25/06/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदवा; युवकांना आवाहन

परभणी, दि. 08  : भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉरपोरेट अफेअर्स अंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे यांनी केले आहे. या योजनेसाठी 18 ते 25 वयोगटातील पुर्णवेळ शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण किंवा नोकरीत नसलेला भारतीय युवा वर्ग पात्र आहे. या योजनेअंतर्गत देशातील …

Read More »

वॉटरपार्कमध्ये महिलेचा भीषण अपघात,अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी

पुणे : शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील वॉटरपार्कमध्ये व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटना घडली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकडे दु्र्लक्ष केल्याने वॉटरपार्कमध्ये एका महिलेचा भीषण अपघात झाला आहे. अश्विनी संदीप नप्ते (वय 37, रा. करंदी) असे या महिलेचे नाव असून या अपघातात त्यांचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी नप्ते या आपल्या कुटुंबासह सुटीचा आनंद …

Read More »

परभणीत एकाच दिवशी दोन लाचखोरांवर कारवाई

परभणी,दि 08 परभणी जिल्ह्यात एकाच दिवशी दोन लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.एका वैद्यकीय अधिक्षकांसह भूमी अभिलेख मधील वरिष्ठ लिपिकास ताब्यात घेण्यात आले आहे. पालम येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. रमेश खंदारे यांचा रुग्णालयातील कापड स्वच्छता कंत्राटदार यांच्याबरोबर व्यवहार होता, त्याच अनुषंगाने त्यांनी त्याला 50 हजारांची लाच मागितली. त्यानुसार, कंत्राट दाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना एसीबीच्या एका …

Read More »

हायवाच्या धडकेत सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू.. एक जण जखमी

सोनपेठ (प्रतिनिधी) सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरात दि. ८ एप्रिल बुधवार रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास एका हायवा ट्रकचा अपघात झाला. या अपघातात न.प.स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरात नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना हायवा ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तुळसाबाई दत्ता पाडुळे (वय ४५ वर्ष)यांचा जागीच मृत्यू …

Read More »

बँकखात्यातून ६ लाखांची ऑनलाईन फसवणूक,बँकेविरोधात ग्राहकाचे आमरण उपोषण सुरू

पाथरी,दि 08 परभणीतीलएका नामांकित बँकेतील खात्यामधून सहा लाखाहून अधिकची रक्कम ऑनलाईन परस्पर काढून घेतल्याने फसवणूक झाल्याचे म्हणून सदरील बँकेच्या विरोधात पाथरी शहरातील एका खातेधारकाने परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. अनीस खान युनूस खान पठाण (रा. आझाद नगर, पाथरी) असे फसवणुक झालेल्या खातेदाराचे नाव असून त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार ३ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान त्यांच्या खात्यातून सुमारे …

Read More »

दिव्यांगांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; १५ एप्रिलला ‘भिक मागो आंदोलन’चा इशारा

पाथरी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप करत दिव्यांग संघर्ष समिती, महाराष्ट्र (शाखा परभणी) यांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी, पाथरी यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद अल्ताफ मोहम्मद आसिफ यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत प्रत्यक्षात पोहोचत नसून …

Read More »

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सेलूत “सामान्य ज्ञान “स्पर्धेचे आयोजन

सेलू / प्रतिनिधी – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वाचून साजरी करावी या उद्देशाने सेलूत त्यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी “सामान्य ज्ञान ” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . येथील नूतन विद्यालयात दि १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते ११ यावेळेत या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धा गट (अ) इयत्ता ५ वी ते ७ वी …

Read More »

शहरातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने सत्कार

सेलू ( प्रतिनिधी ) येथील तालुका पेन्शनर्स असोसिएशन च्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन सेलू तालुका पेशनर्स असोसिएशन च्या विसावा सभागृह दि ५/४/२६ रोजी करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष डॉ शरद कुलकर्णी ,सचिव नारायणराव इक्कर तसेच सत्कार मूर्ती डॉ एस एम लोया ,नंदकिशोर बाहेती ,निशिकांत पाटील ,महादेव अगजाळ ,प्रकाश धामनगावकर,बळवंतराव देशपांडे …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचन संस्कृतीचे प्रेरणा स्त्रोत आहेत – प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर

