23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

गाई व गोवंश चोरून नेणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलूची मागणी

सेलू / प्रतिनिधी – सेलू व परिसरामध्ये गाई चोरून नेणारी टोळी सक्रिय झाली आहे. सेलू शहरातून व आजूबाजूच्या गावातून अनेक गाई चोरी गेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने गाईला व गोवंशाला संरक्षित म्हणून घोषित केले आहे. तसेच महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. ही चोरून नेलेली गाई व गोवंश बहुतेक कापण्यासाठी नेली जात असतील अशी शक्यता आहे. अशी दुभती जनावरे चोरून नेल्यामुळे …

Read More »

फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

१२ ते १९ मार्च दरम्यान पारायण सोहळा; स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या महाभारत कथेचे आयोजन सेलू ,दि ११ ( प्रतिनिधी) – शहरातील सातोना रोडवरील मयुरी पार्क परिसरात १२ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित ‘फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा’ आणि स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून आयोजित महाभारत कथा सोहळ्याच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. या सोहळ्याचे …

Read More »

३२ वर्षांनंतर पुन्हा भरली ‘मैत्रीची शाळा’; १९९२ च्या बॅचच्या स्नेहसंमेलनात आठवणींना फुटला पाझर

परभणी – वेळ कधीच थांबत नाही; मात्र काही आठवणी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरही तितक्याच ताज्या राहतात. याचाच प्रत्यय नुकताच जिल्हा परिषद प्रशाला (प्राथमिक) येथील १९९२ च्या दहावीच्या बॅचच्या स्नेहसंमेलनात आला. तब्बल ३२ वर्षांनंतर एकत्र आलेल्या बालमित्रांनी आपले वय, पद आणि प्रतिष्ठा क्षणभर बाजूला ठेवत पुन्हा एकदा बालपणाचा निखळ आनंद अनुभवला.   गुरुजनांच्या आशीर्वादाने उजळला सोहळा या स्नेहमेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे लाभलेले …

Read More »

शिक्षक नारायण सोळंके व रोहिदास मोगल यांचा सेवागौरव

सेलू  / प्रतिनिधी – येथील नूतन विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक नारायण सोळंके आणि पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवागौरव समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, सीताराम मंत्री, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, मुख्याध्यापक संतोष पाटील, किरण देशपांडे व शंकरराव बोधनापोड, जयदत्त …

Read More »

जिल्हास्तरीय तीसऱ्या अक्षर बाल साहित्य संमेलनासाठी के बा च्या विद्यार्थिनींची निवड

आराध्या कटारे व दाक्षायनी इघवे यांची स्वरचित काव्य वाचन तर अंकिता फड हिची कथाकथन साठी निवड सेलू / प्रतिनिधी – येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील इयत्ता सहावी अ च्या ६ विद्यार्थिनींची परभणी जिल्हास्तरीय तीसरे अक्षर आनंद बाल साहित्य संमेलनासाठी निवड झाली आहे. दि. १५ जुन २०२५ ते दि.३ जानेवारी २०२६ दरम्यान राबवण्यात आलेल्या अक्षर आनंद बाल वाचक पुस्तक वाचन मोहिमे …

Read More »