09/05/26
Breaking News

Shabdraj

खोटी कागदपत्रे व बनावट सही व शिक्के मारून मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न

सेलू दि २३ ( प्रतिनिधी ) बनावट कागदपत्र तयार करून त्यावर बनावट सही व शिक्के मारून आरोपी कडून मूळ मालकाची मालमत्ता हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला असून आरोपीच्या विरोधात सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ मालक नारायण चिक्याळ रा.विद्यानगर यांच्या नांवे असलेल्या शहरातील ७/२०२३ या मालमत्तेचे शिवप्रसाद आसाराम सानप रा .जिंतूर याने …

Read More »

सेलूत नृसिंह जन्मोस्तवाचे आयोजन, विविध धार्मिक कार्यक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) येथील पांडे गल्ली मधील अत्यंत पुरातन असलेल्या नृसिंह मंदिर मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नरसिंह जन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे भगवान विष्णूच्या मुख्य दहा अवतारातील चौथा अवतार म्हणजे नरसिंह अवतार आहे . आपला भक्त प्रल्हाद संकटात सापडला असता त्याने धावा करताच समोर असलेल्या खांबातून प्रगट झालेला हा अत्यंत विक्राळ अवतार आहे .धड नराचे …

Read More »

उमरा येथे सुशिक्षित तरुणांचा पशुपालन व्यवसायाकडे वाढता कल

पाथरी प्रतिनिधी दिनांक 19/4/2026 रविवारी रोजी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर उमरा येथे रतन बालासाहेब कोल्हे यांच्या शेळीपालन व्यवसायाच्या शेडचे भूमिपूजन डॉ के एन जाधव यांच्या हस्ते संपन्न झाल यावेळी तुकाराम महाडिक, महेश कौसडीकर, सुरेशराव नखाते, पप्पू केंद्रे शेतकरी पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील काही दिवसात बाजारपेठेतील वाढलेली मागणी लक्षात घेता दुग्ध व्यवसाय बरोबरच कुक्कुटपालन शेळीपालन याकडे सुशिक्षित बेरोजगार तरुण पारंपारिक …

Read More »

1967 नंतर पहिल्यांदाच शरद पवार मतदानापासून वंचित

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि भावूक घडामोड समोर आली आहे. १९६७ मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत कधीही आपला मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या शरद पवार यांना यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानापासून दूर राहावे लागणार आहे. ही माहिती स्वतः शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे दिली असून, त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन …

Read More »

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल पाऊल

परभणी, दि.२१  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत ‘अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप’ हे मोबाईल अॅप सुरू केले आहे. या अॅपमुळे लाभार्थ्यांना योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता थेट मोबाईलवरून करता येणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून महामंडळाची कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे. महामंडळाच्या योजनांसाठी www.udyog.mahaswayam.gov.in⁠ हे संकेतस्थळ …

Read More »

माझे सर्वस्व हरपले, पण मी खचणार नाही:प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार भावुक

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. बारामतीच्या ऐतिहासिक शारदा प्रांगणात विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी आपल्या पतीच्या आठवणींनी सुनेत्रा पवार यांना अनेकदा गहिवरून आले. मी माझे सर्वस्व हरपले, पण मी थांबणार नाही, खचणार नाही, मागे हटणार नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपल्या …

Read More »

गंगाखेडमध्ये परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

गंगाखेड | प्रतिनिधी : गंगाखेड शहरात श्री भगवान परशुराम जयंती तसेच महात्मा बसवेश्वर जयंती हे दोन्ही उत्सव मोठ्या भक्तिभावात, सामाजिक जाणीवेतून व उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, जयघोष, भजन-कीर्तन आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. परशुराम जयंती – भव्य शोभायात्रा व धार्मिक सोहळा श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा २०२६ निमित्त काल सायंकाळी ५ वाजता …

Read More »

उन्हाचा तडाखा आणि नियोजनाचा फटका; पाथरीत शेतकऱ्यांचा भाजीपाला सुकला!

पाथरी प्रतिनिधी पाथरीतील आठवडी बाजार पुन्हा मूळ जागेवर भरवण्याची मागणी; नगर परिषद सदस्यांचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन ​पाथरी (प्रतिनिधी):पाथरी शहरातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडी बाजार’ कोणत्याही अधिकृत ठरावाशिवाय जुन्या, अपुऱ्या जागेत हलवण्यात आल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हा बाजार पुन्हा त्याच्या मूळ जागेवर भरवण्यात यावा, या मागणीसाठी नगर परिषदेच्या अनेक सदस्यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) यांना निवेदन …

Read More »

भारतीय संविधान समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम – उत्तम कांबळे

सेलू ( प्रतिनिधी ) संविधान संघर्षाचा विषय आहे. संघर्षातून नवीन जग निर्माण होते. संविधानाने पराभूत माणसांचा इतिहास बदलून विजेत्या माणसांचा इतिहास रचला. भारतीय संविधाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे. भारतीय संविधान लढण्याचे, जगण्याचे हत्यार आहे. समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे ( नाशिक ) यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सार्वजनिक …

Read More »

संकल्प मानव विकास संस्थेची शासकीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

रमेश बिजुले पाथरी,दि 21  येथील हॉटेल प्रियल येथे आज दिनांक २१ एप्रिल रोजी संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने शासकीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण समन्वय बैठक संपन्न झाली. संकल्प मानव विकास संस्थेचे कार्यकारी संचालक  सुधाकरराव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्न, महिला-बाल आरोग्य आणि कामगारांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. …

Read More »