील वझुर ता.पूर्णा येथील गावातील शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावत नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत गेल्या जुन महिन्या पासुन शेतकरी संपुर्ण कागदपत्रे देऊन सुद्धा बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायला तयार …

Read More »

श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती

परभणी,दि 26 ः येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविल्या. मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्तीमध्ये झाडांच्या बिया टाकण्यात आल्या आहेत. जेणेकरून त्या बिया जमिनीत जाऊन झाड तयार होईल. सदरील उपक्रमात एकूण साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मुर्त्या बनवल्या. या उपक्रमात प्रथम,द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यांस बक्षिसे …

Read More »

सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचे विचार व कार्य मानवतावादी होते : प्राचार्य डॉ. बबन पवार

परभणी,दि 26ः येथील शारदा महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने भगवान चक्रधर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.बबन पवार म्हणाले की महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक स्वामी चक्रधर यांनी जगा आणि जगू द्या असा अहिंसावादी विचार जगाला दिला. …

Read More »

परभणीत वंदे भारत एक्सप्रेसचे भाजपा महानगर कडून जल्लोषात स्वागत

परभणी ,दि 26 दक्षिण मध्य रेल्वेचा ऐतिहासिक क्षण आज मराठवाड्याने अनुभवला. हुजूर साहेब नांदेड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा शुभारंभ  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते (ऑनलाईन) हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या प्रसंगी परभणी स्थानकावर गाडीचे आगमन होताच भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. स्थानक परिसरात ढोल-ताशांचा …

Read More »

मोरेगावात वानरांचा उच्छाद; ग्रामस्थ हैराण

सेलू,दि 25 ः सेलू तालुक्यातील मोरेगावात गेल्या काही दिवसांपासून वानरांच्या टोळ्यांचा धुमाकूळ सुरू असून ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरातील धान्याची नासधूस, गोरगरिबांच्या घरावरील पत्र्यांचे नुकसान, घराच्या छतावरील सौर प्लेट फोडणे, विजेच्या तारा तोडणे, लहान लेकराच्या हातातील वस्तू हिसकावणे, घरात उतरून भाकरी पळवणे, त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येतात अनेकांची पत्रे पाडली आहेत.त्यामुळे घराच्या बाहेर निघताना भिती …

Read More »

सेलूतील जैन समाजाच्या आंतर-शालेय निबंध स्पर्धेला मोठा प्रतिसाद

सेलू,दि 25 (प्रतिनिधी) ः भगवान महावीर जन्म कल्याणकाच्या पवित्र प्रसंगी श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर,सेलू संस्थे द्वारा आयोजित आंतर-शालेय निबंध स्पर्धेत १० शाळांतील एकूण ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे पुरस्कार वितरण समारंभ यशस्वीपणे पार पडला. स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट लेखनासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ व विशेष लेखनासाठी विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम पुरस्कार म्हणून ३० ग्रॅम चांदीचे नाणे,द्वितीय पुरस्कार …

Read More »

विजयसिंह पंडित यांनी काढली थेट लक्ष्मण हाकेंची लायकी

ओबीसी नेते लक्ष्मण हाके नेहमी चर्चेत असतात. अशातच आता बीडच्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात संघर्ष पेटला आहे. बीडमध्ये दाखल झाल्यानंतर विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला केला. जोरदार घोषणाबाजी करत हाकेंच्या ताफ्यावर समर्थक धावून गेले. पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना पांगवलं. या घडलेल्या प्रकारनंतर विजयसिंह पंडित यांनी थेट लक्ष्मण हाकेंची …

Read More »

बीडच्या ऐतिहासीक सभेत मनोज जरांगे यांनी दिला मोठा इशारा..

बीड: सत्ताधाऱ्यांना मराठ्यांना मुंबईत येऊ द्यायचं नाही, त्यासाठी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जात आहे, पण यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही असं आवाहन मनोज जरांगे यांनी दिलं. आम्ही शांत बसतो म्हणून त्याचा फायदा उचलू नका, आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही. यापुढे भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही असा इशारा …

Read More »

भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी -प्रा.डॉ.सचिन खडके

परभणी,दि 24 ः भौतिकशास्त्र विषयाची व्याप्ती ब्रम्हांडापासून ते अतिसूक्ष्म अणु-रेणूपर्यंत आहे. अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवाच्या प्रत्येक क्षेत्रात शिरकाव केला आहे. मुळात हे क्षेत्र भौतिकशास्त्र आणि गणित विषयाशी निगडित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्रातल्या विविध संधी ओळखून या विषयात पारंगत होऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन शारदा महाविद्यालयाचे मराठीचे प्रा. डॉ. सचिन खडके यांनी केले. येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र अभ्यास …

Read More »

मराठा वादळ मुंबईत धडकणार.पहा कसा असेल मार्ग

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरातील मराठा समाजाच्या बांधवांना घेऊन ते येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. त्यांच्या या मोर्चात हजारो मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच काळात मुंबईत गणेशोत्स्वाची धूम असणार आहे. त्यामुळे नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. असे असतानाच आता मनोज जरांगे मुंबईत नेमके …

Read More »

पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवावर आधारित शिक्षण आवश्यक-पद्मश्री डॉ.अभय बंग

सेलू,दि 23 (प्रतिनिधी) ः सध्याची शिक्षण पद्धती ही शिक्षण तर देत आहे पण शिकलेले सगळेच नौकरी किंवा इतर क्षेत्रात पुढे येत नाहीत.शिक्षण घेऊन साक्षर असलेले असंख्य आहेत पण बेरोजगारांची संख्याही तेवढीच वाढत आहे.यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवावर आधारित शिक्षण देणे आवश्यक असून अनुभवातून शिक्षण दिल्यास आपल्याला जीवनात काय करायचे आहे ते लक्षात येईल व बेरीजगारांची संख्या कमी होईल असे मत …

Read More »