23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

पुस्तके माणसाला समृद्ध करतात : प्राचार्य डॉ. बबन पवार

 परभणी,दि 12 ः येथील शारदा महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्यावतीने भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक तथा गणित तज्ञ पद्मश्री डॉ. एस आर रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अशोक चोपडे उपस्थित होते तर यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे व …

Read More »

पाथरीत आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त मताधिकार जनजागरण रॅली

पाथरी,दि 12 (प्रतिनिधी) ः लोकशाहित जनताच चालक पालक व मालक असते .जबाबदार शासन व्यवस्थेसाठी मतदाराची भुमिका फार महत्वाची असते .म्हणुन युवकात जनजागरणाची गरज आहे असे मत डाॅ.साहेब राठोड यांनी रॅलित मताधिकाराचे महत्व समजाऊन सांगितले . युवकांच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी व युवकांमध्ये मतदान जागृती करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग स्व. नितीन महाविद्यांयालयाच्या वतीने दि. १२ऑगष्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवक …

Read More »

तब्बल 15 हजार पोलिसांची भरती,परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

: महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी …

Read More »

येलदरी धरणातून कोणत्याही क्षणी सोडणार पाणी

परभणी,दि.11(प्रतिनिधी) : खडकपूर्णा प्रकल्पातून 2 गेटद्वारे पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला असून त्यामुळे येलदरी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातून येलदरीत मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु आहे. सोमवारी सकाळी या जलाशयात 89.74 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची आवक ओळखून पाटबंधारे खात्याद्वारे येथून पुढे केंव्हाही येलदरी येथील जलविद्युत केंद्रातील टर्माइनला व नदीपात्रातसुध्दा पाण्याचा विसर्ग केला जाईल, असे …

Read More »

आंदोलनादरम्यान दंगल घडवण्याचा कट-मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

मराठा आरक्षणाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत मोठ्या लाखोंच्या संख्येने जाणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जोरदार तयारी सुरू आहे. आंदोलनादरम्यान दंगल घडवण्याचा कट आखण्यात आला आहे. गोव्याला नुकताच झालेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट रचला गेला, …

Read More »