सेलू( प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथांवर जीवापाड प्रेम होते. त्यांनी पुस्तकांसाठी राजगृहाची उभारणी केली. १८ तास अभ्यास करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वाचन संस्कृतीचे प्रेरणा स्त्रोत आहेत. असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त नूतन विद्यालयाच्या कै. …

Read More »

पर्यवेक्षक एन. बी. तायनाक यांचा सेवानिवृत्ती निमीत्त गौरव

पाथरी,दि 05 (प्रतिनिधी)ः पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ मानवत संचलित कै.स.गो.नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा येथील पर्यवेक्षक एन .बी .तायनाक यांना संस्थेमध्ये सेवेला ३० वर्ष दोन महिने पुर्ण झाल्याने दि. ३० मार्च रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने संस्थेच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. संस्थेमध्ये 01फेब्रुवारी 1996 रोजी संस्थापक अध्यक्ष कै.स.गो.नखाते यांच्या व ईतर संचालक समोर प्रत्यक्ष …

Read More »

तारुण्यातच ज्ञानेश्वरी वाचा,आयुष्यात खऱ्या सुखाचा मार्ग सापडेल-श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर

सेलू (नारायण पाटील) मानवाला जेव्हा आयुष्याचा शेवट येतो तेव्हा खरा सुखाचा मार्ग कळतो परंतु तेव्हा वेळ गेलेली असते.म्हणून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर संत मार्गाला लागल्यास आयुष्यातील खरा सुखाचा मार्ग सापडेल.अगदी तरुण्यातच ज्ञानेश्वरी वाचावी तर आपल्याला खऱ्या सुखाचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. येथील वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने गुरुवार दि ०२ एप्रिल ते …

Read More »

कपड्यांच्या बटणांना फक्त चारच छिद्रे का ? कारण..

दैनंदिन जीवनात आपण रोज वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालतो. पण अनेक लहानसहान गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही. त्यापैकीच एक म्हणजे बटण. तुमच्या लक्षात आले असेल की बहुतेक शर्ट आणि कपड्यांच्या बटणांना चार लहान छिद्रे असतात. पण बहुतेक कपड्यांच्या बटणांना फक्त चारच छिद्रे का असतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? कारण, 4 ऐवजी 2-3 किंवा थोडी जास्तही छिद्रंही असू …

Read More »

यशाचे शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची जिद्द असणे गरजेचे आहे-उद्योजक मधुकर पौळ

सेलू ( प्रतिनिधी ) यशाचे शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटी अत्यंत आवश्यक असते. अभ्यासात नियमितता व वेळेचे योग्य नियोजन असेल तरच ध्येयप्राप्ती शक्य होते, असे प्रतिपादन उद्योजक मधुकर पौळ यांनी केले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी होते. व्यासपीठावर उपेंद्र बेलूरकर, प्रमुख पाहुणे …

Read More »

मानवाला विचारांची दिशा देणे संत वाङ्म्याचे कार्य आहे-चैतन्य महाराज देगलूकर

सेलू (नारायण पाटील) मानव हा विचारांमध्ये अल्पविचार करतो.सकळ मानव जातीला व्यापक विचारांची गरज आहे.हे संतांनी हजारो वर्षांपूर्वी ओळखले आहे.त्यामुळे केवळ मोक्ष नाही तर सर्व मानव जातीला विचारांची योग्य दिशा देणं ही संत वाङ्म्याचे कार्य आहे असे प्रतिपादन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. येथील वसंत प्रतिष्ठाण व खारकर परिवाराच्या वतीने आयोजित ‘ पसायदान ‘ या प्रवचन मालेचे दुसरे पुष्प त्यांनी …

Read More »

युध्दाचा परिणाम….शाम्पू, तेल, बिस्कीट महाग होणार ?…

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण देशाला वेगवेगळ्या पातळीवर फटका बसत आहे. भारतासह अनेक देशांत उर्जासंकट निर्माण झाले आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायूच्या कमतरतेमुळे इंधनाचा भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जलवाहतूक ठप्प पडली असून भारतात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी कच्चा माल कमी पडत आहे. याच सर्व गोष्टींचा फटका बसायला आता सुरुवात झाली आहे. …

Read More »