09/05/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

एक मराठा लाख मराठा..रावसाहेब दानवेंना पिटाळून लावलं

जालन्यात भाजप नेते, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी जोरदार गोंधळ घातला. आपले समाज बांधव मुंबईत उपाशी मरत असताना, त्यांना पाणीही मिळत नसताना तुम्ही गावात येऊन कसली उद्घाटने करताय? अशी विचारणा करीत मराठा आंदोलकांनी दानवे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मराठा समाजाचा तीव्र रोष पाहता रावसाहेब दानवे यांना कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. इतर मागास प्रवर्गातून मराठा समाजाला …

Read More »

मराठा हे कुणबीच! – विश्वास पाटील..ब्रिटिशकालीन जनगणना नोंदी..जशीच्या तशी पोस्ट

मराठवाड्याच्या सलग चाळीस वर्षांच्या ब्रिटिशकालीन जनगणना नोंदी कशा नाकारल्या जातील, असा सवाल ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी उपस्थित केला आहे. इंडियन इव्हिडन्स ॲक्टनुसार ‘इम्पेरियल रेकॉर्ड कीपर्स’च्या नोंदींना कायदेशीर दर्जा असून, भारताच्या पहिल्या नियोजन आयोगापासून ते शेड्यूल्ड कास्ट कमिशनपर्यंत या आकडेवारीचा अधिकृत वापर झालेला आहे. अशा वेळी “मराठा कुणबी” समाजाचे स्पष्ट पुरावे समोर असूनही, त्याकडे डोळेझाक का केली जाते, असा थेट …

Read More »

एचएआरसी संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी,निराधार ताईला दिले उदरनिर्वाहाचे साधन

हिंगोली,दि 31 ः होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे गौरी गणपती सणाच्या निमित्ताने औंढा नागनाथ येथील निराधार कांचन दिलीप राऊत यांना उदरनिर्वाहासाठी ऑल इन वन शिलाई मशीन तसेच जीवनावश्यक किराणा साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमावेळी एचएआरसी अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ राजकुमार भारूका, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशटी, समन्वयक प्रकाश डूबे, संजय लाहोटी, नीळकंठ अंभोरे, राजेंद्र खापरे आदी …

Read More »

सुप्रिया सुळेंच्या गाडीवर बाटल्या फेकल्या..प्रचंड घोषणाबाजी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर जात भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खराब झाली असल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे यांनी गेल्या चार दिवसांपासून काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृती खराब झाली असल्याचे सुळे यांनी सांगितले आहे. सुप्रिया सुळेंना अडवलं, पवारांविरोधात घोषणाबाजी सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची …

Read More »

मनोज जरांगे पाटलांचा राज ठाकरे,चंद्रकांत पाटलांवर प्रहार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. या आंदोलनावरुन नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला होता, मग ते परत का आले, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. …

Read More »

तर एकही मराठा शनिवारी-रविवारी घरी राहणार नाही-मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

मराठवाड्यातील मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर तत्काळ सरकारने काढावा. तसेच सातारा आणि हैद्राबाद गॅझेटियर नोंदीचा आधार घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी न्या. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या समितीकडे केली. या मागण्यांची अंमलबाजवणी पुढच्या दोन चार दिवसांत झाली नाही तर राज्यातील एकही मराठा शनिवारी-रविवारी घरी राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. …

Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक इतिहास जिवंत केला- सुभाष ढगे

सेलू:( प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्य निर्माण केले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दोनशे मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पानवठे , धर्मशाळा बांधल्या. राजकीय सामाजिक कर्तृत्व सिद्ध करतानाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक इतिहास जिवंत केला. असे प्रतिपादन बाल विद्या मंदिर हायस्कूल, परभणी येथील सहशिक्षक, प्रसिद्ध वक्ते सुभाष ढगे यांनी केले. ६४ वी गणेशोत्सव व्याख्यानमाला नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात …

Read More »

