23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

विवेकानंद विद्यालयात वृक्षारोपण- दीपस्तंभ आणि आर्यवैश्य समाज व महिला मंडळाचा उपक्रम

सेलू-( प्रतिनिधी ) पर्यावरणाचे संतुलन राहावे पर्यावरण संरक्षण व्हावे यासाठी दीपस्तंभ प्रतिष्ठान,आर्यवैश्य समाज आणि सेलू महिला मंडळाच्या वतीने शहरातील विवेकानंद प्राथमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. आर्य वैश्य समाज भूषण, माजी मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या ( ३० जुलै ) वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आर्यवैश्य समाज,दीपस्तंभ प्रतिष्ठान व महिला मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम वृक्षारोपण हा सामुदायिक उपक्रम तिन्ही घटकांकडून राबवण्यात …

Read More »

बदलत्या ग्रामीण जीवनाचा पट म्हणजे “वाळसरा”-लक्ष्मण गाडेकर

सेलू/प्रतिनिधी – काळ बदलला तसा ग्रामीण भागातील समाजव्यवस्था बदलली असून स्वार्थी, आत्मकेंद्री, असंवेदनशील कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाले ज्याने ग्रामीण भागातील महिलांचे, मजुरांचे शोषण वाढले आहे असे मत यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलू आयोजित एक दिवस एक पुस्तक या उपक्रमात आसाराम लोमटे यांच्या “वाळसरा”  ह्या कथासंग्रहावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर होते. आजच्या …

Read More »

गावकुसातल्या कलाकाराचं पेंटिंग मुख्यमंत्र्यांच्या दालनात

पाथरी,दि 30 ः नुकतेच महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांची ऐतिहासिक जागतिक वारसा म्हणून नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील वाघाळा या गावकुसातील चित्रकार सुशील घुंबरे यांनी स्वहस्ते बनवलेले रायगड किल्ल्याची प्रतिकृती असलेले कॅनव्हास पेंटिंग मंगळवार २९ जुलै रोजी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात कॅबिनेट बैठक संपल्या नंतर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री  मेघना बोर्डिकर यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट …

Read More »

संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या ट्रेकर्सनी सर केला दुर्गम हरिश्चंद्रगड

परभणी, दि. 29 ः माळशेज डोंगर रांगेच्या कुशीत विसावलेल्या, चौदाशे चोवीस मीटर उंचीवरील हरिश्चंद्रगड आणि प्रसिद्ध कोकणकड्यावर परभणीतील संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या ट्रेकर्सनी यशस्वी चढाई केली. शुक्रवार दुपारी १२ वाजता सुरुवात करून पावसाच्या सरी, जोरदार वाऱ्याचा मुकाबला करत त्यांनी अवघ्या अडीच तासात कोकणकड्यावर पोहोचत पराक्रम गाजवला. ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असलेला हा अजस्त्र गड …

Read More »

सैन्यदलातील संधींना करिअर म्हणून बघावे – लेफ्टनंट कर्नल संतोष मोहिते

परभणी,दि 29 ः राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी तसेच संयुक्त संरक्षण सेवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावरील विविध पदासाठी भरती प्रक्रिया केली जाते. सैन्यदल, वायुदल तसेच नौदलातील पदांसाठी अर्हता प्राप्त उमेदवाराची भरती केली जाते. सैन्यातील या संधीचे सोने करून विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे असे आवाहन परभणीचे भूमिपुत्र असलेले १/९ गोरखा रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल संतोष मोहिते यांनी मंगळवार (दि.२९) रोजी केले. श्री शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी …

Read More »