मुंबईत खाण्याची पिण्याची ठिकाणे बंद…बीड जिल्ह्यातून 50 हजार भाकरी रवाना

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव मुंबई येथील आझाद मैदानावर पोहोचले आहेत. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मात्र, तिथे गेलेल्या बांधवांची खाण्या पिण्याची गैरसोय होत आहे. हे पाहून बीड जिल्ह्याच्या साक्षाळ पिंपरी येथील गावकऱ्यांनी आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी 50 हजाराहून अधिक भाकरी ठेचा चटणी लोणचं मुंबईच्या दिशेने पाठवले जात आहे.आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी 50 हजार भाकरी, चटणी, ठेचासह …

Read More »

मराठा आरक्षण आंदोलनात खासदार,आमदारांचा सहभाग,सरकारवर दबाव वाढला..

मुंबई,दि 29 ः मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या  मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार, खासदार यांनी पाठिंबा दिला आहे.या प्रमुख नेत्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे.उद्या शनिवारी काही आमदार खासदार सहभागी होणार असल्याची माहीती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलक शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईत दाखल झाले. मनोज …

Read More »

मराठा आंदोलकांसाठी गुड न्युज..आता शनिवारीही

मुंबई,दि 29 ः मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी उद्या उपोषण करण्याची परवानगी दिली आहे आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रानंतर ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई पोलिस सत्य नारायण चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. ती मुदत आता संपली …

Read More »

पूर्णेत नगरपालीकेने तयार केलेल्या खड्यात बुडून बालकाचा मृत्यु

सुशीलकुमार दळवी पुर्णा,दि 29 ः पुर्णा नगर परिषदेकडून शहराच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने तयार करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यात पडुन विश्वदीप संदीप कांबळे या दहा वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना पुर्णा शहरातील हरीनगर भागात घडली काल २८ ऑगस्ट रोजी विश्वदीप पावसात बाहेर गेला होता त्यावेळी रात्रीच्या या परिसरात खड्डा पाण्याने भरला असताना त्याचा लक्षात न आल्या मुळे …

Read More »

जिकडे नजर जाईल तिकडे फक्त मराठे…मुंबईत भगवं वादळ

मराठा सामाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आमरण उपोषण करत आहेत. तब्बल हजारो किलमोटीरचा प्रवास करून मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते, मराठा बांधव देखील हजर होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा दिला. यावेळी मनोज जरांगे …

Read More »

मुसळधार पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल

हैदराबाद विभागातील भिकनूर – तळमडला – अक्कनपेट सेक्शन मध्ये काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी खालीलप्रमाणे बदल लक्षात घ्यावेत: 1️⃣ (दिनांक 28 ऑगस्ट 2025) रोजी सुटणारी गाडी क्र. 17064 काचेगुडा – मनमाड अजंठा एक्स्प्रेस ही गाडी सिकंदराबाद – विकाराबाद – परळी – परभणी मार्गे वळविण्यात आली आहे. या गाडीला माल्काज्गिरी, बोलाराम, मेद्चल, कामारेड्डी, …

Read More »

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश निघाला,एक जिल्हा वगळला

सांगली, कोल्हापूरच्या काही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा विरोध डावलून सरकारचे शक्तिपीठ महामार्गाच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश राज्य शासनाने पारित केला आहे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच महापालिका निवडणुकांच्या आधी फटका बसू नये याकरिता कोल्हापूरला वगळण्याची सावधगिरी शासनाने बाळगली आहे. कोल्हापूरकरांचा विरोध पाहता केवळ वर्धा ते सांगली …

Read More »

पुन्हा पाऊस..अलर्ट रहा..किती पडेल हे सांगता येणार नाही

गणेशोत्सवादरम्यान काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळणार आहे. तर बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याकडून हा अलर्ट जारी करताना राज्यातील काही जिल्ह्यात पावसाच्या सरींसह वारे प्रतितास ४० ते ६० किमी …

Read More »